शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यामधील १०१ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:39 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दुसऱ्यांदा सुरू झाला आहे. पण, अजूनही जिल्ह्यातील काही गावांत कोरोनाचा शिरकावही झालेला नाही. जिल्ह्यातील ...

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दुसऱ्यांदा सुरू झाला आहे. पण, अजूनही जिल्ह्यातील काही गावांत कोरोनाचा शिरकावही झालेला नाही. जिल्ह्यातील १०१ गावांनी अजूनही कोरोनाला वेशीबाहेरच ठेवले आहे. तर जिल्ह्यातील १ हजार ३९१ गावांत कोरोना विषाणू पोहोचलाय. यामध्ये सर्वाधिक बाधित गावे ही सातारा, पाटण आणि कऱ्हाड या तालुक्यातच आहेत.

जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळून आला तो परदेशातून आलेला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत गेले. एप्रिल आणि मे महिन्यात स्थिती कमी होती. तसेच काही गावांत कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यातच लॉकडाऊन असल्याने जिल्ह्यातील गावांच्या सीमा बंद होत्या. अनोळखी व्यक्तींना प्रवेश नव्हताच. त्याचबरोबर चाकरमान्यांनाही गावात येताना शाळांमध्ये क्वारंटाईन व्हावे लागले. एवढ्या मोठ्या त्रासाला अनेकांना सामोरे जावे लागले. मात्र, जूननंतर काही प्रमाणात ढिलाई आली आणि कोरोना कहर सुरू झाला. तो सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू होता. तर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील १ हजार २६४ गावांत कोरोना रुग्ण सापडले होते; तर २२८ गावे कोरोनापासून दूर होती. असे असले तरी. कोरोना आता जिल्ह्यातील सर्वच गावांत पोहोचणार की काय, असे वाटू लागले आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून बाधितांचे प्रमाण एकदमच वाढले आहे. मार्च महिन्यात तर हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. कारण, एकाच महिन्यात साडेसहा हजारांवर बाधित आढळले; तर ५१ जणांचा कोरोनाने बळी घेतला होता. एप्रिल सुरू झाल्यापासून तर दिवसाला ५००, ७०० च्या पटीत बाधित स्पष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत दोन हजारांवर बाधित समोर आले. त्याचबरोबर अनेक गावांतही कोरोनाचा शिरकाव झाला.

जिल्ह्यात १४९२ ग्रामपंचायती आहेत. यामधील १ हजार ३९१ गावांत आतापर्यंत कोरोना पोहोचला आहे, तर १०१ गावांनी अजूनही कोरोनाला गावाबाहेरच ठेवले आहे. कोरोना वाढीचा वेग लक्षात घेता, येत्या काही दिवसांत नवीन काही गावांत कोरोना पोहोचू शकतो. पण, ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे पालन, गावासाठी काही नियम लागू केले, तर अजूनही त्या-त्या गावापासून कोरोना दूर राहू शकतो. कोरोना कहर सुरू असताना अशा उपाययोजना आवश्यकच ठरल्या आहेत. तरच गावापासून कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते. तर विशेष म्हणजे अनेक गावे ही दूर, दुर्गम भागात आहेत. त्याचबरोबर तेथील लोकसंख्याही कमी आहे. अशी अनेक गावे कोरोनापासून दूर आहेत.

चौकट :

कोरोना रुग्ण आढळणारी तालुकानिहाय गावे...

खंडाळा तालुका ६९, पाटण १९४, फलटण ११८, जावळी ११८, सातारा १९७, कऱ्हाड १८३, कोरेगाव १२८, खटाव १२६, माण ९६, वाई ११० आणि महाबळेश्वर तालुका ५२.

कोट देणार आहे...

...............................