शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना १ कोटींचे नुकसान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 17:26 IST

सागर गुजर सातारा : जिल्ह्यातील सातारा, पाटण, फलटण व कऱ्हाड  या चार तालुक्यांतील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या लोकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना १ कोटींचे नुकसान वाटपप्रशासनाची मदत : ३ कोटी ४७ लाखांचा निधी तहसीलदारांकडे वर्ग

सागर गुजरसातारा : जिल्ह्यातील सातारा, पाटण, फलटण व कऱ्हाड  या चार तालुक्यांतील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या लोकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने आत्तापर्यंत १ कोटी ५५ हजार रुपयांची मदत केली आहे.या चारही तालुक्यांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. नद्या, ओढ्यांना पूर आल्याने काठावरच्या घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांवर दरडी पडल्या. तर अनेक घरे जमीनदोस्त झाली. १३ घरे पूर्णत: पडली. तर ४ हजार ६२४ घरांचे अंशत: नुकसान झाले. जनावरांचे ३२ गोठे पडले.प्रशासनाने सुरुवातीला जीवितहानी टाळण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले. नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवले. त्यामुळे जीवितहानी कमीत कमी झाली. आता नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याचे काम सुरु आहे. शहरातील नुकसानग्रस्तांना प्रत्येकी १५ हजार रुपये व ग्रामीण भागातील नुकसानग्रस्तांना प्रत्येकी १0 हजार रुपये देण्यात येत आहेत.जिल्ह्यातील २ हजार ७0४ लोकांना गहू, तांदूळ वाटप केला आहे. याव्यतिरिक्त ११ हजार ७९५ लिटर केरोसीनचे वाटप केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातून देण्यात आली.नुकसानग्रस्तांना तालुकानिहाय दिलेली मदत

  1. सातारा : ४0 हजार
  2. पाटण : ६६ लाख ५ हजार
  3. कऱ्हाड : ९६ लाख ८0 हजार
  4. फलटण : ४0 हजार

नुकसान असेहीदुभती जनावरे १५, लहान जनावरे ७ तर २१00 कोंबडल्या अतिवृष्टीच्या काळात मृत्युमुखी पडल्या. शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून याचे पंचनामे सुरु आहेत.पुरात वाहून गेलेल्यांना प्रत्येकी चार लाखपुरात वाहून जाऊन मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात आले आहेत. सातारा तालुक्यातील कुसवडे येथील सागर बल्लाळ, कामथी तर्फ सातारा येथील लता चव्हाण, खंडाळा तालुक्यातील सतीश कचरे, रुळे गावचे पांडुरंग शिंदे हे अतिवृष्टीच्या काळात मृत्यूमुखी पडले. त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाच्यावतीने प्रत्येकी चार लाखांची मदत करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Satara Floodसातारा पूरcollectorजिल्हाधिकारी