शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून ९२ हजारांचा कागद

By admin | Updated: March 15, 2016 00:47 IST

औंध तलावनिर्मिती : २५० एकर क्षेत्र येणार ओलिताखाली --आमचा लढा दुष्काळाशी..

रशिद शेख--औंधऔंध, ता. खटाव येथील गव्हाळा नावाच्या पाझर तलावाचे काम पाणलोटमधून यांत्रिकी विभाग जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करत आहे. या तलावाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी व भविष्य दुष्काळमुक्त करण्यासाठी परिसरातील औंध ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तब्बल ९२ हजार ९१६ रुपयांचा कागद लोकवर्गणी काढून आणला व तो तलावाच्या भरावावर वापरण्यात सुद्धा आला. जिल्ह्यातील इतर गावांपुढे औंध वासीयांनी एक वेगळा आदर्श ठेवला आहे.औंधला गव्हाळा व तेलकी हे दोन मोठे पाझर तलाव या दोन्ही तलावाचे काम होण्यासाठी येथील राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे यांनी मे २०१५ मध्ये ६ दिवस उपोषण केले होते. त्या उपोषणाला संपूर्ण औंध ग्रामस्थांनी पाठींबा दिला होता. उपोषणादरम्यान दोन्ही तलावाचे काम करण्याचे लेखी आश्वासन शासनाने दिले होते. परंतु त्यानंतर लगेचच पावसाचे त्या तलावात पाणी आल्याने काम पुढे ढकलण्यात आले व यंदा जानेवारीपासून काम सुरू झाले.काम सुरू झाल्यापासून औंध येथील युवक, शेतकरी, सामाजिक संघटना, ग्रामपंचायत पदाधिकारी काम उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी अहोरात्र हजेरी लावत आहेत. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी काढलेल्या लोकवर्गणीतून हा कागद आणला आहे. येणाऱ्या काही दिवसांत हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला तर जवळपास २५० एकर क्षेत्रातील शेतकऱ्यांना या तलावाचा फायदा होणार आहे. १०० लोकांनी साफसफाई करून कागद टाकण्यास मदत केली. औंधवासीयांनी यंदा लोकसहभागातून दुष्काळमुक्त होण्याचा चंग बांधला आहे.लोकसहभाग आहेच परंतु आणखी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जलक्रांती करण्यासाठी मदत करावी.-रोहिणी थोरात, सरपंच, औंध गव्हाळा तलावाचे काम अंतिम टप्प्यात असून, यानंतर आता मिशन तेलकी तलाव; गव्हाळा तलावाच्या धर्तीवर शेतीपाणी व पिण्याच्या पाण्यासाठी औंध गाव स्वयंपूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. -दत्तात्रय जगदाळे, सामाजिक कार्यकर्तेलोकसहभाग चांगला आहे. यापेक्षाही अजून सहभाग वाढला तर आम्हालाही काम करण्यास आणखी हुरूप येईल. आमच्या गावास दुष्काळमुक्त कसे करता येईल याचा प्रयत्न चालू आहे.-बापूसाहेब कुंभार, उपसरपंच, औंध तीन कोटी ९२ लाखांचा आराखडा तयारऔंध गावची जलयुक्त शिवारमध्ये निवड झाल्यांनतर औंध ग्रामस्थ, अधिकारी यांनी संपूर्ण शिवाराची पाहणी करून सर्व ठिकाणचे पॉइंट फिक्स केले. त्यानंतर आराखडा तयार करून त्यास ग्रामसभेची मंजुरी देण्यात आली व ३ कोटी ९२ लाखांचा आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.