शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

जिहे-कटापूर योजनेला २० कोटी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2015 00:18 IST

येळगावकर यांची माहिती : मुख्यमंत्र्यांचा खास बाब म्हणून निर्णय

सातारा : ‘जिहे-कटापूर योजनेच्या अंतर्गत बॅरेजच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून २० कोटींचा निधी मंजूर केला आहे,’ अशी माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. येळगावकर म्हणाले, ‘जिहे-कटापूर योजनेला वाढीव निधी द्यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून करीत आलो आहे. एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावर सत्कारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून २० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. जिहे-कटापूर योजनेच्या कृष्णा नदीवरच्या बॅरेजचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी झाले नाही तर पावसाच्या पुरामध्ये झालेले बांधकामही वाहून जाण्याची भीती त्यांच्यासमोर ठेवली. पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही यामध्ये खूप सहकार्य केले.’‘आणखी याच्या पुढचा लढा आहे तो म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता इतर प्रकल्पांना मिळविणे. त्यामध्ये उरमोडी आणि टेंभू आहे. जिहे-कटापूर योजना झाली म्हणजे माणचे आणि खटावचे दुखणे संपले असे नव्हे.उरमोडीमध्ये आज तीनच पंप कार्यरत आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी खटाव, माणमध्ये जात नाही. त्या ठिकाणी किमान आठ ते नऊ पंप बसले तर हे पाणी खटाव आणि माणमध्येही जाऊ शकते. त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे. ती मिळविण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी निकराचे प्रयत्न करणार आहे. तसेच प्रयत्न टेंभूच्या बाबतीतही चालू आहेत. टेंभूचे पाणी हे खटाव, माणच्या पूर्व भागाला मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे,’ असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जिहे-कटापूरच्या बाबतीतला हा पहिला विजय आहे. कारण सुधारित प्रशासकीय मान्यता नसतानासुद्धा हा निधी मिळाला आहे. आता पुढचा टप्पा आहे तो नेर आणि आंधळीमध्ये पाणी सोडायचा. नेरमधील पाणी हे एका वर्षात येऊ शकते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आमचे शिष्टमंडळ लवकरात लवकर राज्यपालांना भेटून हा निधी उपलब्ध कसा होईल आणि अनुशेषामध्ये अडकलेली ही जिहे-कटापूर योजना कशी बाजूला काढता येईल, असा प्रयत्न सुरू आहे. - दिलीप येळगावकर, माजी आमदारटेंभूू योजना लघुसिंचनाखाली घ्यावीज्यावेळी टेंभू योजना मंजूर झाली, त्यावेळी खटाव, माणचा पूर्व भाग हा गृहीत धरला नव्हता. आता गृहीत धरायला लावायचा आहे. त्यामुळे व्याप्तीमधला बदल आहे. तो राज्यपालांनी स्वीकारला पाहिजे.त्यासाठी मंत्रिमंडळाने जशी जिहे-कटापूरची शिफारस केली, तशी टेंभूचीही केली पाहिजे. टेंभू ही योजना पूर्णपणे लघुसिंचनाखाली घ्यावी, अशीही आमची मागणी असल्याचे डॉ. येळगावकर यांनी सांगितले.