शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

अतिवृष्टीत ४९ हजार शेतकऱ्यांचा मोडला कणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात मागील चार आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा एक-दोन नव्हे, तर ८०० हून अधिक गावांतील शेतकऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात मागील चार आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा एक-दोन नव्हे, तर ८०० हून अधिक गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला. यामध्ये ८८२५ हेक्टरवरील पिकांची हानी झाली असून, ४९०५१ शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला आहे. तर या शेतकऱ्यांचे साडेसात कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात चार आठवड्यांपूर्वी अतिवृष्टी झाली होती. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर भागात मुसळधार पाऊस पडत होता. या पावसाचा फटका सर्वाधिक महाबळेश्वर, सातारा, जावळी, वाई, कऱ्हाड आणि पाटण तालुक्याला बसला. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील जमिनी वाहून गेल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्या सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी, कऱ्हाड आणि पाटण तालुक्यातील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये ८८२५.७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर बाधित शेतकरी संख्या ४९०५१ आहे, तर ७ कोटी ५६ लाख ३९ हजार रुपयांचे पीक नुकसान झाल्याची आकडेवारीही समोर आली आहे.

अतिवृष्टीमुळे सर्वाधिक पीक नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील १९७५६ शेतकऱ्यांचे ३६३७ हेक्टरवरील पिकांचे २ कोटी ३७ लाखांचे नुकसान झाले आहे, तर कऱ्हाड तालुक्यात १४३०९ शेतकऱ्यांचे २३९१ हेक्टर पिकांचे २ कोटी ९५ लाखांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पिकांचे आणि जमिनीचे नुकसान झाले आहे. पाटणमध्ये भात आणि नाचणी पिकांची हानी झाली आहे.

जावळी तालुक्यात भात, नाचणीबरोबरच सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. कऱ्हाड तालुक्यात भात, सोयाबीन, ऊस आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर सातारा तालुक्यातही पिकांचे नुकसान झाले आहे. साताऱ्यात भात, नाचणी आणि सोयाबीन आदी पिकांची हानी झाली आहे.

चौकट :

अतिवृष्टीतील बाधित पीक क्षेत्र माहिती

तालुका नुकसान क्षेत्र (हेक्टर) बाधित शेतकरी अपेक्षित निधी

सातारा ४२७ २३७२ ३८ लाख

महाबळेश्वर १५८६ ६२४१ १ कोटी ९ लाख

वाई ५०५ ३३६९ ४४ लाख ३७ हजार

जावळी २७७ ३००४ ३२ लाख १५ हजार

कऱ्हाड २३९१ १४३०९ २ कोटी ९५ लाख

पाटण ३६३७ १९७५६ २ कोटी ३७ लाख