शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

मोबाईलवेडे ६० गुरूजी येणार अडचणीत

By admin | Updated: December 5, 2014 23:36 IST

गटशिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये छापासत्र; फोन जप्त करून दिली तंबी

सातारा : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अधिकाऱ्यांकडून नवनविन उपाययोजना होत असतात. मात्र त्याला शिक्षकवर्गातून फाटे फोडले जातात. शासनानेच शिक्षकांना वर्गात मोबाईल वापरण्यावर बंदी केली होती. मात्र त्याचा वापर वाढल्याने तालुक्यामध्ये गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी छापासत्र सुरू केले आहे. एका आठवड्यात शाळांमध्ये मोबाईल वापरणारे सुमारे ६० शिक्षक आढळून आल्याने संबंधित शिक्षकांवर काय कारवाई होणार? याची चर्चा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये आहे.शासनाने वर्गात मोबाईल वापरावर बंदी केली आहे. वर्गावर जाण्यापूर्वी मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून दिलेले असताना सध्या या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शाळांमध्ये शिक्षक मोबाईलचा सर्रास वापर करतात. अशा प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आतापर्यंत तालुक्यातील वेगवेगळ्या शैक्षणिक विभागांमधील जवळपास ४० शाळांना अचानक भेटी दिल्या. शाळाभेटीदरम्यान सुमारे ६० शिक्षक अध्यापणावेळी मोबाईलचा वापर करताना दिसून आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधितांचे मोबाईल जब्त करून त्यांना सक्त सूचना केल्या. त्यानंतर मोबाईल परत करण्यात आले. असे असले तरी, गटशिक्षणाधिकारी काय कारवाई करणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागूण राहिले आहे.गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईमुळे सातारा तालुक्यात काम करण्याऱ्या प्राथमिक शिक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. तर जिल्ह्यातील इतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्राथमिक शाळांची गुणवत्ता व दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोणातून तसेच शासनाच्या मोबाईल बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शाळांच्या भेटी कराव्यात, अशी मागणी शिक्षणप्रेमींमधून तसेच पालकवर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)अध्यापणाच्या वेळी प्राथमिक शिक्षकांनी मोबाईलचा वापर टाळावा. व आदर्श अध्यापणाद्वारे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने लक्ष द्यावे. यापुढे ही गुणवत्तेच्या दृष्टिने ही मोहीम अशीच चालू ठेवणार आहे.- धनंजय चोपडेगटशिक्षणाधिकारी, साताराशिक्षकांनी घेतली धास्तीगटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी महामार्गालगत असलेल्या एका शैक्षणिक बीटमधील दहा शाळांना गेल्या आठवड्यात भेटी दिल्या होत्या. या भेटी दरम्यान काही शिक्षक शाळेच्या वेळेत मोबाईलवर बोलताना आढळले होते. त्यामुळे त्यामुळे त्यांनी संबंधित शिक्षकांचे मोबाईल जप्त केले होते. तसेच लेटकमर्स शिक्षकांवरही बेशिस्तीबद्दल कारवाई करण्यात आली होती. या कार्रवाईची शिक्षकांनी धास्ती घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे.