शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात २७१ कन्या लक्षाधीश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:43 IST

मलकापूर : ‘प्रियदर्शनी कन्यारत्न योजना’ येथील पालिकेने राबवली आहे. ही योजना दहा वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. या योजनेंतर्गत शहरातील ...

मलकापूर : ‘प्रियदर्शनी कन्यारत्न योजना’ येथील पालिकेने राबवली आहे. ही योजना दहा वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. या योजनेंतर्गत शहरातील २७१ कुटुंबातील मुलींना लाभ मिळाला आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या विसाव्या वर्षी एक लाख रुपये मिळत असल्यामुळे मलकापुरात जन्मलेली मुलगी जन्मत:च लक्षाधीश होत आहे. त्यामुळे ही मुदत ठेव योजना स्त्री शक्तीला बळ देणारी योजना ठरत आहे.

येथील पालिकेने आजपर्यंत विकासकामांबरोबरच सामाजिक प्रश्नांनाही तेवढेच महत्त्व दिले आहे. विविध नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मुलगी जन्माला येण्यापूर्वीच काहीवेळा भ्रूणहत्या केली जाते. ही प्रवृत्ती रोखणे व कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, ही भावना ठेवून पालिकेने देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी २०११ पासून ‘लेक वाचवा’ अभियानांतर्गत ही नावीण्यपूर्ण योजना शहरात राबविण्याचा निर्णय घेतला.

योजनेंतर्गत शहरात जन्मलेल्या मुलीच्या नावावर पंधरा हजार रुपयांची ठेव पावती केली जाते. ठेव पावती मुलगी, आई व मुख्याधिकारी यांच्या नावे संयुक्तरीत्या ठेवली जाते. पावतीला २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित मुलीला एक लाखाचा लाभ मिळणार आहे. पूर्वी योजनेत सहभागी होण्यासाठी मुलगी जन्मानंतर दोन वर्षापर्यंतची मुदत होती. ती मुदत आता तीन वर्षे केलेली आहे. आज अखेर शहरात जन्मलेल्या २७१ मुलींनी याचा लाभ मिळाला आहे. मुलीच्या शिक्षणाला किंवा लग्नाला या रकमेचा वापर होणार आहे. त्यामुळे पालकांची चिंता कमी झालेली आहे. या योजनेसाठी वैशाली रेके व सुचिता बलवान या महिला कर्मचारी काम पाहत आहेत.

- चौकट

तीन प्रकारात मिळतो लाभ

१) दारिद्र्य रेषेखालील कुटुंब

पालकांकडून १ हजार ५०० रुपये पालिकेचे १३ हजार ५०० रुपये

२) एक लाखापेक्षा कमी उत्पन्न

पालकांकडून ३ हजार ७५० पालिकेचे ११ हजार २५०

३) लाखापेक्षा जास्त उत्पन्न

पालकांकडून ७ हजार ५०० पालिकेचे ७ हजार ५००

(तिन्ही गटातील लाभार्थी कन्येला वीस वर्षानंतर एक लाख रुपये मिळतात.)

- कोट

स्त्री भ्रूणहत्या रोखली जावी. मुलीच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, ही भावना ठेवून पालिकेने महिला व बाल कल्याण फंडातून २०११ पासून ही नावीण्यपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय राज्यात प्रथम घेतला आहे. दहा वर्षांपासून यशस्वीपणे योजना राबवली आहे. योजना यापुढेही चालू राहणार आहे. तीन वर्षांच्या आतील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

- मनोहर शिंदे

उपनगराध्यक्ष, मलकापूर

- कोट

मुलीच्या कुटुंबीयांच्या भावनांचा आदर करून पालिकेने राबविलेली ही योजना खूपच चांगली आहे. या योजनेमुळे आम्हाला मुलीच्या शिक्षणाची व लग्नाची कसलीच चिंता राहिली नाही. आम्हाला मोठा आधार व दिलासा या योजनेमुळे मिळाला आहे. त्यामुळे शहरामध्ये मुलींचे आनंदात आगमन करताना पालक वर्ग दिसत आहे. माझ्यासारखी अनेक कुटुंबे या योजनेमुळे निश्चिंत झालेली आहेत.

- रूपाली ननावरे

गृहिणी, आगाशिवनगर

फोटो : २०केआरडी०२

कॅप्शन : प्रतीकात्मक