शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
3
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
4
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
5
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
6
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
7
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
8
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
9
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
10
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
11
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
12
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
13
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
14
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
15
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
16
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
17
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
18
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
19
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
20
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग

वसना योजनेसाठी हवेत ५0 कोटी

By admin | Updated: March 10, 2016 23:48 IST

कोरेगाव तालुका : आजअखेर ७० टक्के काम मार्गी; १६ वर्षांपासून योजना रखडली

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या वसना उपसा सिंचन योजनेचे आत्तापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के काम पूर्ण होण्यासाठी शासनाने ५० कोटी रुपये दिल्यास ही संपूर्ण योजना एकाच वर्षात पूर्ण होईल,असा विश्वास या योजनेच्या ठेकेदाराकडून व्यक्त होत आहे. गेल्या १६ वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या वसना उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे हस्तांतरण झाल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीने वर्षभरातच दुसऱ्या टप्प्याचेही काम पूर्ण केले आहे. यामुळे आता तिसऱ्या म्हणजे शेवटच्या टप्यातील १३ किलोमीटर नांदवळ धरणातील पाणी सोडणाऱ्या पाईपलाईनचे काम शिल्लक राहिले आहे. त्यासाठी अजून ५० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. ही रक्कम तातडीने दिल्यास या योजनेचे एका वर्षातच लोकार्पण होईल, असा विश्वास या कंपनी व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहे.आजअखेर वसना उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांचे जवळपास ८० कोटी रुपयांचे काम संबंधित कंपनीने पूर्ण केले आहे. त्यापैकी कंपनीला ७८ कोटी रुपये शासनाकडून मिळालेले आहेत. तर झालेल्या कामातील अद्यापही २ कोटी रुपये शासनाकडून कंपनीला येणे आहेत. त्यापुढील कामासाठी लागणारे ५० कोटी ते ५२ कोटी रुपये मिळाल्यास १६ वर्षांपासून पाहात असलेल्या हक्काच्या पाण्याचे स्वप्न सकार होणार आहे. वसना व वांगणा या दोन्ही पाणी योजनांचा एकत्रित भूमिपूजन समारंभ ९ मे २००० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नांदवळ येथे झाला होता. मात्र गेली १६ वर्षांत ज्या गतीने या योजनांची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे ती कामे झाली नाहीत. त्यामुळे केवळ ७८ कोटीमध्ये पूर्णत्वास येणारी वसना सिंचन योजना आज १३० कोटींवर तर ४२ कोटी रुपयांची वांगणा उपसा सिंचन योजना १३९ कोटींवर गेली आहे. वसना योजना उत्तर भागातील रेवडी ते नांदवळ या दरम्यान दोन टप्प्यांत कार्यरत होणार आहे. पहिल्या टप्प्यात यातील ६ गावांतील १५९८ व दुसऱ्या टप्प्यात ३२६२ हेक्टर क्षेत्र असे एकूण ४८६० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. वांगणा उपसा सिंचन योजने अंतर्गत या भागातील १७ गावांतील ४२०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे सध्यस्थितीत या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेच्या पूर्णत्वासाठी अजून ८० कोटींची तरतूद करण्याची गरज आहे. मात्र चालू आर्थिक वर्षात या योजनेला केवळ ८ कोटी रुपये निधी उपलब्ध केला असल्याने ही योजना ही लांबणीवर पडणार आहे.या दोन्ही रखडलेल्या पाणी योजनांसाठी गरज आहे ती केवळ एकत्रित निधीची. ज्या योजना केवळ १२६ कोटींमध्ये पूर्ण होणार होत्या. त्या योजनांसाठी आता २७१ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. १६ वर्षे निधी व अनुशेषच्या नावाखाली रखडलेल्या पाणी योजनांचा आजपर्यंत राजकारण्यांनी मतदानासाठीच वापर करीत या योजना झुलवत ठेवण्याचाच आरोप आज येथील सर्व सामान्य जनता करीत आहे. पाण्यासाठी आसुसलेल्या शेतीला योजना पूर्ण झाल्यास दिलासा मिळेल. (वार्ताहर)\आर्थिक वर्षात भरीव तरतुदीची अपेक्षा...शासनाने केवळ जलयुक्त शिवारच्या कामांना प्राधान्य देताना गेली १६ वर्षे निधीअभावी रखडलेल्या या दोन्ही पाणी योजनांसाठी येणाऱ्या आर्थिक वर्षात भरीव तरतूद करणे गरजेचे आहे. अन्यथा या योजनांचा खर्च पुन्हा त्या पटीत वाढणार आहे. वसना उपसा सिंचन योजना पूर्ण झाली तर शासनाने आत्ता हाती घेतलेल्या जलयुक्त शिवारच्या बंधाऱ्यांना कायस्वरूपी मोठा फायदा होणार आहे.