शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६७ डॉक्टरांवरील निलंबन रद्द

By admin | Updated: November 22, 2014 00:20 IST

. निलंबित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन अन्यायकारक निलंबन मागे घेण्याची विनंती केली होती.

सातारा : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी तत्त्वावर सेवेत असलेल्या राज्यातील सहाशे व सातारा जिल्ह्यातील ६७ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आघाडी शासनाच्या काळात राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ‘मॅग्मो’ संघटनेने पुकारलेल्या संपात दबावापोटी सहभागी व्हावे लागल्याने या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निलंबित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन अन्यायकारक निलंबन मागे घेण्याची विनंती केली होती. तरीही त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले नव्हते. अखेर या अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या अन्यायकारक कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटून अन्यायकारक निलंबन मागे घेण्यास विनंती केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी निलंबन रद्द केले, अशी माहिती डॉ. विक्रांत देशमुख, डॉ. किरण जाधव, डॉ. विजय लोखंडे, डॉ. सम्राट भादुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.दरम्यान, या अन्यायकारक कारवाई विरोधात राज्यातील ४२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. बुधवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनुप मेहता व न्यायमूर्ती जामदार खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत राज्य शासनाने समन्वयाची भूमिला घेतल्याने अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना सेवेत समावून घेण्याचे आदेश दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने अ‍ॅड. शेखर जगताप आणि अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)पाच महिने काम ठप्पमॅग्मो संघटनेच्या संपामुळे अन्यायकारकरीत्या निलंबित झालेले कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी आहे. सातारा जिल्ह्यातील साठ डॉक्टरांवर कारवाई झाली होती. परिणामी जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ऐंशी हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली तर अंगणवाड्यांतील एक लाख साठ लाख लाभार्थी तपासणीपासून वंचित राहिले. मुख्यमंत्र्यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे हे निलंबन मागे घेतल्याने वरील जनतेला विशेष फायदा होणार आहे. तर मुख्यमंत्र्यांनी आपण कायम तुमच्यासोबत राहू, असे आश्वासन यावेळी दिले असल्याचे डॉ. विक्रांत देशमुख यांनी सांगितले.