शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सातारा जिल्ह्यातील एक हजारावर ग्रामपंचायतींना टाळा

By नितीन काळेल | Updated: December 18, 2023 19:22 IST

ग्रामसेवकांच्याही 'या' आहेत मागण्या..

सातारा : सरंपच, उपसरंपचांच्या मानधनात वाढ करावी, संगणक चालकांना शासनपातळीवर नियुक्ती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील एक हजारावर ग्रामपंचायतींना कुलूप लावण्यात आले आहे. हा बंद दि. २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. तर यामध्ये सरपंच, उपसरपंचासह संगणक चालक, ग्रामरोजगार सेवक सहभागी झाले आहेत.याबाबत सरपंच परिषद पुणे महाराष्ट्रच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ग्रामपंचायतीबाबतच्या विविध अडचणी, मागण्या मंजूर करण्यासाठी निवेदन दिले आहे. सरपंच मानधन १० हजार तर उपसरपंचांचे ३ हजार रुपये करावे, अशी आमची मागणी आहे. तसेच १५ वा वित्त आयोग निधी २०११ च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार न देता सध्याच्या लोकसंख्येवर वितरित करण्यात यावा, संगणक आॅपरेटरची नियुक्ती शासनपातळीवर करावी किंवा त्यांचे अधिकार ग्रामपंचायतीला द्यावेत. राज्य शासनाकडे जमा असलेला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा १० टक्के १५ वा वित्त निधी त्वरित ग्रामपंचायतींना वितरित करण्यात यावा. सहा विभागात सरपंच मतदारसंघ करुन सहा आमदार नियुक्त करावेत, घरकुल प्रतीक्षा यादी तयार होऊन १० वर्षे झाली आहेत. तरीही लाभाऱ्थी घरकुलापासून वंचित आहेत. त्यांना त्वरित निधी वितरित करण्यात यावा.तसेच अडीच लाख रुपये अनुदान मिळावे. शासकीय कामासाठी जीएसटी बंद करावा. रोजगार हमी योजनेच्या मजुरांची हजेरी वेळेत घेऊन मजुरीत वाढ करावी, सरपंचांना पेन्शन सुरू करावी. राज्यातील सर्व जातीधर्मातील मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपये अनुदान द्यावे. कर्जमाफी योजनेतील ५० हजार रुपये त्वरित जमा करावेत, अशी मागणी आहे.दरम्यान, या बंदमध्ये जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक ग्रामपंचायती सहभागी झाल्या आहेत. दि. २० डिसेंबरपर्यंत हे आंदोलन चालणार आहे.

ग्रामसेवकांच्याही या आहेत मागण्या..महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनई १३६) या बंदमध्ये सहभागी आहे. संघटनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्येही मागण्या करण्यात आलेल्या आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करुन पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे, अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करावी. विस्तार अधिकारीपदाची संख्या वाढविणे, कंत्राटी ग्रामसेवक भरती बंद करणे, ग्रामसेवकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधीत्व मिळावे आदी मागण्यांसाठी बंद सुरू आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार फडतरे, सरचिटणीस अभिजित चव्हाण यांच्या सह्या आहेत.

आमच्या संघटनेने राज्य शासनाकडे लोकहिताच्या आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना गरज असणाऱ्या मागण्या केलेल्या आहेत. शासनाने त्वरित निर्णय घेऊन सा मागण्या मान्य कराव्यात. यासाठी तीन दिवस ग्रामपंचायती बंद ठेवल्या आहेत. यामध्ये सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामसेवक संघटना, संगणक चालक, ग्रामरोजगार सेवक सहभागी आहेत. सातारा जिल्ह्यातील सुमारे १२०० ग्रामपंचायती बंद आहेत. तसेच राज्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींनीही कामकाज बंद ठेवलेले आहे. या बंदला राज्यात प्रतिसाद मिळाला आहे. - जितेंद्र भोसले, प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतStrikeसंप