शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लोकवर्गणीतून ९२ हजारांचा कागद

By admin | Updated: March 15, 2016 00:47 IST

औंध तलावनिर्मिती : २५० एकर क्षेत्र येणार ओलिताखाली --आमचा लढा दुष्काळाशी..

रशिद शेख--औंधऔंध, ता. खटाव येथील गव्हाळा नावाच्या पाझर तलावाचे काम पाणलोटमधून यांत्रिकी विभाग जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करत आहे. या तलावाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी व भविष्य दुष्काळमुक्त करण्यासाठी परिसरातील औंध ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तब्बल ९२ हजार ९१६ रुपयांचा कागद लोकवर्गणी काढून आणला व तो तलावाच्या भरावावर वापरण्यात सुद्धा आला. जिल्ह्यातील इतर गावांपुढे औंध वासीयांनी एक वेगळा आदर्श ठेवला आहे.औंधला गव्हाळा व तेलकी हे दोन मोठे पाझर तलाव या दोन्ही तलावाचे काम होण्यासाठी येथील राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे यांनी मे २०१५ मध्ये ६ दिवस उपोषण केले होते. त्या उपोषणाला संपूर्ण औंध ग्रामस्थांनी पाठींबा दिला होता. उपोषणादरम्यान दोन्ही तलावाचे काम करण्याचे लेखी आश्वासन शासनाने दिले होते. परंतु त्यानंतर लगेचच पावसाचे त्या तलावात पाणी आल्याने काम पुढे ढकलण्यात आले व यंदा जानेवारीपासून काम सुरू झाले.काम सुरू झाल्यापासून औंध येथील युवक, शेतकरी, सामाजिक संघटना, ग्रामपंचायत पदाधिकारी काम उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी अहोरात्र हजेरी लावत आहेत. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी काढलेल्या लोकवर्गणीतून हा कागद आणला आहे. येणाऱ्या काही दिवसांत हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला तर जवळपास २५० एकर क्षेत्रातील शेतकऱ्यांना या तलावाचा फायदा होणार आहे. १०० लोकांनी साफसफाई करून कागद टाकण्यास मदत केली. औंधवासीयांनी यंदा लोकसहभागातून दुष्काळमुक्त होण्याचा चंग बांधला आहे.लोकसहभाग आहेच परंतु आणखी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जलक्रांती करण्यासाठी मदत करावी.-रोहिणी थोरात, सरपंच, औंध गव्हाळा तलावाचे काम अंतिम टप्प्यात असून, यानंतर आता मिशन तेलकी तलाव; गव्हाळा तलावाच्या धर्तीवर शेतीपाणी व पिण्याच्या पाण्यासाठी औंध गाव स्वयंपूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. -दत्तात्रय जगदाळे, सामाजिक कार्यकर्तेलोकसहभाग चांगला आहे. यापेक्षाही अजून सहभाग वाढला तर आम्हालाही काम करण्यास आणखी हुरूप येईल. आमच्या गावास दुष्काळमुक्त कसे करता येईल याचा प्रयत्न चालू आहे.-बापूसाहेब कुंभार, उपसरपंच, औंध तीन कोटी ९२ लाखांचा आराखडा तयारऔंध गावची जलयुक्त शिवारमध्ये निवड झाल्यांनतर औंध ग्रामस्थ, अधिकारी यांनी संपूर्ण शिवाराची पाहणी करून सर्व ठिकाणचे पॉइंट फिक्स केले. त्यानंतर आराखडा तयार करून त्यास ग्रामसभेची मंजुरी देण्यात आली व ३ कोटी ९२ लाखांचा आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.