शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

दहावीचे पेपर सापडले; पण बारावीचं काय?

By admin | Updated: March 6, 2015 23:44 IST

उत्तरपत्रिका गहाळ : सिध्देश्वर कुरोलीच्या मठात गठ्ठे सादर; मात्र कऱ्हाड तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

कऱ्हाड/ औंध : कऱ्हाड येथून बारावीच्या उत्तरपत्रिका गायब झाल्याची चर्चा सुरू आहे. आठ दिवस उलटूनही उत्तरपत्रिका सापडायला तयार नाहीत. शेकडो विद्यार्थ्यांसह पालकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. पण यापूर्वी घडलेल्या अशाच घटनांचे किस्सेही चर्चिले जात आहेत. यापूर्वी पेपर जळाले, गिळाले अन् आता गहाळ झाले खरे; पण यातून कोणी काही बोध घेणार का? हा प्रश्न पडलाय. दरम्यान, खटाव तालुक्यात बोर्डाचे दहावीचे पेपरचे गठ्ठे रस्त्यात पडले. ते सिध्देश्वर कुरोलीच्या मठात सादर करण्यात आले. पण, कऱ्हाडमधील उत्तरपत्रिकेचं काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थी दशेतील एक ‘टर्निंग पॉइंट’; पण कऱ्हाडातून भौतिकशास्त्र विषयाच्या सुमारे पाचशे उत्तरपत्रिका गायब झाल्याची घटना घडल्याने ‘त्या’ पाचशे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला आता काय ‘टर्न’ मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षण विभाग सध्या कागदी घोडे नाचवत आहे. तर टपाल खाते हात झटकण्याचा प्रयत्न करतंय; पण या घटनेमुळे ज्या पाचशे विद्यार्थ्यांचे हात आता निकालाखाली अडकलेत त्यांचा विचार कोण करणार ? उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची सध्या शैक्षणिक वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा शेवट काय होणार, हे सध्या सांगता येत नाही; पण यापूर्वी जे घडलं तेच याही प्रकरणात होईल, असे म्हटले जातेय. सुमारे ५० ते ६० वर्षांपूर्वी विद्यापीठातून बी. ए. चे पेपर जळाल्याचे सांगितले जाते. यावर मार्ग म्हणून त्यावेळी विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा न घेता, साऱ्यांनाच पास करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हाती बी. ए. ची पदवी मिळाली खरी; पण त्यांना ‘जळकी बी. ए.’ अशी ओळख मिळाल्याचे जुने लोक सांगतात. त्याबरोबरच नाशिक जिल्ह्यात एका शिक्षकाकडे उत्तरपत्रिका तपासायला गेल्या होत्या. त्यादरम्यान त्यातील काही उत्तरपत्रिका गाईने खाल्ल्या. ही घटना त्यांनी संबंधितांना कळविली. आता गाईवर काही गुन्हा नोंद करता येत नाही. मग त्यावेळी मध्यमार्ग काढण्यात आला, अन् विद्यार्थी पास झाले. सध्या कऱ्हाडातून बारावीच्या उत्तरपत्रिका गायब झाल्या आहेत. त्या जर सापडल्या नाहीत तर ? मग मागे घडले तसेच होणार. ते पाचशे विद्यार्थीही कदाचित पास होतील; पण सध्याच्या गुणवत्तेच्या स्पर्धेत त्यांना तो निकाल परवडणारा असेल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला याचा फायदाही होईल, अन् एखाद्या हुशार विद्यार्थ्याला तोटाही होईल; मग त्याचे शैक्षणिक नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण? कारण सध्या तर कोणीच जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. (प्रतिनिधी)