शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

३८ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या केवळ २६!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी तीन वर्षांत ३८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २६ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश ...

सातारा : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी तीन वर्षांत ३८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २६ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले तर १२ मुलींचा अद्यापही शोध सुरू आहे. कोरोना काळात अनेक निर्बंध आल्याने अल्पवयीन मुली घरातच लाॅक झाल्या. बाहेर फिरण्यावर बंधने आल्याने या वर्षी मुली बेपत्ता होण्याचा आकडा कमी आहे.

अल्पवयीन मुलगी हरविलेली किंवा पळवून नेलेली असली तर त्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. बहुतांश प्रकरणांत महिला व मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस दप्तरी मात्र, अशा प्रकरणात अपहरणाचा आकडा मोठा दिसतो. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असते. दरम्यान, पालकांसोबत न गेलेल्या अल्पवयीन मुलींना शासकीय निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातून मुलींसोबतच ८९ मुलेही बेपत्ता झाली आहेत. त्यात १८ वर्षांच्या आतील २९ मुलांचा समावेश आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत जिल्ह्यातून पलायन केलेल्या २४ मुलींपैकी १५ मुलींचा शोध लागला आहे. तर उर्वरित मुलींचा शोध घेण्यात येत आहे.

कोरोना व लाॅकडाऊन यामुळे मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण किंचित घटले आहे. कोरोनामुळे बाहेर जिल्हा व इतर राज्यांत तपासाला जायला अडचणी येऊ लागल्या. राज्य सोडून जायचे असेल तर त्यासाठी पोलीस अधीक्षकांची परवानगी लागते. कोरोना काळात बस व रेल्वे सेवा बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही मुलींकडे मोबाइलच नसल्याने तपासाच्या दृष्टिकोनातून आणखी अडचणी निर्माण होऊ लागल्या

चाैकट : मुली चुकतात कुठे?

चांगले - वाईट ओळखा

वयाच्या १४ व्या वर्षापासून चांगले काय वाईट काय, याची समज मुलींना असते. सहकारी मैत्रीण यांची संगत कशी आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या घरातील वातावरण व बाहेरील वातावरण याचा परिणाम मुलींवर होतो. या वयात मुली मैत्रिणींचेच जास्त ऐकतात. कुटुंबीयांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.

चाैकट : मोबाइल कमी वापरा

मुलींनी मोबाइलचा वापर कमी करावा. आई-वडील यांच्याशी पालक यापेक्षा मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. बाहेर जे काही घडत असेल ती प्रत्येक गोष्ट घरी सांगितली पाहिजे. नेमके हेच मुलींकडून होत नाही. बाहेर काही चुकीचे घडले असेल तर भीतीपोटी मुली घरी सांगत नाहीत. उलट सांगितले तर पुढची संकटे टाळता येतात.

चाैकट : हे आहे उदाहरण..

सातारा शहरातील एका प्रकरणात मुलीची ओळख पेठेतील मुलासोबत झाली. त्यातून मैत्री झाली. या मैत्रीतून बाहेर फिरणे सुरू झाले. मुलीच्या मनात किंचितही वाईट हेतू नव्हता. मुलाने दोघे एकत्र असल्याचे फोटो काढले. पुढे हेच फोटो दाखवून तो मुलीला ब्लॅकमेल करू लागला. एवढेच नव्हेतर, त्या मुलाने मुलीवर अत्याचारही केला. यातून मुलगी गर्भवती राहिली. त्या वेळी हा प्रकार समाेर आला. ही घटना घडण्यापूर्वीच जर मुलीने घरातल्यांना हा प्रकार सांगितला असता तर हे संकट ओढवले नसते.

चाैकट : मुला-मुलीचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र

मुला-मुलींशी प्रत्येक पालकाने मैत्री करावी. प्रत्येक गोष्ट, सभोवताली घडणाऱ्या घटना, चांगले-वाईट हे त्यांना समजावून सांगावे. कोणताच संकोच मनात बाळगू नये.

अल्पवयीन मुला-मुलींना समज कमी असते. बाहेरील मित्र-मैत्रिणी यांच्याशी जास्त वेळ गप्पा होत असल्या तरी त्याबाबत त्यांना समजावून सांगितले पाहिजे. एखाद्या मुलाचे - मुलीचे पाऊल चुकीचे पडत असेल तर लगेच लक्षात येते. त्याबाबत त्यांना प्रेमाने व मैत्रीच्या नात्याने समजावून सांगणे केव्हाही चांगले.

वयाच्या १५ वर्षांनंतर मुला - मुलीमध्ये बदल जाणवतो. मोबाइलचा अति वापर केव्हाही टाळला पाहिजे. मुलांना ते समजावून सांगावे. ऑनलाइन अभ्यासाव्यतिरिक्त मोबाइल हाताळू देऊ नये. मोबाइल जास्त वापरू नये. त्याची काही उदाहरणे देऊन मुलांना ते पटवून सांगितले पाहिजे.