शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

३८ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या केवळ २६!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी तीन वर्षांत ३८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २६ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश ...

सातारा : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी तीन वर्षांत ३८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २६ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले तर १२ मुलींचा अद्यापही शोध सुरू आहे. कोरोना काळात अनेक निर्बंध आल्याने अल्पवयीन मुली घरातच लाॅक झाल्या. बाहेर फिरण्यावर बंधने आल्याने या वर्षी मुली बेपत्ता होण्याचा आकडा कमी आहे.

अल्पवयीन मुलगी हरविलेली किंवा पळवून नेलेली असली तर त्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. बहुतांश प्रकरणांत महिला व मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस दप्तरी मात्र, अशा प्रकरणात अपहरणाचा आकडा मोठा दिसतो. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असते. दरम्यान, पालकांसोबत न गेलेल्या अल्पवयीन मुलींना शासकीय निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातून मुलींसोबतच ८९ मुलेही बेपत्ता झाली आहेत. त्यात १८ वर्षांच्या आतील २९ मुलांचा समावेश आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत जिल्ह्यातून पलायन केलेल्या २४ मुलींपैकी १५ मुलींचा शोध लागला आहे. तर उर्वरित मुलींचा शोध घेण्यात येत आहे.

कोरोना व लाॅकडाऊन यामुळे मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण किंचित घटले आहे. कोरोनामुळे बाहेर जिल्हा व इतर राज्यांत तपासाला जायला अडचणी येऊ लागल्या. राज्य सोडून जायचे असेल तर त्यासाठी पोलीस अधीक्षकांची परवानगी लागते. कोरोना काळात बस व रेल्वे सेवा बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही मुलींकडे मोबाइलच नसल्याने तपासाच्या दृष्टिकोनातून आणखी अडचणी निर्माण होऊ लागल्या

चाैकट : मुली चुकतात कुठे?

चांगले - वाईट ओळखा

वयाच्या १४ व्या वर्षापासून चांगले काय वाईट काय, याची समज मुलींना असते. सहकारी मैत्रीण यांची संगत कशी आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या घरातील वातावरण व बाहेरील वातावरण याचा परिणाम मुलींवर होतो. या वयात मुली मैत्रिणींचेच जास्त ऐकतात. कुटुंबीयांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.

चाैकट : मोबाइल कमी वापरा

मुलींनी मोबाइलचा वापर कमी करावा. आई-वडील यांच्याशी पालक यापेक्षा मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. बाहेर जे काही घडत असेल ती प्रत्येक गोष्ट घरी सांगितली पाहिजे. नेमके हेच मुलींकडून होत नाही. बाहेर काही चुकीचे घडले असेल तर भीतीपोटी मुली घरी सांगत नाहीत. उलट सांगितले तर पुढची संकटे टाळता येतात.

चाैकट : हे आहे उदाहरण..

सातारा शहरातील एका प्रकरणात मुलीची ओळख पेठेतील मुलासोबत झाली. त्यातून मैत्री झाली. या मैत्रीतून बाहेर फिरणे सुरू झाले. मुलीच्या मनात किंचितही वाईट हेतू नव्हता. मुलाने दोघे एकत्र असल्याचे फोटो काढले. पुढे हेच फोटो दाखवून तो मुलीला ब्लॅकमेल करू लागला. एवढेच नव्हेतर, त्या मुलाने मुलीवर अत्याचारही केला. यातून मुलगी गर्भवती राहिली. त्या वेळी हा प्रकार समाेर आला. ही घटना घडण्यापूर्वीच जर मुलीने घरातल्यांना हा प्रकार सांगितला असता तर हे संकट ओढवले नसते.

चाैकट : मुला-मुलीचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र

मुला-मुलींशी प्रत्येक पालकाने मैत्री करावी. प्रत्येक गोष्ट, सभोवताली घडणाऱ्या घटना, चांगले-वाईट हे त्यांना समजावून सांगावे. कोणताच संकोच मनात बाळगू नये.

अल्पवयीन मुला-मुलींना समज कमी असते. बाहेरील मित्र-मैत्रिणी यांच्याशी जास्त वेळ गप्पा होत असल्या तरी त्याबाबत त्यांना समजावून सांगितले पाहिजे. एखाद्या मुलाचे - मुलीचे पाऊल चुकीचे पडत असेल तर लगेच लक्षात येते. त्याबाबत त्यांना प्रेमाने व मैत्रीच्या नात्याने समजावून सांगणे केव्हाही चांगले.

वयाच्या १५ वर्षांनंतर मुला - मुलीमध्ये बदल जाणवतो. मोबाइलचा अति वापर केव्हाही टाळला पाहिजे. मुलांना ते समजावून सांगावे. ऑनलाइन अभ्यासाव्यतिरिक्त मोबाइल हाताळू देऊ नये. मोबाइल जास्त वापरू नये. त्याची काही उदाहरणे देऊन मुलांना ते पटवून सांगितले पाहिजे.