शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

वसना योजनेसाठी हवेत ५0 कोटी

By admin | Updated: March 10, 2016 23:48 IST

कोरेगाव तालुका : आजअखेर ७० टक्के काम मार्गी; १६ वर्षांपासून योजना रखडली

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या वसना उपसा सिंचन योजनेचे आत्तापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के काम पूर्ण होण्यासाठी शासनाने ५० कोटी रुपये दिल्यास ही संपूर्ण योजना एकाच वर्षात पूर्ण होईल,असा विश्वास या योजनेच्या ठेकेदाराकडून व्यक्त होत आहे. गेल्या १६ वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या वसना उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे हस्तांतरण झाल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीने वर्षभरातच दुसऱ्या टप्प्याचेही काम पूर्ण केले आहे. यामुळे आता तिसऱ्या म्हणजे शेवटच्या टप्यातील १३ किलोमीटर नांदवळ धरणातील पाणी सोडणाऱ्या पाईपलाईनचे काम शिल्लक राहिले आहे. त्यासाठी अजून ५० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. ही रक्कम तातडीने दिल्यास या योजनेचे एका वर्षातच लोकार्पण होईल, असा विश्वास या कंपनी व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहे.आजअखेर वसना उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांचे जवळपास ८० कोटी रुपयांचे काम संबंधित कंपनीने पूर्ण केले आहे. त्यापैकी कंपनीला ७८ कोटी रुपये शासनाकडून मिळालेले आहेत. तर झालेल्या कामातील अद्यापही २ कोटी रुपये शासनाकडून कंपनीला येणे आहेत. त्यापुढील कामासाठी लागणारे ५० कोटी ते ५२ कोटी रुपये मिळाल्यास १६ वर्षांपासून पाहात असलेल्या हक्काच्या पाण्याचे स्वप्न सकार होणार आहे. वसना व वांगणा या दोन्ही पाणी योजनांचा एकत्रित भूमिपूजन समारंभ ९ मे २००० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नांदवळ येथे झाला होता. मात्र गेली १६ वर्षांत ज्या गतीने या योजनांची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे ती कामे झाली नाहीत. त्यामुळे केवळ ७८ कोटीमध्ये पूर्णत्वास येणारी वसना सिंचन योजना आज १३० कोटींवर तर ४२ कोटी रुपयांची वांगणा उपसा सिंचन योजना १३९ कोटींवर गेली आहे. वसना योजना उत्तर भागातील रेवडी ते नांदवळ या दरम्यान दोन टप्प्यांत कार्यरत होणार आहे. पहिल्या टप्प्यात यातील ६ गावांतील १५९८ व दुसऱ्या टप्प्यात ३२६२ हेक्टर क्षेत्र असे एकूण ४८६० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. वांगणा उपसा सिंचन योजने अंतर्गत या भागातील १७ गावांतील ४२०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे सध्यस्थितीत या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेच्या पूर्णत्वासाठी अजून ८० कोटींची तरतूद करण्याची गरज आहे. मात्र चालू आर्थिक वर्षात या योजनेला केवळ ८ कोटी रुपये निधी उपलब्ध केला असल्याने ही योजना ही लांबणीवर पडणार आहे.या दोन्ही रखडलेल्या पाणी योजनांसाठी गरज आहे ती केवळ एकत्रित निधीची. ज्या योजना केवळ १२६ कोटींमध्ये पूर्ण होणार होत्या. त्या योजनांसाठी आता २७१ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. १६ वर्षे निधी व अनुशेषच्या नावाखाली रखडलेल्या पाणी योजनांचा आजपर्यंत राजकारण्यांनी मतदानासाठीच वापर करीत या योजना झुलवत ठेवण्याचाच आरोप आज येथील सर्व सामान्य जनता करीत आहे. पाण्यासाठी आसुसलेल्या शेतीला योजना पूर्ण झाल्यास दिलासा मिळेल. (वार्ताहर)\आर्थिक वर्षात भरीव तरतुदीची अपेक्षा...शासनाने केवळ जलयुक्त शिवारच्या कामांना प्राधान्य देताना गेली १६ वर्षे निधीअभावी रखडलेल्या या दोन्ही पाणी योजनांसाठी येणाऱ्या आर्थिक वर्षात भरीव तरतूद करणे गरजेचे आहे. अन्यथा या योजनांचा खर्च पुन्हा त्या पटीत वाढणार आहे. वसना उपसा सिंचन योजना पूर्ण झाली तर शासनाने आत्ता हाती घेतलेल्या जलयुक्त शिवारच्या बंधाऱ्यांना कायस्वरूपी मोठा फायदा होणार आहे.