सातारा : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अधिकाऱ्यांकडून नवनविन उपाययोजना होत असतात. मात्र त्याला शिक्षकवर्गातून फाटे फोडले जातात. शासनानेच शिक्षकांना वर्गात मोबाईल वापरण्यावर बंदी केली होती. मात्र त्याचा वापर वाढल्याने तालुक्यामध्ये गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी छापासत्र सुरू केले आहे. एका आठवड्यात शाळांमध्ये मोबाईल वापरणारे सुमारे ६० शिक्षक आढळून आल्याने संबंधित शिक्षकांवर काय कारवाई होणार? याची चर्चा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये आहे.शासनाने वर्गात मोबाईल वापरावर बंदी केली आहे. वर्गावर जाण्यापूर्वी मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून दिलेले असताना सध्या या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शाळांमध्ये शिक्षक मोबाईलचा सर्रास वापर करतात. अशा प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आतापर्यंत तालुक्यातील वेगवेगळ्या शैक्षणिक विभागांमधील जवळपास ४० शाळांना अचानक भेटी दिल्या. शाळाभेटीदरम्यान सुमारे ६० शिक्षक अध्यापणावेळी मोबाईलचा वापर करताना दिसून आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधितांचे मोबाईल जब्त करून त्यांना सक्त सूचना केल्या. त्यानंतर मोबाईल परत करण्यात आले. असे असले तरी, गटशिक्षणाधिकारी काय कारवाई करणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागूण राहिले आहे.गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईमुळे सातारा तालुक्यात काम करण्याऱ्या प्राथमिक शिक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. तर जिल्ह्यातील इतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्राथमिक शाळांची गुणवत्ता व दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोणातून तसेच शासनाच्या मोबाईल बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शाळांच्या भेटी कराव्यात, अशी मागणी शिक्षणप्रेमींमधून तसेच पालकवर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)अध्यापणाच्या वेळी प्राथमिक शिक्षकांनी मोबाईलचा वापर टाळावा. व आदर्श अध्यापणाद्वारे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने लक्ष द्यावे. यापुढे ही गुणवत्तेच्या दृष्टिने ही मोहीम अशीच चालू ठेवणार आहे.- धनंजय चोपडेगटशिक्षणाधिकारी, साताराशिक्षकांनी घेतली धास्तीगटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी महामार्गालगत असलेल्या एका शैक्षणिक बीटमधील दहा शाळांना गेल्या आठवड्यात भेटी दिल्या होत्या. या भेटी दरम्यान काही शिक्षक शाळेच्या वेळेत मोबाईलवर बोलताना आढळले होते. त्यामुळे त्यामुळे त्यांनी संबंधित शिक्षकांचे मोबाईल जप्त केले होते. तसेच लेटकमर्स शिक्षकांवरही बेशिस्तीबद्दल कारवाई करण्यात आली होती. या कार्रवाईची शिक्षकांनी धास्ती घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
मोबाईलवेडे ६० गुरूजी येणार अडचणीत
By admin | Updated: December 5, 2014 23:36 IST