शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

४0 डिग्रीतही झाले ६0 टक्के मतदान; जिल्ह्यातील मतदारांनी दाखवला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क । सातारा: सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान पार पाडले. जिल्ह्यात पारा वाढला असतानादेखील मतदारांचा उत्साह ...

लोकमत न्यूज नेटवर्क । सातारा: सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान पार पाडले. जिल्ह्यात पारा वाढला असतानादेखील मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून मंगळवारी मतदान केले. ४0 अंश सेल्सिअसवर पारा गेला असताना सातारा मतदार संघात सरासरी ६0 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केल्यावर या टक्केवारीत काहीअंशी बदल होण्याची शक्यता आहे.लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्यात राष्ट्रवादी काँगे्रसचे उदयनराजे भोसले व शिवसेनेचे नरेंद्र पाटील तर माढ्यामध्ये भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादी काँगे्रसचे संजय शिंदे यांच्यात मुख्य लढत असल्याचे चित्र होते.उमेदवारांच्या विजयासाठी पक्षांनी शक्ती पणाला लावल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकीत पहिल्यांदाच ‘ईव्हीएम’सोबतच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर करण्यात आला. काही ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड तर काही ठिकाणी ‘व्हीव्हीपॅट’च्या ‘स्लीप’ न दिसणे यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती. मतदार यादीतील घोळामुळे मतदारांची तारांबळ उडाली. काही मतदार मतदानापासून वंचित राहिले.या घटनांमुळे निवडणूक यंत्रणेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. मात्र, कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे दोन्ही मतदार संघात कुठलीही अनुचित घटना घडली नाही व शांततेत मतदान पार पडले.जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारच्या सुमारास मात्र चढलेल्या पाºयाने मतदारांना घाम फोडला. ऊन कमी झाल्यानंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली.साताºयात २०१४ च्या तुलनेत सुमारे जवळपास ४ टक्के अधिक मतदान जास्त झाले. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही कमी मतदान होईल की काय, अशी चर्चा सगळीकडे होती. परंतु तरुणांनी उत्साह दाखवल्याने ही चर्चा अखेर फोल ठरली.लग्नापूर्वी पार पाडले राष्ट्रीय कर्तव्यवाई तालुक्यातील बावधन येथे राहणारे शिवराज देवराम ठोंबरे (वय २४) हे सैन्यदलात कार्यरत आहेत. मंगळवार, दि. २३ रोजी त्यांचा विवाहसोहळा कोपर्डे येथे पार पडला. विवाहाला जाण्यापूर्वी त्यांनी बावधन जिल्हा परिषद शाळेतील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. यानंतर वºहाडी मंडळींसह ते विवाह सोहळ्यासाठी कोपर्डे येथे निघून गेले. शिवराज ठोंबरे यांनी लग्नापूर्वी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. मतदान हा आपला अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे गरजेचे आहे.प्रत्येक निवडणुकीत त्यांनी केले मतदान१९५२ सालापासून साताºयात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मत देऊन शहरातील ९० ते ९४ वर्षीय दाम्पत्य असलेल्या जागरुक मतदारांनी एक अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे. पांडुरंग मारुती संकपाळ (वय ९४) व शकुंतला संकपाळ (वय ९०) दाम्पत्यानी उपनगरातील गोडोलीत मतदान केले. तसेच माण तालुक्यातील लतिका शिवराम कुलकर्णी, कºहाड तालुक्यातील हरपळवाडी येथील गुणाबाई काळभोर तर जावळी तालुक्यातील मामुर्डी येथील वेणुबाई धनवडे यांनी मतदान केले.