शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

ग्रामपंचायतींसाठी ८४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2015 00:20 IST

उद्या मतमोजणी : मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सातारा : जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी सरासरी ८४ टक्के मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यास निवडणूक यंत्रणेला यश आले आहे. मतमोजणी उद्या गुरुवार, (दि. ६) तालुक्यांच्या ठिकाणी होणार असून, दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल हाती येतील,’ अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत योजनाबध्द पध्दतीने राबविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीलाच कौतुक केले. ७११ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. त्यापैकी १६१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ५५० ग्रामपंचायतींपैकी वाई तालुक्यातील जोर, बालेघर व महाबळेश्वर तालुक्यातील भोसे या गावांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने प्रत्यक्षात ५४७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान झाले. ११ हजार ९५२ इतके मतदान कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते.एकूण ३ हजार ८४१ पदांसाठी ८ हजार ७०४ उमेदवार रिंगणात होते. ८ लाख ४८ हजार ७ उमेदवारांपैकी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दुपारी साडेतीनपर्यंत ६ लाख ३२ हजार २६९ मतदान झाले. यामध्ये स्त्रियांचे मतदान ३ लाख ११ हजार ६६५, तर पुरुषांचे मतदान ३ लाख २० हजार ६०४ इतके आहे. दुपारीच जिल्हाभरात ७४.५६ टक्के मतदान झाले होते. इतक्या मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. मतदानासाठी १ हजार ९५८ मशिन्स वापरण्यात आल्या. यामध्ये एकाही मशीनमध्ये बिघाड झाला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतदान झालेल्या मशीन तालुक्यांच्या ठिकाणी स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या असून, त्या ठिकाणी पोलिसांचा कडा पहारा ठेवण्यात आला आहे. आज, बुधवारी मतमोजणी केंद्रावरही कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार असून, मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)मतमोजणी दिवशी ‘ड्राय डे’मतमोजणीदिवशी गुरुवारी जिल्हाभर ‘ड्राय डे’ पाळण्यात येणार असून, मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. अनुचित प्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. हजारमाचीत मारामारीमतदारांची रांग लावण्याच्या कारणावरून हजारमाची (ता. कऱ्हाड) येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या प्रतिनिधींची मारामारी झाली. या प्रकारामुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी तातडीने संबंधित मतदान केंद्रास भेट दिली. त्यांनी जमाव पांगविल्याने परिसरातील तणाव निवळला.