शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात ८५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:08 IST

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : राज्यातील उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना गतवर्षीपेक्षा चालू हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात साखर उत्पादन होत आहे. गतवर्षी १३ फेब्रुवारीअखेर सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये ५८ लाख ५० हजार ७६८ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ६७ लाख ४८ हजार ३२५ क्विंटल साखर ...

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : राज्यातील उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना गतवर्षीपेक्षा चालू हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात साखर उत्पादन होत आहे. गतवर्षी १३ फेब्रुवारीअखेर सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये ५८ लाख ५० हजार ७६८ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ६७ लाख ४८ हजार ३२५ क्विंटल साखर उत्पादन झाले होते. तर चालूवर्षी ८ मार्चअखेर ८३ लाख ८३ हजार ८२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत चालू हंगामात किमान ३५ ते ४० लाख क्विंटल साखरेचे अधिक उत्पादन होईल, असा अंदाज कारखानदारांकडून वर्तवला जात आहे. पुढील हंगामात आजपर्यंतच्या गाळप हंगामाचा उच्चांक निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीप हंगामात गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात उसाचे गाळप पूर्ण केले आहे. यामध्ये सर्वाधिक गाळप सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने केले आहे. तर साखर उत्पादनातही सह्याद्री सहकारी साखर कारखाना आघाडीवर राहिला आहे. या पाठोपाठ कृष्णा साखर कारखाना दुसºया स्थानावर आहे. मात्र, सह्याद्रीपेक्षा कृष्णा साखर कारखान्याचा उतारा मात्र अधिक आहे.एका बाजूला साखरेचे उत्पादन वाढत असले साखरेच्या दरात अजून तरी म्हणावी अशी वाढ होत नसल्याने व कारखान्यात तयार होणाºया इतर उपप्रकल्पांनाही दर नसल्याने गाळप झालेल्या उसाचे बिल वेळेत देण्याबाबत कारखानदार उदासीन आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे.चालू हंगामाचा शेवट २५ ते ३० एप्रिलपर्यंत होणार असल्याने अजून किमान ५५ दिवस चालणाºया जिल्ह्याच्या गाळप हंगामात प्रतिदिन ५१ हजार ४५० क्षमतेनुसार सर्व कारखाने सुरू राहिले तर किमान २८ लाख क्विंटल साखर उत्पादन वाढू शकेल. मात्र, वाढता उन्हाळा आणि शिल्लक ऊस उत्पादन लक्षात घेता १० ते १५ लाख क्विंटल असे उत्पादन शक्य आहे. गतवर्षी ६७ लाख ४८ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होते.या हंगामात गतवर्षी पेक्षा सरासरी २० टक्के अधिकसाखर उत्पादन झाले असले तरी पुढील हंगामात चालू हंगामापेक्षा अधिक ऊस उपलब्ध असल्याने जिल्ह्यात साखर उत्पादनाचाउच्चांक प्रस्थापित होईल, अशीआशा कारखानदार व्यक्त करीत आहेत.कारखान्याचे नाव साखर उत्पादन (क्विंटल)मध्ये२०१६/१७ १७/१८ (८ मार्चअखेर)श्रीराम.फलटण(जवाहर) ३,४५,१०० ४,१०,८५०कृष्णा ८,६१,९५० १०,९९,१८०किसन वीर, भुर्इंज ४,७८,८९० ६,०४,४७०लो.बा. देसाई १,८४,१७५ २,१५,७००सह्याद्री ९,७४,५३० ११,९४,६७०अजिक्यंतारा ४,५७,८८० ५,५९,२३०रयत ३,३८,८३० ४,०७,६१०खंडाळा तालुका १,९४,६५० २,५१,६००कारखान्याचे नाव साखर उत्पादन (क्विंटल)मध्ये२०१६/१७ १७/१८ (८ मार्चअखेर)न्यू फलटण २,७३,६०० ३,०१,९००जरंडेश्वर ६,३८,४०० ८,७४,३८०जयवंत शुगर ५,१४,६०० ६,३२,१५०ग्रीन पॉवर ४,६६,५९० ५,७१,१९०स्वराज ३,७१,९३० ४,९१,०४०शरयू ६,४७,२०० ७,९६,१५०एकूण ६७,४८,३२५ ८३,८३,१२०