शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

जिल्ह्यात आढळले ३८७ क्षय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने संयुक्त क्षय आणि कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने संयुक्त क्षय आणि कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत क्षयचे ३८७, तर कुष्ठरोगाचे २२१ रुग्ण आढळून आले. या सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, या आजाराबाबत कोणाला लक्षणे जाणवल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे क्षय आणि कुष्ठरुग्णांचे निदान व त्यांना औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण अनेक वर्षांच्या तुलनेत अत्यंत कमी झालेले आहे. त्यामुळे सामाजील सर्व क्षय आणि कुष्ठरुग्णांचा शोध घेणे, आजाराचे निदान करणे आणि त्यानंतर त्यांच्यावर औषधोपचार होणे महत्त्वाचे आहे. हाच हेतू ठेवून रुग्ण शोधण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार संयुक्त शोध अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले.

जिल्ह्यातील या अभियानात २ हजार ६५१ पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकाद्वारे जिल्ह्यातील २८ लाख ९४ हजार ३१६ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये क्षयचे ३६ हजार ६६९ संशयित आढळून आले. त्यामधील ३४ हजार ६७३ जणांची थुंकी तपसण्यात आली, तर २३ हजार १७१ संशयितांचा एक्सरे काढण्यात आला. यामध्ये ३८७ जणांना क्षयरोग झाल्याचे निदान झाले. त्याचबरोबर याच पथकाने तपासणी केल्यानंतर कुष्ठरोगाचे १२ हजार ४०१ संशयित आढळून आले. यामध्ये एमबीचे १०८, तर पीबीचे ११३ असे एकूण २२१ रुग्ण स्पष्ट झाले.

जिल्ह्यात हे अभियान जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, कुष्ठरोग विभागाचे डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.

कोट :

महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यात संयुक्त क्षय आणि कुष्ठरुग्ण शोधमोहीम अभियान राबविण्यात आले. याबाबत जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी आरोग्य विभागास सहकार्य करावे. तसेच कोणा व्यक्तीत अशा आजाराची लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाला माहिती देऊन या उपक्रमास सहकार्य करावे.

- शेखर सिंह, जिल्हाधिकारी

...............

जिल्ह्यात क्षय आणि कुष्ठरुग्ण शोधमोहीम राबविण्यात आली. तसेच आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षणही करण्यात आले आहे. याला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांनी अशा आजाराबाबत लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्रात तपासणी करून औषधोपचार घ्यावा.

- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

.......................................................