शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

वसना योजनेसाठी हवेत ५0 कोटी

By admin | Updated: March 10, 2016 23:48 IST

कोरेगाव तालुका : आजअखेर ७० टक्के काम मार्गी; १६ वर्षांपासून योजना रखडली

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या वसना उपसा सिंचन योजनेचे आत्तापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के काम पूर्ण होण्यासाठी शासनाने ५० कोटी रुपये दिल्यास ही संपूर्ण योजना एकाच वर्षात पूर्ण होईल,असा विश्वास या योजनेच्या ठेकेदाराकडून व्यक्त होत आहे. गेल्या १६ वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या वसना उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे हस्तांतरण झाल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीने वर्षभरातच दुसऱ्या टप्प्याचेही काम पूर्ण केले आहे. यामुळे आता तिसऱ्या म्हणजे शेवटच्या टप्यातील १३ किलोमीटर नांदवळ धरणातील पाणी सोडणाऱ्या पाईपलाईनचे काम शिल्लक राहिले आहे. त्यासाठी अजून ५० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. ही रक्कम तातडीने दिल्यास या योजनेचे एका वर्षातच लोकार्पण होईल, असा विश्वास या कंपनी व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहे.आजअखेर वसना उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांचे जवळपास ८० कोटी रुपयांचे काम संबंधित कंपनीने पूर्ण केले आहे. त्यापैकी कंपनीला ७८ कोटी रुपये शासनाकडून मिळालेले आहेत. तर झालेल्या कामातील अद्यापही २ कोटी रुपये शासनाकडून कंपनीला येणे आहेत. त्यापुढील कामासाठी लागणारे ५० कोटी ते ५२ कोटी रुपये मिळाल्यास १६ वर्षांपासून पाहात असलेल्या हक्काच्या पाण्याचे स्वप्न सकार होणार आहे. वसना व वांगणा या दोन्ही पाणी योजनांचा एकत्रित भूमिपूजन समारंभ ९ मे २००० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नांदवळ येथे झाला होता. मात्र गेली १६ वर्षांत ज्या गतीने या योजनांची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे ती कामे झाली नाहीत. त्यामुळे केवळ ७८ कोटीमध्ये पूर्णत्वास येणारी वसना सिंचन योजना आज १३० कोटींवर तर ४२ कोटी रुपयांची वांगणा उपसा सिंचन योजना १३९ कोटींवर गेली आहे. वसना योजना उत्तर भागातील रेवडी ते नांदवळ या दरम्यान दोन टप्प्यांत कार्यरत होणार आहे. पहिल्या टप्प्यात यातील ६ गावांतील १५९८ व दुसऱ्या टप्प्यात ३२६२ हेक्टर क्षेत्र असे एकूण ४८६० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. वांगणा उपसा सिंचन योजने अंतर्गत या भागातील १७ गावांतील ४२०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे सध्यस्थितीत या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेच्या पूर्णत्वासाठी अजून ८० कोटींची तरतूद करण्याची गरज आहे. मात्र चालू आर्थिक वर्षात या योजनेला केवळ ८ कोटी रुपये निधी उपलब्ध केला असल्याने ही योजना ही लांबणीवर पडणार आहे.या दोन्ही रखडलेल्या पाणी योजनांसाठी गरज आहे ती केवळ एकत्रित निधीची. ज्या योजना केवळ १२६ कोटींमध्ये पूर्ण होणार होत्या. त्या योजनांसाठी आता २७१ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. १६ वर्षे निधी व अनुशेषच्या नावाखाली रखडलेल्या पाणी योजनांचा आजपर्यंत राजकारण्यांनी मतदानासाठीच वापर करीत या योजना झुलवत ठेवण्याचाच आरोप आज येथील सर्व सामान्य जनता करीत आहे. पाण्यासाठी आसुसलेल्या शेतीला योजना पूर्ण झाल्यास दिलासा मिळेल. (वार्ताहर)\आर्थिक वर्षात भरीव तरतुदीची अपेक्षा...शासनाने केवळ जलयुक्त शिवारच्या कामांना प्राधान्य देताना गेली १६ वर्षे निधीअभावी रखडलेल्या या दोन्ही पाणी योजनांसाठी येणाऱ्या आर्थिक वर्षात भरीव तरतूद करणे गरजेचे आहे. अन्यथा या योजनांचा खर्च पुन्हा त्या पटीत वाढणार आहे. वसना उपसा सिंचन योजना पूर्ण झाली तर शासनाने आत्ता हाती घेतलेल्या जलयुक्त शिवारच्या बंधाऱ्यांना कायस्वरूपी मोठा फायदा होणार आहे.