शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

७६ जीव घेणारे वळण होणार सरळ : खंबाटकीतील ‘एस’ वळण होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:58 IST

गेल्या दहा वर्षांत तब्बल ७६ जणांचे प्राण घेणारे व २८१ जणांना जखमी करणारे खंबाटकी घाटातील धोकादायक ‘एस’ वळण आता सरळ होणार आहे. दोन नवीन बोगदे व महामार्ग रुंदीकरणात हे वळण निघणार

ठळक मुद्दे‘लोकमत’मधून पाठपुरावा ; जुन्या टोलनाक्यावळ होणार उड्डाणपूल

मुराद पटेल।शिरवळ : गेल्या दहा वर्षांत तब्बल ७६ जणांचे प्राण घेणारे व २८१ जणांना जखमी करणारे खंबाटकी घाटातील धोकादायक ‘एस’ वळण आता सरळ होणार आहे. दोन नवीन बोगदे व महामार्ग रुंदीकरणात हे वळण निघणार असून, धोकादायक वळणावरील अपघातांच्या मालिकेला आता पूर्णविराम मिळणार आहे.

खंबाटकी बोगद्याच्या निर्मितीनंतर घाटाच्या वळणावर ‘एस’ प्रकारचे वळण दिल्याने याठिकाणी अपघाताचे ग्रहण लागत अपघातांची मालिका घडू लागल्याने पोलीस प्रशासनाकडून खंबाटकी घाटातील एस वळणला उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले होते. याठिकाणी होणाऱ्या अपघाताची संख्या व मृत्यूचे प्रमाण पाहता संबंधित एस वळण काढण्याची मागणी प्रवासी, वाहतूकदार व प्रशासनाकडून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे करण्यात येत होती. याबाबत कायम नागरिकांच्या मागणीला ‘लोकमत’ने सातत्याने सचित्र वृत्त देत नागरिकांच्या मागण्यांचा पाठपुरावा राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे केला आहे.

खंबाटकी घाटात दोन नवीन अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त बोगदे निर्माण करत असताना प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कर्दनकाळ ठरलेल्या एस वळण काढण्याला प्राधान्य दिले आहे. यामध्ये खंबाटकी घाटातील बोगद्यांमधून बाहेर पडल्यानंतर दिलेले वळण सरळ करत आताच्या महामार्गामध्ये रुंदीकरण करताना ‘एस’ वळण काढत एस कॉर्नरच्या काही अंतरावरून रस्ता सरळ करत खंबाटकी घाटातील जुन्या टोलनाक्यापर्यंत महामार्ग तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जुन्या टोलनाक्याजवळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपुलाची निर्मिती करणार आहे.अपघातानंतर तत्काळ आपत्कालीन सेवाखंबाटकी घाटामध्ये निर्माण करण्यात येणाºया बोगद्यांमध्ये अपघात घडल्यास अत्याधुनिक सुविधांमुळे त्याचठिकाणी लगेच कार्यान्वित करण्यात येणाºया आपत्कालीन व्यवस्थेला माहिती मिळत अपघातग्रस्तांना मदत तत्काळ उपलब्ध होणार आहे. याकरिता याठिकाणी दोन नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. 

खंबाटकी घाटात अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ‘एस’ वळण काढण्याला व महामार्ग सरळ करण्याला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने प्राधान्य दिले आहे. याठिकाणी उड्डाणपूल व दरी, पुलाची निर्मिती करण्यात येत असल्याने या ठिकाणावरून वाहतूक सुरळीत होऊन प्रवाशांचा प्रवास हा सुरक्षित व सुखकर होण्यास मदत होणार आहे.- श्रीकांत पोतदार, उपमहाव्यवस्थापक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा