शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

जिल्ह्यातील धरणांमध्ये १४५ टीएमसी साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाल्याने प्रमुख सहा धरणांमध्ये १४५.३१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तरीही ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाल्याने प्रमुख सहा धरणांमध्ये १४५.३१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तरीही यंदा ही धरणे भरण्यास उशीर लागला आहे. दरम्यान, उरमोडी वगळता इतर प्रमुख पाच धरणांमध्ये ९५ टक्क्यांच्यावर पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीपेक्षा या धरणांमध्ये ३.६० टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षे चांगला पाऊस झाला. यामुळे सर्व धरणे ऑगस्ट महिन्यातच ओव्हरफ्लो झाली तसेच त्यातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकवेळा धरणांतून पाणी सोडावे लागल्याने नदीकाठच्या गावांना धोकाही निर्माण झाला. दोन वर्षांपूर्वी तर कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा या नद्या पात्र सोडून वाहत होत्या. आताही पावसाळा सुरू होऊन तीन महिने होऊन गेले आहेत.

यावर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर तीन आठवडे पावसाची उघडीप होती. पण, जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम भागात तर तीन दिवस धुवाँधार पाऊस कोसळत होता. यामुळे शेती, पिके, रस्ते, घरे यांचे मोठे नुकसान झाले. तसेच या अतिवृष्टीमुळे प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयनासारख्या धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाणी आले. तसेच इतर धरणांमध्येही पाणीसाठा वाढला. त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला. त्यानंतर जवळपास एक महिना पावसाची उघडीप होती. त्यामुळे धरणे भरणार का? अशी चिंता होती. पण, सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला. यामुळे उशिरा का असेना धरणे भरत आली आहेत.

जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या सहा प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी यावेळी या धरणांमध्ये १४८.९१ टीएमसी पाणीसाठा होता, तर सध्या १४५.३१ टीएमसी इतका आहे. गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्गही झाला होता. त्यामुळे सध्याची स्थिती निर्माण झालेली आहे. तरीही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे वर्षभराची चिंता नक्कीच संपली आहे.