शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६७ डॉक्टरांवरील निलंबन रद्द

By admin | Updated: November 22, 2014 00:20 IST

. निलंबित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन अन्यायकारक निलंबन मागे घेण्याची विनंती केली होती.

सातारा : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी तत्त्वावर सेवेत असलेल्या राज्यातील सहाशे व सातारा जिल्ह्यातील ६७ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आघाडी शासनाच्या काळात राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ‘मॅग्मो’ संघटनेने पुकारलेल्या संपात दबावापोटी सहभागी व्हावे लागल्याने या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निलंबित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन अन्यायकारक निलंबन मागे घेण्याची विनंती केली होती. तरीही त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले नव्हते. अखेर या अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या अन्यायकारक कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटून अन्यायकारक निलंबन मागे घेण्यास विनंती केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी निलंबन रद्द केले, अशी माहिती डॉ. विक्रांत देशमुख, डॉ. किरण जाधव, डॉ. विजय लोखंडे, डॉ. सम्राट भादुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.दरम्यान, या अन्यायकारक कारवाई विरोधात राज्यातील ४२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. बुधवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनुप मेहता व न्यायमूर्ती जामदार खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत राज्य शासनाने समन्वयाची भूमिला घेतल्याने अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना सेवेत समावून घेण्याचे आदेश दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने अ‍ॅड. शेखर जगताप आणि अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)पाच महिने काम ठप्पमॅग्मो संघटनेच्या संपामुळे अन्यायकारकरीत्या निलंबित झालेले कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी आहे. सातारा जिल्ह्यातील साठ डॉक्टरांवर कारवाई झाली होती. परिणामी जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ऐंशी हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली तर अंगणवाड्यांतील एक लाख साठ लाख लाभार्थी तपासणीपासून वंचित राहिले. मुख्यमंत्र्यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे हे निलंबन मागे घेतल्याने वरील जनतेला विशेष फायदा होणार आहे. तर मुख्यमंत्र्यांनी आपण कायम तुमच्यासोबत राहू, असे आश्वासन यावेळी दिले असल्याचे डॉ. विक्रांत देशमुख यांनी सांगितले.