शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

कोरोनावर मात केलेल्या २६३ जणांना वजन वाढल्याच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST

सातारा: कोरोनावर मात केल्यानंतर अनेकजणांचे वाजन वाढल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्यात. पोस्ट कोविड सेंटरमधील आकडेवारीनुसार २६३ जणांचे वजन वाढल्याचे ...

सातारा: कोरोनावर मात केल्यानंतर अनेकजणांचे वाजन वाढल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्यात. पोस्ट कोविड सेंटरमधील आकडेवारीनुसार २६३ जणांचे वजन वाढल्याचे दिसून आले. गोळ्यांचा डोस आणि घरात तासन् तास विश्रांतीमुळे अनेकांचे वजन वाढले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना बाधित रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना गोळ्यांचा डोस सकाळ, संध्याकाळ देण्यात येत होता. तसेच पंधरा दिवस रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, घरी गेल्यानंतर काहींना त्रास जाणवू लागल्याने पुन्हा त्यांना पोस्ट कोविड सेंटरमधून उपचार घ्यावे लागले. अशा लोकांचे वजन वाढले असल्याचे दिसून आहे. काहीजणांचे ५० किलोवरून ५६ किलोकडे वजन झाले आहे. पाच ते सहा किलोने बऱ्याच जणांचे वजन वाढले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गोळ्यांचा डोसमध्ये स्टेरॉईड असते. त्यामुळेही वजन वाढण्याची दाट शक्यता असते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

चौकट : आधी ६० नंतर ६६ किलो झाले वजन

१) मी कोविड सेंटरमध्ये १८ दिवस उपचार घेतले. तेथे उपचार घेण्यापूर्वी माझे वजन बरोबर ६० होते. दोन महिन्यानंतर मी वजन पाहिले असता माझे वजन ६६ किलो झाले. गोळ्यांचा डोस सुरूच होताच. शिवाय घरात विश्रांती मिळाल्यामुळे वजन वाढले असावे, असे डॉक्टर सांगत असल्याचे एका कोरोना मुक्त झालेल्या युवकाने सांगितले.

२) कोरोना झाल्यामुळे सुरूवातीला भीती होती. आपली प्रतिकार शक्ती वाढावी, यासाठी फळे, भाज्यांचे भरपूर प्रमाणात सेवन केले. त्यामुळेचही कोरोनातून मुक्त झालेल्या नागरिकांचे वजन वाढल्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

३) वजन वाढू नये म्हणून काहींनी डोस बंद केले आहेत. तर काहीजण व्यायाम करू लागले आहेत. डॉक्टरांच्या सूचनेनुसार दैनंदिन काम ते करत आहेत. एकटे राहिल्यामुळे सतत झोपही घेत होतो. त्यामुळे वजन वाढले असल्याचे एकाने सांगितले.

४) एका युवकाचे दोन किलो वजन कोरोना मुक्तीनंतर वाढले होते. रोज व्यायाम करून त्याने वाढलेले वजन कमी केले. गोळ्यांचा दुष्परिणाम तर नाही ना? अशी शंकाही अनेकांनी घेतली होती. परंतु डॉक्टरांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले.

चौकट : स्टेराईड दिले जाते त्यामुळेही वजन वाढतेय

कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारची औषधे दिली जातात. यामध्ये सर्वाधिक प्रतिकार शक्ती वाढविणारे औषध असते. व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि स्टेराईडच्या गोळ्याही असतात. त्यामुळे साहजिकच या गोळ्यांचा परिणाम होऊन वजन वाढले जाते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अनेकांनी खाण्यावर भर दिला. काहींना सतत भूक लागत होती. याचा परिणाम साहजिकच वजन वाढविण्यासाठी झाला. आपण नेहमी खातो, तेवढा आहार घेतला पाहिजे. तरच वजन कंट्रोलमध्ये येते.

कोरोनामुक्तीनंतर डॉक्टरांनी दिलेला सल्ला अनेकांनी चांगलाच मनावर घेतला. तुमची प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर चांगले खा..निरोगी राहाल. हा सल्ला मानून अनेकांनी भरपेट खाण्यासही सुरूवात केली. त्यामुळे वजन वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोट : कोरोना मुक्त झाल्यानंतर क्वचितच लोकांनी वजन वाढल्याच्या तक्रारी केल्या. परंतु त्यानंतर त्यांचे वजन पूर्वीसारखे झाले. प्रतिनियुक्त गोळ्या आणि चांगला आहार, विश्रांती यामुळेही सर्वसामान्य नागरिकांचेही वजन वाढते. या रुग्णांचेही वजन काही प्रमाणात वाढले.

डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा