शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

स्ट्रॉबेरी उत्पादकांमध्ये ४०० शेतकरी पदवीधर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:10 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उच्च शिक्षण घेऊन खासगी कंपन्यांमध्ये अनेक युवक नोकरी करीत आहेत. तर अनेकांची आजही नोकरीच्या शोधार्थ भटकंती सुरू आहे. मात्र, महाबळेश्वर तालुक्यातील एकूण स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकºयांपैकी तब्बल ४०० शेतकरी पदवीधर असून, त्यांनी नोकरीऐवजी शेतीला प्राधान्य दिले आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन या शेतकºयांनी व्यवसायाचा नवा ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उच्च शिक्षण घेऊन खासगी कंपन्यांमध्ये अनेक युवक नोकरी करीत आहेत. तर अनेकांची आजही नोकरीच्या शोधार्थ भटकंती सुरू आहे. मात्र, महाबळेश्वर तालुक्यातील एकूण स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकºयांपैकी तब्बल ४०० शेतकरी पदवीधर असून, त्यांनी नोकरीऐवजी शेतीला प्राधान्य दिले आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन या शेतकºयांनी व्यवसायाचा नवा मार्ग स्वीकारला आहे.महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी हे मुख्य पीक आहे. ब्रिटिशकाळापासून या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. येथील भौगौलिक, नैसर्गिक परिस्थिती या पिकाला पोषक असल्याने गेल्या सात-आठ दशकात स्ट्रॉबेरी क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. यंदा तालुक्यात २ हजार ८०० एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली असून, १ हजार ८५० शेतकरी या शेतीशी जोडले गेले आहे.एकीकडे स्ट्रॉबेरी उत्पादकांची संख्या वाढत असताना आता उच्चशिक्षित युवकही नोकरीऐवजी या शेतीकडे वळू लागले आहे. एकूण १ हजार ८५० स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकºयांपैकी ४०० शेतकरी हे पदवीधर असून, अनेकांनी एमबीए, मॅकेनिकल इंजिनिअर, बीई अशा डिग्य्राही घेतल्या आहेत. शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अनेक शेतकरी कमी क्षेत्रातही स्ट्रॉबेरीचे अधिक उत्पादन घेत आहेत. काही शेतकºयांनी ‘हायड्रोफोनिक’ तंत्रज्ञनाच्या माध्यमातूनही स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. पदवीधर अनेक शेतकरी वर्षाला दोनशे ते तीनशे टन स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आहेत. स्ट्रॉबेरी हे सहा ते सात महिन्यांचे पीक आहे. त्यामुळे हे शेतकरी उर्वरित कालावधीत पालेभाज्यांची लावगड नफा मिळवित आहेत.वार्षिक २०० कोटींची उलाढाल !तालुक्यातून दरवर्षी हजारो टन स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. दिल्ली, हैद्राबाद, बेंगलोर यासारख्या राज्यात तसेच विदेशातही स्ट्रॉबेरीची निर्यात केली जाते. स्ट्रॉबेरी खरेदी-विक्रीच्या माध्यामातून दरवर्षी सुमारे २०० कोटींची उलाढात होते, अशी माहिती महाबळेश्वर सहकारी फळे, फुले भाजीपाला खेरदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष किसनशेठ भिलारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.एकूण १८० पॉलिहाऊसमहाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही वर्षांत १८० पॉलिहाऊस उभारण्यात आले आहे. यासाठी शासनाने शेतकºयांना अनुदानही दिले आहे. पॉलिहाऊसच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीच्या एका रोपापासून सुमारे ५० नव्या रोपांची शाखीय वाढपद्धतीने निर्मिती केली जाते. तसेच अतिवृष्टीपासून रोपांचे संरक्षणही होते. पॉलिहाऊसच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे.