शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

४0 डिग्रीतही झाले ६0 टक्के मतदान; जिल्ह्यातील मतदारांनी दाखवला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क । सातारा: सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान पार पाडले. जिल्ह्यात पारा वाढला असतानादेखील मतदारांचा उत्साह ...

लोकमत न्यूज नेटवर्क । सातारा: सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान पार पाडले. जिल्ह्यात पारा वाढला असतानादेखील मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून मंगळवारी मतदान केले. ४0 अंश सेल्सिअसवर पारा गेला असताना सातारा मतदार संघात सरासरी ६0 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केल्यावर या टक्केवारीत काहीअंशी बदल होण्याची शक्यता आहे.लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्यात राष्ट्रवादी काँगे्रसचे उदयनराजे भोसले व शिवसेनेचे नरेंद्र पाटील तर माढ्यामध्ये भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादी काँगे्रसचे संजय शिंदे यांच्यात मुख्य लढत असल्याचे चित्र होते.उमेदवारांच्या विजयासाठी पक्षांनी शक्ती पणाला लावल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकीत पहिल्यांदाच ‘ईव्हीएम’सोबतच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर करण्यात आला. काही ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड तर काही ठिकाणी ‘व्हीव्हीपॅट’च्या ‘स्लीप’ न दिसणे यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती. मतदार यादीतील घोळामुळे मतदारांची तारांबळ उडाली. काही मतदार मतदानापासून वंचित राहिले.या घटनांमुळे निवडणूक यंत्रणेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. मात्र, कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे दोन्ही मतदार संघात कुठलीही अनुचित घटना घडली नाही व शांततेत मतदान पार पडले.जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारच्या सुमारास मात्र चढलेल्या पाºयाने मतदारांना घाम फोडला. ऊन कमी झाल्यानंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली.साताºयात २०१४ च्या तुलनेत सुमारे जवळपास ४ टक्के अधिक मतदान जास्त झाले. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही कमी मतदान होईल की काय, अशी चर्चा सगळीकडे होती. परंतु तरुणांनी उत्साह दाखवल्याने ही चर्चा अखेर फोल ठरली.लग्नापूर्वी पार पाडले राष्ट्रीय कर्तव्यवाई तालुक्यातील बावधन येथे राहणारे शिवराज देवराम ठोंबरे (वय २४) हे सैन्यदलात कार्यरत आहेत. मंगळवार, दि. २३ रोजी त्यांचा विवाहसोहळा कोपर्डे येथे पार पडला. विवाहाला जाण्यापूर्वी त्यांनी बावधन जिल्हा परिषद शाळेतील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. यानंतर वºहाडी मंडळींसह ते विवाह सोहळ्यासाठी कोपर्डे येथे निघून गेले. शिवराज ठोंबरे यांनी लग्नापूर्वी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. मतदान हा आपला अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे गरजेचे आहे.प्रत्येक निवडणुकीत त्यांनी केले मतदान१९५२ सालापासून साताºयात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मत देऊन शहरातील ९० ते ९४ वर्षीय दाम्पत्य असलेल्या जागरुक मतदारांनी एक अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे. पांडुरंग मारुती संकपाळ (वय ९४) व शकुंतला संकपाळ (वय ९०) दाम्पत्यानी उपनगरातील गोडोलीत मतदान केले. तसेच माण तालुक्यातील लतिका शिवराम कुलकर्णी, कºहाड तालुक्यातील हरपळवाडी येथील गुणाबाई काळभोर तर जावळी तालुक्यातील मामुर्डी येथील वेणुबाई धनवडे यांनी मतदान केले.