शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

जिल्ह्यातील ६७ डॉक्टरांवरील निलंबन रद्द

By admin | Updated: November 22, 2014 00:20 IST

. निलंबित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन अन्यायकारक निलंबन मागे घेण्याची विनंती केली होती.

सातारा : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी तत्त्वावर सेवेत असलेल्या राज्यातील सहाशे व सातारा जिल्ह्यातील ६७ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आघाडी शासनाच्या काळात राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ‘मॅग्मो’ संघटनेने पुकारलेल्या संपात दबावापोटी सहभागी व्हावे लागल्याने या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निलंबित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन अन्यायकारक निलंबन मागे घेण्याची विनंती केली होती. तरीही त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले नव्हते. अखेर या अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या अन्यायकारक कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटून अन्यायकारक निलंबन मागे घेण्यास विनंती केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी निलंबन रद्द केले, अशी माहिती डॉ. विक्रांत देशमुख, डॉ. किरण जाधव, डॉ. विजय लोखंडे, डॉ. सम्राट भादुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.दरम्यान, या अन्यायकारक कारवाई विरोधात राज्यातील ४२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. बुधवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनुप मेहता व न्यायमूर्ती जामदार खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत राज्य शासनाने समन्वयाची भूमिला घेतल्याने अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना सेवेत समावून घेण्याचे आदेश दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने अ‍ॅड. शेखर जगताप आणि अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)पाच महिने काम ठप्पमॅग्मो संघटनेच्या संपामुळे अन्यायकारकरीत्या निलंबित झालेले कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी आहे. सातारा जिल्ह्यातील साठ डॉक्टरांवर कारवाई झाली होती. परिणामी जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ऐंशी हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली तर अंगणवाड्यांतील एक लाख साठ लाख लाभार्थी तपासणीपासून वंचित राहिले. मुख्यमंत्र्यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे हे निलंबन मागे घेतल्याने वरील जनतेला विशेष फायदा होणार आहे. तर मुख्यमंत्र्यांनी आपण कायम तुमच्यासोबत राहू, असे आश्वासन यावेळी दिले असल्याचे डॉ. विक्रांत देशमुख यांनी सांगितले.