शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

खंडाळा तालुक्यात १६ गावांना फटका

By admin | Updated: December 26, 2014 00:19 IST

अवकाळीग्रस्त भागाचे पंचनामे : तब्बल ५० लाखांचे नुकसान

खंडाळा : अवकाळी पावसाने खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तालुक्यातील १६ गावांमधील सुमारे १८८ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली असून, तब्बल ५० लाखांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई तातडीने मिळण्याच्या प्रतीक्षेत तालुक्यातील शेतकरी वर्ग आहे.गत आठवड्यात तालुक्यात सलग तीन दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामध्ये सुखेड, बोरी, पाडळी, निंबोडी, खेड बुद्रुक, लोणंद, मरिआईचीवाडी, बावकलवाडी, वाघोशी, कराडवाडी, अंदोरी या प्रमुख गावांसह १६ गावांत शेतीचे मोठे नुकसान झाले. या गावांमधील ५१२ शेतकऱ्यांची उभी पिके भुईसपाट झाली असून, पोटऱ्यात आलेल्या ज्वारीचे तसेच कांद्याचे मोठे नुकसान झाले. डाळिंबीच्या बागांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. या हंगामातील उत्पादित क्षेत्रांपैकी १८८ हेक्टर क्षेत्रात तब्बल ५० लाखांचे नुकसानाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. तालुक्यात कांद्याच्या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. लोणंदच्या कांदा बाजारपेठेत लाखो रुपयांचा कांदा विकला जातो. येथून परदेशातही कांद्याची निर्यात केली जाते; परंतु यावर्षीच्या नुकसानीमुळे कांदा उत्पादन घटून लाखोंचा तोटा होणार आहे.नुकसानीची पाहणी विभागीय कृषी अधिकारी चांगदेव बागल, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, तहसीलदार शिवाजी तळपे यांनी केली आहे. पकांच्या नुकसानीचा मोबदला तातडीने मिळणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. हजारो रुपये भांडवल घालून पिके बहरात आली असताना शेतकऱ्यांना या नुकसानीचा सामना करावा लागतोय. त्यांना तातडीने रोख मदत मिळायला हवी.- शिवाजीराव शेळके, संचालक कृ. उ. बाजार समितीनुकसानग्रस्त शेतीच्या पिकांची पाहणी करण्यात आली आहे. बहुतांशी पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याचा एकत्रित अहवाल शासनाकडे पोहच करण्यात येणार आहे. साधारण ५० लाखांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्नश्ीाल आहोत.दत्तात्रय खरात, तालुका कृषी अधिकारी