वाई : तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या २४२ वॉर्डमधील ६०६ जागांसाठी १ हजार १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत १२ ग्रामपंचायतीतील १८ अर्ज बाद झाले होते. सोमवार, दि. ४ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनी चित्र स्पष्ट होऊन तालुक्यातील १९ गावे पूर्णतः बिनविरोध झाल्या आहेत. तर ५७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली आहे.
निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीमध्येही काही गावांमध्ये काही वाॅर्ड बिनविरोध झाले आहेत. तालुक्यात बिनविरोध झालेली गावे पुढीलप्रमाणे अनवडी, उलुंब, वेलंग, बोपेगाव, दसवडी, कनूर, कोंढवली, वयगाव, जांब, जोर, किरुंडे, परतवडी, वाशिवली, शेलारवाडी, वेरुळी, वासोळे, मुंगसेंवाडी, खावली आणि अनपटवाडी आदी गावांत बिनविरोध झाली असून, मतदान १५ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली.