शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

शेतकऱ्यांची एक कोटी २९ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:23 IST

खंडाळा : ‘दीड वर्षात दुप्पट रक्कम करून देतो,’ असे आमिष दाखवून खंडाळा येथील शेतकरी व महिलांना १ कोटी २९ ...

खंडाळा : ‘दीड वर्षात दुप्पट रक्कम करून देतो,’ असे आमिष दाखवून खंडाळा येथील शेतकरी व महिलांना १ कोटी २९ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सच्या धामणकर दाम्पत्यावर खंडाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, दोघेही संशयित आरोपी फरार झाले आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खंडाळा येथील वैभव भास्कर-धामणकर व त्याची पत्नी नीलम यांच्या मालकीचे खंडाळा आणि वाई येथे ज्वेलर्सचे शोरुम आहेत. सन २०१६ मध्ये केसुर्डी (ता. खंडाळा) व परींंचे (ता. पुरंदर जि. पुणे) येथील शेतकºयांच्या जमिनी एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आल्या होत्या. त्या मोबदल्यात मोठ्या रकमा या शेतकºयांकडे जमा झाल्या.ही माहिती धामणकर पती-पत्नीला मिळाल्यानंतर संबंधित शेतकºयांशी त्यांनी जवळीक निर्माण केली. तसेच ‘आम्ही सोन्याची बिस्किटे तयार करून परदेशी पाठवतो. त्यातून पैसे दामदुप्पट केले जातात. आपली संपत्ती मोठी आहे,’ असे भासवून शेतकºयांचा विश्वास संपादन केला.संबंधित पाच शेतकºयांना आपली रक्कम आमच्याकडे गुंतवा. दीड वर्षात दुप्पट रक्कम देतो. या रकमेचा चेक अथवा बँक खात्यावर देऊ, असे त्यांनी आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून या पाच शेतकºयांनी १ कोटी २९ लाख पन्नास हजार रुपये धनादेशाद्वारे धामणकर यांना दिले.मुदत संपल्यानंतर सर्वजण पैसे मागण्यास गेले असता धामणकर दाम्पत्याकडून रक्कम देण्यास टाळाटाळ होऊ लागली. काही शेतकºयांना दिलेले धनादेश बँकेत वटले नाहीत. त्याचवेळी शेतकºयांना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यानंतर त्यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन धामणकर दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यासाठी खंडाळापोलीस गेले असता दोघेही फरार झाले. फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील हे अधिक तपास करीत आहेत.आणखी तक्रारी वाढण्याची शक्यताआर्थिक आमिष दाखवून शेतकºयांची सुमारे दीड कोटीची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर यात आणखी काही शेतकरी अडकले आहेत का? याबाबत पोलीस चाचपणी करीत आहे. औद्योगिकीकरणाच्या वाढीनंतर काही खासगी संस्था आणि वैयक्तिक लोकांकडे रक्कम वाढीसाठी गुंतवणुका केल्याचे यापूर्वीही उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा व्यवहारात अडकलेल्या लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.