शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २५ हजार शेतकऱ्यांनी बिल भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST

सातारा : राज्यात सध्या विजेची थकित बिल वसुलीची मोहीम जोरदारपणे सुरू असून, कृषिपंपधारक शेतकऱ्यांनाही याचा फटका बसू लागलाय. पण, ...

सातारा : राज्यात सध्या विजेची थकित बिल वसुलीची मोहीम जोरदारपणे सुरू असून, कृषिपंपधारक शेतकऱ्यांनाही याचा फटका बसू लागलाय. पण, सातारा जिल्ह्यात थोड्याच शेतकऱ्यांची वीज तोडली असून, थकित बिल भरण्यासाठी त्यांना आवाहन करण्यात येत आहे. यामुळे २५ हजार शेतकऱ्यांनी वीजबिल भरून सहकार्य केले आहे. जिल्ह्यात कृषी वीज धोरणानुसार कृषिपंप थकित वीजबिल ६६६ कोटी आहे.

कृषिपंपधारकांना ३,५,१० अशा अश्वशक्तीनुसार कृषिपंपाचे बिल आकारले जाते. जिल्ह्यात कृषिपंपधारकांची संख्या जवळपास पावणेदोन लाखांहून अधिक आहे. यामध्ये मागील पाच वर्षांपासून थकीत असणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीजजोडणी तोडण्यात आली आहे. असे असलेतरी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. कंपनीचे कर्मचारी गावोगावी जाऊन जागृती करत आहेत. त्यासाठी ऑडिओ क्लिप तयार करण्यात आली आहे. याद्वारे शासनाच्या कृषिधोरण योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याचा फायदाही होताना दिसून येत आहे. तसेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळू लागलाय.

शासनाच्या कृषी धोरणानुसार थकबाकीतील ५० टक्के रक्कम भरायची आहे. तसेच शासनाकडून सवलतीवरील व्याज व दंड माफ करण्यात येत आहे. यामुळे ६० टक्के रक्कम भरायची असते, असे सांगण्यात आले.

जिल्ह्यात सप्टेंबरअखेर कृषी वीज धोरणानुसार ६६६ कोटी रुपयांची वीजबिलाची थकबाकी असलीतरी कृषी वीज धोरणाचा फायदा घेतल्यास त्यातील अर्धी रक्कम कमी होऊ शकते.

जिल्ह्यात कृषिपंपचालक

१,८१,५६०

वीजबिल थकबाकी

६६६.६२ कोटी

तालुकानिहाय कृषिपंपचालक आणि थकबाकी (कोटीत)

जावळी ३५१४ ४.४८

कऱ्हाड २८९५४ १२१.७०

खंडाळा ९०४१ २२.८६

खटाव २९२९७ १०७.९४

कोरेगाव २५१९१ १००.१३

महाबळेश्वर १७९५ १.४४

माण २०२७८ ७३.८७

पाटण ५०१६ १५.८६

फलटण २९४०० १२३.४२

सातारा १७५७९ ७२.४७

कोट :

जिल्ह्यात कृषिपंप थकित वीजबिल भरण्याबाबत महावितरणकडून तगादा सुरू होता. त्यामुळे शासनाच्या कृषी वीज धोरणानुसार थकबाकी रक्कम भरण्यात आली. त्यामुळे बिलात सवलत मिळाली. तसेच शेतीचा वीजपुरवठाही सुरळीत राहिला आहे.

- राजाराम पाटील

...........

मागील दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे पिकांचे नुकसान झाले. तरीही वीज मोटारीचे बिल भरावेच लागत आहे. बिल भरले नाही तर तोटाच होणार आहे. शासनाने वीज मोटारीचे संपूर्ण बिल माफ करायला हवे होते.

- परशुराम पवार

.................

अन्यायकारक वीजबिल वसुलीविरोधात स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही. खंडणी वसूल केल्यागत वसुली सुरू केली आहे. ती तातडीने थांबवली पाहिजे. मीटर तपासून बिल देणारी एजन्सी नसताना अदांजे खोटी बिले तयार केली व वितरीत करून काही अंशी वसुली केली. ही बाब फौजदारी गुन्ह्याची आहे.

- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

..................

मागील पाच वर्षांपासून कृषिपंपाचे वीजबिल थकीत असणाऱ्या काही जणांवर कारवाई केली आहे. मात्र, शासन कृषी धोरणानुसार शेतकऱ्यांना आवाहन करून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २५ हजार शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरले आहे. शेतकऱ्यांनी यापुढेही सहकार्य करावे.

- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी, सातारा