शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सातारा जिल्ह्यातल्या रस्त्यांसाठी ७ हजार कोटी!

By admin | Updated: March 27, 2016 00:16 IST

१६५ किलोमीटरचे भाग्य उजळणार : म्हसवड-सातारासह पालखी मार्गाचाही समावेश

सातारा : केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने २६ हजार ८६८ कोटी खर्चाच्या रस्ता विकासकामाचे उद्घाटन सोलापूरमध्ये शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हा सोहळा सोलापूरमध्ये होत असला तरी यामुळे सातारा जिल्ह्यातील १६५ किलोमीटरच्या रस्त्याचे भाग्य उजळणार असून जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पंढरपूर-फलटण-आळंदी पालखी मार्गाचाही समावेश आहे. कोणत्याही भागाचा विकास व्हायचा असेल त्या भागातील दळणवळणाची सोय महत्त्वपूर्ण असते. कृष्णा-कोयना काठचा सुजलाम्-सुफलाम् भूप्रदेश, अनेक धरणे लाभलेला सातारा जिल्हा साखरपट्टा म्हणून नावारूपास आला. मुबलक पाण्यामुळे शिरवळ, लोणंद, सातारा, कऱ्हाड येथील औद्योगिक वसाहतींचा झपाट्याने विकास झाला. सातारा जिल्ह्यातून गेलेल्या सुमारे १४० किलोमीटरच्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गामुळे दळणवळण सुधारलेले असतानाच या मार्गावरील पुणे ते शेंद्रे दरम्यानच्या सहापदरीकरण्याचे काम सुरू झाले आहे. पुणे-कोल्हापूर या मार्गावरील रस्त्याची चांगली अवस्था असतानाच पूर्वेकडील फलटण, माण, खटाव तालुक्यांतील रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती होणे गरजेचे होते. केंद्र शासनाने तत्त्वत: मंजूर केलेल्या पंढरपूर-फलटण-आळंदी पालखी मार्गासाठी ३,७०० कोटी, म्हसवड-पिलीव-पंढरपूर मार्गासाठी १,४०० कोटी तसेच सातारा-म्हसवड-अकलूज-बार्शी-येडशी या मार्गासाठी १,९०० कोटींची तरतूद केली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यातून जाते. लोणंद शहरात आल्यानंतर तरडगाव, फलटण, विडणी, पिंप्रद, बरड मार्गे राजुरी येथे ही पालखी जाते. या रस्त्याच्या विकासासाठी १,९०० कोटींची तरतूद केली आहे. या मार्गाचे यापूर्वीच चौपदरीकरण झाले आहे. त्यातूनही लोणंद ते फलटण दरम्यानचा रस्ता सुस्थितीत असला तरी फलटण ते राजुरी दरम्यानचा रस्ता खराब असल्याने या मार्गावर वारकऱ्यांचा प्रवास खडतर असतो. नवीन कामे झाल्या माउलीच्या दर्शनाला निघालेल्या वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यास निश्चित मदत होणार आहे. याबरोबरच म्हसवड-पिलीव-पंढरपूर मार्गावर म्हसवड ते धुळदेव हा दहा ते बारा किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे. तसेच सातारा-म्हसवड-अकलूज-बार्शी-येडशी या मार्गावर सातारा ते जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या कारखेल या शंभर किलोमीटरच्या रस्त्याचे काम होणार आहे. या मार्गावर कोरेगाव, पुसेगाव, दहिवडी, गोंदवले, म्हसवड ही महत्त्वाची गावे येत आहेत. (प्रतिनिधी)