शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

ग्रामपंचायतींसाठी ८४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2015 00:20 IST

उद्या मतमोजणी : मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सातारा : जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी सरासरी ८४ टक्के मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यास निवडणूक यंत्रणेला यश आले आहे. मतमोजणी उद्या गुरुवार, (दि. ६) तालुक्यांच्या ठिकाणी होणार असून, दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल हाती येतील,’ अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत योजनाबध्द पध्दतीने राबविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीलाच कौतुक केले. ७११ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. त्यापैकी १६१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ५५० ग्रामपंचायतींपैकी वाई तालुक्यातील जोर, बालेघर व महाबळेश्वर तालुक्यातील भोसे या गावांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने प्रत्यक्षात ५४७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान झाले. ११ हजार ९५२ इतके मतदान कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते.एकूण ३ हजार ८४१ पदांसाठी ८ हजार ७०४ उमेदवार रिंगणात होते. ८ लाख ४८ हजार ७ उमेदवारांपैकी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दुपारी साडेतीनपर्यंत ६ लाख ३२ हजार २६९ मतदान झाले. यामध्ये स्त्रियांचे मतदान ३ लाख ११ हजार ६६५, तर पुरुषांचे मतदान ३ लाख २० हजार ६०४ इतके आहे. दुपारीच जिल्हाभरात ७४.५६ टक्के मतदान झाले होते. इतक्या मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. मतदानासाठी १ हजार ९५८ मशिन्स वापरण्यात आल्या. यामध्ये एकाही मशीनमध्ये बिघाड झाला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतदान झालेल्या मशीन तालुक्यांच्या ठिकाणी स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या असून, त्या ठिकाणी पोलिसांचा कडा पहारा ठेवण्यात आला आहे. आज, बुधवारी मतमोजणी केंद्रावरही कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार असून, मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)मतमोजणी दिवशी ‘ड्राय डे’मतमोजणीदिवशी गुरुवारी जिल्हाभर ‘ड्राय डे’ पाळण्यात येणार असून, मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. अनुचित प्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. हजारमाचीत मारामारीमतदारांची रांग लावण्याच्या कारणावरून हजारमाची (ता. कऱ्हाड) येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या प्रतिनिधींची मारामारी झाली. या प्रकारामुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी तातडीने संबंधित मतदान केंद्रास भेट दिली. त्यांनी जमाव पांगविल्याने परिसरातील तणाव निवळला.