शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जिल्हा परिषदेत ९७२ नोकऱ्या; एका जागेसाठी ७७ जण परीक्षेस २१ संवर्ग

By नितीन काळेल | Updated: September 1, 2023 18:05 IST

७४ हजार ५७८ उमेदवारांनी भरला अर्ज 

सातारा : मागील काही वर्षांपासून रखडलेली आणि जिल्हा परिषदेतील रिक्त तब्बल ९७२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी २१ संवर्ग असून ७४ हजार ५७८ उमेदवारांनी अर्ज केला आहे. याचाच अर्थ सरासरी एका नोकरीसाठी ७७ जण परीक्षार्थी झाले आहेत.

राज्य शासनाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदाच्या भरतीबाबत सूचना केली आहे. त्यानुसार राज्यात ही भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. सतारा जिल्हा परिषदेतीलही तब्बल ९७२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी ३१ मार्च २०२४ ची संभाव्य रिक्त पदे ग्राह्य धरण्यात आलेली आहेत. एकूण २१ संवर्गाचा भरतीत समावेश आहे. शासनस्तरावरुन करण्यात आलेल्या सूचनेनुसार ही भरती योग्य पदातून १० टक्के ग्रामपंचायत कर्मचारी आणि २० टक्के अनुकंपा पदे वगळून ९७२ पदांसाठी होत आहे. ही भरती प्रक्रिया वर्ग तीन कर्मचाऱ्यांसाठी होत आहे.इतर जिल्ह्यांसाठीही केला अर्ज... 

जिल्हा परिषद भरती राज्यात सुरु आहे. त्यामुळे काही उमेदवारांनी अन्यही जिल्ह्यात अर्ज केला आहे. मात्र,एकाच पदासाठी एकापेक्षा अनेक जिल्हा परिषदेत अर्ज करू नये असे आवाहन प्रशासनाने केलेले. कारण परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेमार्फत तयार होणार असल्याने एका उमेदवाराला एकाच ठिकाणी परीक्षा देता येणार आहे. तसेच परीक्षा एकाचवेळी होणार असल्याने अडचण येणार आहे.

भरतीसाठी अर्ज आले असे... 

पद नाव          जागा      अर्ज संख्या 

आरोग्य पर्यवेक्षक     ०१        ११आरोग्य सेवक पुरुष ४० टक्के   ७६    २०८६५आरोग्य सेवक पुरुष ५० टक्के हंगामी फवारणी  १७०   ९४४७आरोग्य सेवक महिला  ३५३    १९१८ औषध निर्माण अधिकारी    ३५    ४९९१ कंत्राटी ग्रामसेवक    १०१   १३५५०कनिष्ठ अभियंता स्थापत्य ३३     २६२७कनिष्ठ अभियंता विद्युत     ०१     ३८४ कनिष्ठ आरेखक      ०२    १२ कनिष्ठ लेखा अधिकारी     ०४     १३३ कनिष्ठ सहाय्यक प्रशासन ६९     ९५४५ कनिष्ठ सहाय्यक लेखा   ०७     ११३३ पर्यवेक्षिका      ०३       ४०७  पशुधन पर्यवेक्षक    ४२    ९१६ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०४      १०७५ वरिष्ठ सहाय्यक प्रशासन  ०२      ६८३ वरिष्ठ सहाय्यक लेखा   १०     ६६३ विस्ताराधिकारी कृषी    ०१     १११विस्तार अधिकारी शिक्षण  ०२     १२५ विस्तार अधिकारी सांख्यिकी  ०५      १९६० स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  ५२     ३८२२ 

टॅग्स :jobनोकरी