शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

दहावीचे पेपर सापडले; पण बारावीचं काय?

By admin | Updated: March 6, 2015 23:44 IST

उत्तरपत्रिका गहाळ : सिध्देश्वर कुरोलीच्या मठात गठ्ठे सादर; मात्र कऱ्हाड तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

कऱ्हाड/ औंध : कऱ्हाड येथून बारावीच्या उत्तरपत्रिका गायब झाल्याची चर्चा सुरू आहे. आठ दिवस उलटूनही उत्तरपत्रिका सापडायला तयार नाहीत. शेकडो विद्यार्थ्यांसह पालकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. पण यापूर्वी घडलेल्या अशाच घटनांचे किस्सेही चर्चिले जात आहेत. यापूर्वी पेपर जळाले, गिळाले अन् आता गहाळ झाले खरे; पण यातून कोणी काही बोध घेणार का? हा प्रश्न पडलाय. दरम्यान, खटाव तालुक्यात बोर्डाचे दहावीचे पेपरचे गठ्ठे रस्त्यात पडले. ते सिध्देश्वर कुरोलीच्या मठात सादर करण्यात आले. पण, कऱ्हाडमधील उत्तरपत्रिकेचं काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थी दशेतील एक ‘टर्निंग पॉइंट’; पण कऱ्हाडातून भौतिकशास्त्र विषयाच्या सुमारे पाचशे उत्तरपत्रिका गायब झाल्याची घटना घडल्याने ‘त्या’ पाचशे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला आता काय ‘टर्न’ मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षण विभाग सध्या कागदी घोडे नाचवत आहे. तर टपाल खाते हात झटकण्याचा प्रयत्न करतंय; पण या घटनेमुळे ज्या पाचशे विद्यार्थ्यांचे हात आता निकालाखाली अडकलेत त्यांचा विचार कोण करणार ? उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची सध्या शैक्षणिक वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा शेवट काय होणार, हे सध्या सांगता येत नाही; पण यापूर्वी जे घडलं तेच याही प्रकरणात होईल, असे म्हटले जातेय. सुमारे ५० ते ६० वर्षांपूर्वी विद्यापीठातून बी. ए. चे पेपर जळाल्याचे सांगितले जाते. यावर मार्ग म्हणून त्यावेळी विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा न घेता, साऱ्यांनाच पास करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हाती बी. ए. ची पदवी मिळाली खरी; पण त्यांना ‘जळकी बी. ए.’ अशी ओळख मिळाल्याचे जुने लोक सांगतात. त्याबरोबरच नाशिक जिल्ह्यात एका शिक्षकाकडे उत्तरपत्रिका तपासायला गेल्या होत्या. त्यादरम्यान त्यातील काही उत्तरपत्रिका गाईने खाल्ल्या. ही घटना त्यांनी संबंधितांना कळविली. आता गाईवर काही गुन्हा नोंद करता येत नाही. मग त्यावेळी मध्यमार्ग काढण्यात आला, अन् विद्यार्थी पास झाले. सध्या कऱ्हाडातून बारावीच्या उत्तरपत्रिका गायब झाल्या आहेत. त्या जर सापडल्या नाहीत तर ? मग मागे घडले तसेच होणार. ते पाचशे विद्यार्थीही कदाचित पास होतील; पण सध्याच्या गुणवत्तेच्या स्पर्धेत त्यांना तो निकाल परवडणारा असेल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला याचा फायदाही होईल, अन् एखाद्या हुशार विद्यार्थ्याला तोटाही होईल; मग त्याचे शैक्षणिक नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण? कारण सध्या तर कोणीच जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. (प्रतिनिधी)