शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

३८ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या केवळ २६!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी तीन वर्षांत ३८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २६ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश ...

सातारा : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी तीन वर्षांत ३८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २६ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले तर १२ मुलींचा अद्यापही शोध सुरू आहे. कोरोना काळात अनेक निर्बंध आल्याने अल्पवयीन मुली घरातच लाॅक झाल्या. बाहेर फिरण्यावर बंधने आल्याने या वर्षी मुली बेपत्ता होण्याचा आकडा कमी आहे.

अल्पवयीन मुलगी हरविलेली किंवा पळवून नेलेली असली तर त्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. बहुतांश प्रकरणांत महिला व मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस दप्तरी मात्र, अशा प्रकरणात अपहरणाचा आकडा मोठा दिसतो. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असते. दरम्यान, पालकांसोबत न गेलेल्या अल्पवयीन मुलींना शासकीय निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातून मुलींसोबतच ८९ मुलेही बेपत्ता झाली आहेत. त्यात १८ वर्षांच्या आतील २९ मुलांचा समावेश आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत जिल्ह्यातून पलायन केलेल्या २४ मुलींपैकी १५ मुलींचा शोध लागला आहे. तर उर्वरित मुलींचा शोध घेण्यात येत आहे.

कोरोना व लाॅकडाऊन यामुळे मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण किंचित घटले आहे. कोरोनामुळे बाहेर जिल्हा व इतर राज्यांत तपासाला जायला अडचणी येऊ लागल्या. राज्य सोडून जायचे असेल तर त्यासाठी पोलीस अधीक्षकांची परवानगी लागते. कोरोना काळात बस व रेल्वे सेवा बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही मुलींकडे मोबाइलच नसल्याने तपासाच्या दृष्टिकोनातून आणखी अडचणी निर्माण होऊ लागल्या

चाैकट : मुली चुकतात कुठे?

चांगले - वाईट ओळखा

वयाच्या १४ व्या वर्षापासून चांगले काय वाईट काय, याची समज मुलींना असते. सहकारी मैत्रीण यांची संगत कशी आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या घरातील वातावरण व बाहेरील वातावरण याचा परिणाम मुलींवर होतो. या वयात मुली मैत्रिणींचेच जास्त ऐकतात. कुटुंबीयांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.

चाैकट : मोबाइल कमी वापरा

मुलींनी मोबाइलचा वापर कमी करावा. आई-वडील यांच्याशी पालक यापेक्षा मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. बाहेर जे काही घडत असेल ती प्रत्येक गोष्ट घरी सांगितली पाहिजे. नेमके हेच मुलींकडून होत नाही. बाहेर काही चुकीचे घडले असेल तर भीतीपोटी मुली घरी सांगत नाहीत. उलट सांगितले तर पुढची संकटे टाळता येतात.

चाैकट : हे आहे उदाहरण..

सातारा शहरातील एका प्रकरणात मुलीची ओळख पेठेतील मुलासोबत झाली. त्यातून मैत्री झाली. या मैत्रीतून बाहेर फिरणे सुरू झाले. मुलीच्या मनात किंचितही वाईट हेतू नव्हता. मुलाने दोघे एकत्र असल्याचे फोटो काढले. पुढे हेच फोटो दाखवून तो मुलीला ब्लॅकमेल करू लागला. एवढेच नव्हेतर, त्या मुलाने मुलीवर अत्याचारही केला. यातून मुलगी गर्भवती राहिली. त्या वेळी हा प्रकार समाेर आला. ही घटना घडण्यापूर्वीच जर मुलीने घरातल्यांना हा प्रकार सांगितला असता तर हे संकट ओढवले नसते.

चाैकट : मुला-मुलीचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र

मुला-मुलींशी प्रत्येक पालकाने मैत्री करावी. प्रत्येक गोष्ट, सभोवताली घडणाऱ्या घटना, चांगले-वाईट हे त्यांना समजावून सांगावे. कोणताच संकोच मनात बाळगू नये.

अल्पवयीन मुला-मुलींना समज कमी असते. बाहेरील मित्र-मैत्रिणी यांच्याशी जास्त वेळ गप्पा होत असल्या तरी त्याबाबत त्यांना समजावून सांगितले पाहिजे. एखाद्या मुलाचे - मुलीचे पाऊल चुकीचे पडत असेल तर लगेच लक्षात येते. त्याबाबत त्यांना प्रेमाने व मैत्रीच्या नात्याने समजावून सांगणे केव्हाही चांगले.

वयाच्या १५ वर्षांनंतर मुला - मुलीमध्ये बदल जाणवतो. मोबाइलचा अति वापर केव्हाही टाळला पाहिजे. मुलांना ते समजावून सांगावे. ऑनलाइन अभ्यासाव्यतिरिक्त मोबाइल हाताळू देऊ नये. मोबाइल जास्त वापरू नये. त्याची काही उदाहरणे देऊन मुलांना ते पटवून सांगितले पाहिजे.