शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळा तालुक्यात १६ गावांना फटका

By admin | Updated: December 26, 2014 00:19 IST

अवकाळीग्रस्त भागाचे पंचनामे : तब्बल ५० लाखांचे नुकसान

खंडाळा : अवकाळी पावसाने खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तालुक्यातील १६ गावांमधील सुमारे १८८ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली असून, तब्बल ५० लाखांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई तातडीने मिळण्याच्या प्रतीक्षेत तालुक्यातील शेतकरी वर्ग आहे.गत आठवड्यात तालुक्यात सलग तीन दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामध्ये सुखेड, बोरी, पाडळी, निंबोडी, खेड बुद्रुक, लोणंद, मरिआईचीवाडी, बावकलवाडी, वाघोशी, कराडवाडी, अंदोरी या प्रमुख गावांसह १६ गावांत शेतीचे मोठे नुकसान झाले. या गावांमधील ५१२ शेतकऱ्यांची उभी पिके भुईसपाट झाली असून, पोटऱ्यात आलेल्या ज्वारीचे तसेच कांद्याचे मोठे नुकसान झाले. डाळिंबीच्या बागांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. या हंगामातील उत्पादित क्षेत्रांपैकी १८८ हेक्टर क्षेत्रात तब्बल ५० लाखांचे नुकसानाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. तालुक्यात कांद्याच्या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. लोणंदच्या कांदा बाजारपेठेत लाखो रुपयांचा कांदा विकला जातो. येथून परदेशातही कांद्याची निर्यात केली जाते; परंतु यावर्षीच्या नुकसानीमुळे कांदा उत्पादन घटून लाखोंचा तोटा होणार आहे.नुकसानीची पाहणी विभागीय कृषी अधिकारी चांगदेव बागल, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, तहसीलदार शिवाजी तळपे यांनी केली आहे. पकांच्या नुकसानीचा मोबदला तातडीने मिळणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. हजारो रुपये भांडवल घालून पिके बहरात आली असताना शेतकऱ्यांना या नुकसानीचा सामना करावा लागतोय. त्यांना तातडीने रोख मदत मिळायला हवी.- शिवाजीराव शेळके, संचालक कृ. उ. बाजार समितीनुकसानग्रस्त शेतीच्या पिकांची पाहणी करण्यात आली आहे. बहुतांशी पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याचा एकत्रित अहवाल शासनाकडे पोहच करण्यात येणार आहे. साधारण ५० लाखांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्नश्ीाल आहोत.दत्तात्रय खरात, तालुका कृषी अधिकारी