शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

दुष्काळ निवारणासाठी आठ कोटी : चव्हाण

By admin | Updated: July 13, 2014 22:52 IST

पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळाचे सावट

कऱ्हाड : ‘सातारा जिल्ह्याची दुष्काळ आढावा बैठक आज, रविवारी घेतली. परिस्थिती चिंताजनक आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आठ कोटी जिल्ह्यासाठी मदत जाहीर केली आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकारांना दिली.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आज कऱ्हाड दौऱ्यावर असताना त्यांनी शासकीय विश्रामगृहावर दुष्काळाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री शशिकांत शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, तसेच सर्व आमदार, अधिकारी उपस्थित होते. सुमारे तीन तास ही आढावा बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनी पत्रकारांना माहिती दिली.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘राज्यात सर्वत्रच पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळाचे सावट आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यास वीजनिर्मितीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. सातारा जिल्ह्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी दोन कोटी वनविभागाला, दोन कोटी जुने पाझर तलाव दुरुस्ती करण्यासाठी, तर चार कोटी इतर कारणांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करणार आहे. सध्या साखळी बंधाऱ्यांचा जिल्ह्यात चांगला प्रयोग झाला आहे. त्यामुळे पाणीपातळी सुधारण्यास मदत झाली आहे. परिणामी, त्या तालुक्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी मिटायला हातभार होणार आहे. आतापर्यंत साखळी बंधाऱ्यांसाठी आम्ही माण, खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांकडेच लक्ष दिले; पण यापुढच्या काळात जेथे जास्त पाऊस होतो, त्या तालुक्यातही साखळी बंधाऱ्यांचा प्रयोग करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) २५ हजार हेक्टरवर तयार होणार चारा !‘जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी २५ हजार हेक्टर जमिनीवर चारा तयार करण्यात येणार आहे. यंदा जिल्ह्यात अजिबात चारा टंचाई होऊ देणार नाही,’ असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.साखळी बंधाऱ्यांची बदनामी खपवून घेणार नाही !‘दुष्काळी तालुक्यातील पाण्याची टंचाई दूर करण्याच्या हेतुने साखळी बंधाऱ्यांचा प्रयोग केला. मात्र, काहीजण या कार्यक्रमाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कामे चांगली झालीच पाहिजेत. त्यांची तक्रार आहे, तर चौकशी जरूर करू; पण जाणीवपूर्वक कोणी बदनामी करीत असेल तर ते खपवून घेणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिला.