शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचे पेपर सापडले; पण बारावीचं काय?

By admin | Updated: March 6, 2015 23:44 IST

उत्तरपत्रिका गहाळ : सिध्देश्वर कुरोलीच्या मठात गठ्ठे सादर; मात्र कऱ्हाड तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

कऱ्हाड/ औंध : कऱ्हाड येथून बारावीच्या उत्तरपत्रिका गायब झाल्याची चर्चा सुरू आहे. आठ दिवस उलटूनही उत्तरपत्रिका सापडायला तयार नाहीत. शेकडो विद्यार्थ्यांसह पालकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. पण यापूर्वी घडलेल्या अशाच घटनांचे किस्सेही चर्चिले जात आहेत. यापूर्वी पेपर जळाले, गिळाले अन् आता गहाळ झाले खरे; पण यातून कोणी काही बोध घेणार का? हा प्रश्न पडलाय. दरम्यान, खटाव तालुक्यात बोर्डाचे दहावीचे पेपरचे गठ्ठे रस्त्यात पडले. ते सिध्देश्वर कुरोलीच्या मठात सादर करण्यात आले. पण, कऱ्हाडमधील उत्तरपत्रिकेचं काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थी दशेतील एक ‘टर्निंग पॉइंट’; पण कऱ्हाडातून भौतिकशास्त्र विषयाच्या सुमारे पाचशे उत्तरपत्रिका गायब झाल्याची घटना घडल्याने ‘त्या’ पाचशे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला आता काय ‘टर्न’ मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षण विभाग सध्या कागदी घोडे नाचवत आहे. तर टपाल खाते हात झटकण्याचा प्रयत्न करतंय; पण या घटनेमुळे ज्या पाचशे विद्यार्थ्यांचे हात आता निकालाखाली अडकलेत त्यांचा विचार कोण करणार ? उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची सध्या शैक्षणिक वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा शेवट काय होणार, हे सध्या सांगता येत नाही; पण यापूर्वी जे घडलं तेच याही प्रकरणात होईल, असे म्हटले जातेय. सुमारे ५० ते ६० वर्षांपूर्वी विद्यापीठातून बी. ए. चे पेपर जळाल्याचे सांगितले जाते. यावर मार्ग म्हणून त्यावेळी विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा न घेता, साऱ्यांनाच पास करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हाती बी. ए. ची पदवी मिळाली खरी; पण त्यांना ‘जळकी बी. ए.’ अशी ओळख मिळाल्याचे जुने लोक सांगतात. त्याबरोबरच नाशिक जिल्ह्यात एका शिक्षकाकडे उत्तरपत्रिका तपासायला गेल्या होत्या. त्यादरम्यान त्यातील काही उत्तरपत्रिका गाईने खाल्ल्या. ही घटना त्यांनी संबंधितांना कळविली. आता गाईवर काही गुन्हा नोंद करता येत नाही. मग त्यावेळी मध्यमार्ग काढण्यात आला, अन् विद्यार्थी पास झाले. सध्या कऱ्हाडातून बारावीच्या उत्तरपत्रिका गायब झाल्या आहेत. त्या जर सापडल्या नाहीत तर ? मग मागे घडले तसेच होणार. ते पाचशे विद्यार्थीही कदाचित पास होतील; पण सध्याच्या गुणवत्तेच्या स्पर्धेत त्यांना तो निकाल परवडणारा असेल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला याचा फायदाही होईल, अन् एखाद्या हुशार विद्यार्थ्याला तोटाही होईल; मग त्याचे शैक्षणिक नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण? कारण सध्या तर कोणीच जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. (प्रतिनिधी)