सातारा : राज्य निवडणूक आयोगाकडे आयकर लेखा व लेखापरीक्षित लेख्याची प्रत न जोडल्याने नोंदणी रद्द होणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये सातारा जिल्ह्यातील २१ राजकीय आघाड्यांचा समावेश आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.या राजकीय आघाड्यांना आयोगाने नोटीस बजावली आहे. या पक्षांनी ३० डिसेंबर २०१५ पर्यंत संबंधित कागदपत्रांती पूर्तता न केल्यास राज्य निवडणूक आयोगाकडून त्यांची नोंदणी रद्द केली जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सोमवारी मुंबईत दिली. नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना नियमितपणे आयकर विवरणपत्र व लेखा परीक्षित लेख्याची प्रत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे आवश्यक असते. त्याची पूर्तता न करणाऱ्या पक्षांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्येम्हसवड सिद्धनाथ पॅनेल, लोकमित्र जनसेवा आघाडी, लोकशक्ती विकास आघाडी, नगरविकास आघाडी, जनकल्याण आघाडी, सातारा विकास आघाडी, जनता परिवर्तन पॅनल, पाटण तालुका विकास आघाडी, लोकशाही आघाडी, खटाव-माण विकास आघाडी, फलटण शहर नागरी संघटना, जरंडेश्वर विकास आघाडी, महाराष्ट्र क्रांतिसेना, श्री लक्ष्मी डोंगराई देवी नगर विकास आघाडी, मलकापूर शहर विकास आघाडी, नागोबा आघाडी म्हसवड, नगर विकास आघाडी, राजेमाने पार्टी, जावळी विकास आघाडी, यशवंत विकास आघाडी, यशवंतराव चव्हाण कृष्णा विकास आघाडी यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणामनिवडणूक आयोगाच्या नोटिसीमुळे रद्दबातल होण्याच्या मार्गावर असणाऱ्या राजकीय आघाड्यांच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांमध्ये मतदारांसमोर जाताना पेच निर्माण होऊ नये, यासाठी आघाडीप्रमुखांना ३० डिसेंबरच्या आधी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.
सातारा जिल्ह्यातील २१ राजकीय आघाड्या अडचणीत
By admin | Updated: November 24, 2015 00:30 IST