शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

जिहे-कटापूर योजनेला २० कोटी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2015 00:18 IST

येळगावकर यांची माहिती : मुख्यमंत्र्यांचा खास बाब म्हणून निर्णय

सातारा : ‘जिहे-कटापूर योजनेच्या अंतर्गत बॅरेजच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून २० कोटींचा निधी मंजूर केला आहे,’ अशी माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. येळगावकर म्हणाले, ‘जिहे-कटापूर योजनेला वाढीव निधी द्यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून करीत आलो आहे. एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावर सत्कारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून २० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. जिहे-कटापूर योजनेच्या कृष्णा नदीवरच्या बॅरेजचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी झाले नाही तर पावसाच्या पुरामध्ये झालेले बांधकामही वाहून जाण्याची भीती त्यांच्यासमोर ठेवली. पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही यामध्ये खूप सहकार्य केले.’‘आणखी याच्या पुढचा लढा आहे तो म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता इतर प्रकल्पांना मिळविणे. त्यामध्ये उरमोडी आणि टेंभू आहे. जिहे-कटापूर योजना झाली म्हणजे माणचे आणि खटावचे दुखणे संपले असे नव्हे.उरमोडीमध्ये आज तीनच पंप कार्यरत आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी खटाव, माणमध्ये जात नाही. त्या ठिकाणी किमान आठ ते नऊ पंप बसले तर हे पाणी खटाव आणि माणमध्येही जाऊ शकते. त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे. ती मिळविण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी निकराचे प्रयत्न करणार आहे. तसेच प्रयत्न टेंभूच्या बाबतीतही चालू आहेत. टेंभूचे पाणी हे खटाव, माणच्या पूर्व भागाला मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे,’ असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जिहे-कटापूरच्या बाबतीतला हा पहिला विजय आहे. कारण सुधारित प्रशासकीय मान्यता नसतानासुद्धा हा निधी मिळाला आहे. आता पुढचा टप्पा आहे तो नेर आणि आंधळीमध्ये पाणी सोडायचा. नेरमधील पाणी हे एका वर्षात येऊ शकते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आमचे शिष्टमंडळ लवकरात लवकर राज्यपालांना भेटून हा निधी उपलब्ध कसा होईल आणि अनुशेषामध्ये अडकलेली ही जिहे-कटापूर योजना कशी बाजूला काढता येईल, असा प्रयत्न सुरू आहे. - दिलीप येळगावकर, माजी आमदारटेंभूू योजना लघुसिंचनाखाली घ्यावीज्यावेळी टेंभू योजना मंजूर झाली, त्यावेळी खटाव, माणचा पूर्व भाग हा गृहीत धरला नव्हता. आता गृहीत धरायला लावायचा आहे. त्यामुळे व्याप्तीमधला बदल आहे. तो राज्यपालांनी स्वीकारला पाहिजे.त्यासाठी मंत्रिमंडळाने जशी जिहे-कटापूरची शिफारस केली, तशी टेंभूचीही केली पाहिजे. टेंभू ही योजना पूर्णपणे लघुसिंचनाखाली घ्यावी, अशीही आमची मागणी असल्याचे डॉ. येळगावकर यांनी सांगितले.