शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

सातारा जिल्ह्यात २३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:27 IST

सातारा : जिल्ह्यात गुरुवारी ८७९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आला असून २३ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस पुन्हा ...

सातारा : जिल्ह्यात गुरुवारी ८७९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आला असून २३ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस पुन्हा वाढत असून मृत्यूदेखील वाढले असल्याने सातारा जिल्ह्यावर चिंतेचे सावट पसरले आहे.

जिल्ह्यात गुरुवारी २३ जण मृत्युमुखी पडले, त्यामध्ये सातारा आणि कऱ्हाड तालुक्यातील प्रत्येकी ९ रुग्णांचा समावेश आहे. या दोन्ही तालुक्यांमधील रुग्णसंख्यादेखील कमी होत नसल्याचे चित्र असून कऱ्हाड तालुक्यात २६६ तर सातारा तालुक्यात १७० नवे रुग्ण बाधित आढळून आले आहेत. पाटणसारख्या दुर्गम तालुक्यातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र असून गुरुवारी पाटणमध्ये ६५ रुग्ण आढळून आले आहेत.

प्रशासनाच्यावतीने तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी विशेष मोहीम राबवून तपासण्या करण्यात येत आहेत. सोमवार दि. २१ रोजी ४५१ इतके रुग्णाला सापडले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलेला दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले होते, मात्र, पुन्हा संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने चिंतेत भर पडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांमध्ये शिथिलता देऊन दुकानांच्या वेळा वाढविल्या आहेत. ही संधी साधून जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये लोक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याने रुग्णसंख्या कमी होत नाही.

जावली, महाबळेश्वर हे तालुकेवगळता इतर तालुक्यांमध्ये अजूनही रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळ बंद ठेवण्यात आले असले तरी हॉटेल व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. या तालुक्‍यात पर्यटकांची रेलचेल सुरू झाली असल्याने हा तालुका देखील रुग्णसंख्येत बाधित होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

जावली, खंडाळा, माण महाबळेश्वर, वाई या तालुक्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही; परंतु इतर तालुक्यांमध्ये मात्र बाधितांचे मृत्युसत्र सुरूच आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण ४ हजार २७८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या गुरुवारी संध्याकाळपर्यंत ७४८ जणांना घरी सोडण्यात आले तर ८ हजार ७२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

चौकट

पावणे दोन लाख रुग्ण झाले बरे

जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख २२ हजार ६०८ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या त्यातून १ लाख ८८ हजार ७६९ लोक कोरोनाबाधित आढळले. त्यातील १ लाख ७६ हजार ६१३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले.