शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’चे खांदेपालट राष्ट्रवादीला डोकेदुखी

By admin | Updated: December 23, 2015 01:19 IST

अधिवेशनानंतर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे : सव्वा वर्षाचा कार्यकाल संपला; हालचाली गतिमान

अशोक डोंबाळे -- सांगली -जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापतींचा सव्वा वर्षाचा कार्यकाल दि. २१ डिसेंबरला संपला आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील हिवाळी अधिवेशनात व्यस्त असल्यामुळे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आणि बदलाबाबत निर्णय झाला नाही. अधिवेशन संपताच ते सांगलीत येणार असून, आठ दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. इच्छुकांची गर्दी झाली असून, प्रादेशिक समतोल राखताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका राष्ट्रवादी आणि काँग्रेसने चिन्हावर लढविल्या. त्यावेळी भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे दिग्गज नेते राष्ट्रवादीत होते. त्यांच्या ताकदीवर राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले. निवडणुका होऊन चार वर्षे झाली असून, या कालावधित राष्ट्रवादीमध्ये नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीतील बहुतांशी दिग्गज नेते भाजप, शिवसेनेत गेल्यामुळे त्यांच्या समर्थकांना पदाधिकारी बदलामध्ये कशी संधी द्यायची, यावरून पक्षांतर्गत संघर्ष पेटला आहे. अनिल बाबर गटाच्या सदस्यांना राजेंद्रअण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख, अ‍ॅड्. बाबासाहेब मुळीक यांचा जोरदार विरोध आहे. पक्ष वाढवायचा असेल तर पक्षातून बाहेर पडलेल्यांना संधी देऊ नका, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. हीच परिस्थिती जत, कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्यात आहे. जतमध्ये विलासराव जगताप समर्थक संजीवकुमार सावंत, सुशिला होनमोरे इच्छुक असून, नेत्यांनी त्यांना शब्दही दिला आहे, पण जगताप विरोधकांनी या नावांना विरोध करून सुनंदा रमेश पाटील, रूपाली विक्रमसिंह पाटील यांना संधी देण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. यामुळे येथे कुणाला संधी द्यायची, हे ठरवताना जयंत पाटील यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित आहे. तासगाव तालुक्यास संधी देण्याचा निर्णय माजी गृहमंत्री आर. आर. पाटील असताना झाला होता. आता आबांच्या पश्चात तासगाव तालुक्यातील कोणाला अध्यक्षपदाची लॉटरी लागणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये नव्या सदस्यास संधी द्यायची झाल्यास घोरपडे गटाचे तानाजी यमगर यांचे नाव पुढे येऊ शकते. येथे राष्ट्रवादीच्या गटाबरोबर घोरपडे गटाचे जुळत असल्यामुळे यमगर यांना संधी मिळू शकते. या निर्णयास राष्ट्रवादीतून विरोध झाल्यास गजानन कोठावळे यांना पुन्हा संधी मिळेल. वाळवा तालुक्यातून रणजित पाटील इच्छुक असल्यामुळे त्यांना, की विद्यमान उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनाच पुन्हा संधी मिळणार, याबाबतही नेत्यांचा निर्णय झालेला नाही. पलूस तालुक्यात राष्ट्रवादीचा एकही सदस्य नसून, कडेगाव तालुक्यात एकमेव सुवर्णा पिंगळे या सदस्या आहेत. मागील बदलात त्यांची संधी हुकल्यामुळे यावेळी त्यांचे नाव पुढे येणार आहे. त्या पृथ्वीराज देशमुख यांच्या समर्थक असल्याने पुन्हा भाजपला संधी दिल्याचा संदेश जाणार आहे. शिराळा तालुक्यास यापूर्वी वैशाली नाईक यांच्या रूपाने संधी मिळाली आहे. तेथे जगन्नाथ लोहार यांनी नेत्यांकडे मागणी केल्याची चर्चा आहे. खानापूर तालुक्यातून फिरोज शेख इच्छुक असून, ते अनिल बाबर समर्थक आहेत. सध्याच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती मनीषा पाटील याही बाबर समर्थक आहेत. शेख यांना संधी दिल्यास मनीषा पाटील यांना थांबवावे लागेल. तथापि आटपाडी तालुक्यात बाबर गट वाढविण्यासाठी पाटील यांनाच कायम ठेवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. या निर्णयावरच शेख यांचा निर्णय अवलंबून आहे. अधिवेशनानंतर निर्णय : विलासराव शिंदेजिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सव्वा वर्षाचा कार्यकाल दिला होता, तो संपला आहे, हे खरे आहे. परंतु, सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे कोणतीही चर्चा झालेली नाही. अधिवेशन संपल्यानंतर माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि जिल्ह्यातील अन्य प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन पदाधिकारी बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिली.मिरज तालुका संधीपासूनदूरच...मिरज तालुक्यात राष्ट्रवादीचे तीन सदस्य असून, त्यापैकी राजेंद्र माळी, आप्पासाहेब हुळ्ळे यांना संधी मिळाली आहे. भीमराव माने यांना संधी मिळालेली नाही, पण ते शिवसेनेत दाखल झाल्यामुळे जयंत पाटील त्यांच्या नावाचा विचार करण्याची शक्यता कमी आहे.