शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

तब्बल ३५ पोलिसांची धावपळ थांबणार!

By admin | Updated: April 20, 2015 00:12 IST

अतिरिक्त श्रमांची बचत : दौऱ्यावरील मंत्र्यांना मानवंदना बंद करण्याच्या निर्णयामुळे तपासासाठी अधिक वेळ

राजीव मुळ्ये - सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांना देण्यात येणारी मानवंदना यापुढे बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. यामुळे याकामी गुंतणारे तब्बल चौतीस जणांचे मनुष्यबळ तपासकामाकडे वळविणे शक्य होणार असून, दोन दिवस चालणारी धावपळ थांबणार आहे.मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाविषयी पोलिसांकडे अद्याप लेखी स्वरूपात कोणतेही आदेश आलेले नसले, तरी लवकरच ते प्राप्त होतील. तपास आणि बंदोबस्तासाठी उपलब्ध पोलीस बळाचा वापर होत असतानाच ‘व्हीआयपी’चा दौरा येतो आणि बरेच मोठे मनुष्यबळ या दौऱ्यात गुंतून राहते. पोलिसांना दौऱ्याच्या वेळी दुहेरी भूमिका बजावावी लागते. मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्री, अधिकाऱ्याला सुरक्षा देण्यासाठी जिल्ह्याच्या हद्दीपासून मनुष्यबळ पुरवावे लागते. शिवाय, जिल्ह्याच्या मुख्यालयात मानवंदना द्यावी लागते.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव पातळीवरील अधिकारी तसेच महानिरीक्षक आणि त्याहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मानवंदना देण्याची पद्धत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मानवंदना देताना पोलीस बँड उपस्थित असतो. कमीत कमी १८ पोलीस कर्मचाऱ्यांची तुकडी त्यांना मानवंदना देते. सहा जणांची एक रांग अशा तीन रांगा केल्या जातात. त्यांचे नेतृत्व एक अधिकारी करतो. शिवाय, पोलीस बँडचा ताफा १६ जणांचा असतो. म्हणजेच ३४ कर्मचारी आणि एक अधिकारी केवळ मानवंदनेच्या कामी रुजून पडतात. मंत्री किंवा अधिकाऱ्यांच्या मानवंदनेला पोलीस बँड उपस्थित नसतो. केवळ एक बिगूल वाजविला जातो आणि त्यासाठी एकच कर्मचारी लागतो.मानवंदना देण्यासाठी सराव असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक होत असली, तरी आदल्या दिवशी सराव केला जातो. याखेरीज कपड्यांना कडक इस्त्री करणे, बुटांना पॉलिश करणे या कामांतही कर्मचाऱ्यांचा वेळ जातो. मानवंदना देताना कर्मचाऱ्यांना मुख्य बेल्टवर आणखी एक खास बेल्ट लावावा लागतो. तोही तयार आदल्या दिवशीच करून ठेवावा लागतो. ‘व्हीआयपीं’च्या दौऱ्यावेळी होणारी एवढी सारी धावपळ या एकाच निर्णयामुळे थांबणार आहे. व्यूहात्मक सुरक्षा कायममानवंदनेखेरीज ‘व्हीआयपीं’ना दर्जानुसार सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. झेड, झेड प्लस, एक्सवाय अशा दर्जांसाठी वेगवेगळे मनुष्यबळ लागते. यासाठीही कमीत कमी वीस पोलीस उपलब्ध करून द्यावे लागतात. याला ‘टॅक्टिकल सिक्युरिटी’ म्हणजेच व्यूहात्मक सुरक्षा असे म्हणतात. ही सुरक्षा यापुढेही सुरूच राहणार आहे. मात्र, मानवंदना (गार्ड आॅफ आॅनर) बंद झाल्यास किमान ३५ जणांची दोन दिवसांची धावपळ थांबणार आहे.