शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

होय, गोपीशेठनी आमदारकीसाठीच शपथ मोडली! --- कारण राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:21 IST

सहा-सात वर्षांपूर्वी महादेव जानकरांच्या ‘रासप’ला सोडचिठ्ठी देऊन गोपीशेठ भाजपवासी झाले. मुंडे-तावडेंनी त्यांना आमदार करण्याचं गाजर दाखवलं होतं. मागच्या विधानसभेला खानापूर मतदारसंघातून भाजपचं तिकीट देण्यात आलं.

- श्रीनिवास नागे‘भाजपमध्ये पुन्हा जायला मला काय खुळ्या कुत्र्यानं चावलंय का?’ असा खासगीत सवाल करणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी वंचित बहुजन आघाडी सोडली... आणि आता ते पुन्हा भाजपवासी होताहेत. ‘भाजपनं आरक्षण दिलं नाही तर, भाजपकडून मी उभा राहिलो तरी मतदान करायचं नाही’, अशी शपथ आरेवाडीतल्या बिरोबाच्या बनात कार्यकर्त्यांना घ्यायला लावणारे गोपीशेठ (हो! आटपाडी-माणमध्ये त्यांना अजूनही शेठ म्हणतात.) आता आमदारकीचं बाशिंग बांधून भाजपच्या प्रचारात उतरणार. कसंही करून सत्तेत जाण्यासाठीचा दुसरा मार्ग त्यांना हुडकता आला नसावा बहुधा.

गोपीशेठ नेहमीच धनगर समाजाच्या आरक्षणाचं कार्ड वापरत आलेत. भाजपनं ते दिलं नसल्यानं वर्षभर सरकारवर तोंडसुख घेतलं. आता विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप सरकारनं आरक्षणाबाबत सकारात्मक पावलं उचलल्याचा आणि ते त्यांच्याकडूनच मिळणार असल्याचा साक्षात्कार त्यांना झालाय... म्हणूनच त्यांनी शपथ मोडली...सहा-सात वर्षांपूर्वी महादेव जानकरांच्या ‘रासप’ला सोडचिठ्ठी देऊन गोपीशेठ भाजपवासी झाले. मुंडे-तावडेंनी त्यांना आमदार करण्याचं गाजर दाखवलं होतं. मागच्या विधानसभेला खानापूर मतदारसंघातून भाजपचं तिकीट देण्यात आलं. तिस-या नंबरची मतं त्यांनी घेतली. त्याच दरम्यान खासदार संजयकाका पाटील यांच्याशी त्यांचं बिनसलं. लोकसभेला मदत करूनही काकांनी विधानसभेला पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप ते करू लागले. महामंडळ मिळवून देण्यातही काकांनी त्यांना साथ दिली नाही. त्यामुळं दोघं जणू ‘जानी दुश्मन’ बनले. दोन्ही गटात दोनदा हाणामारीही झाली. मधल्या काळात गोपीशेठ भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष, तर भाऊ ब्रह्मानंद जिल्हा परिषदेत सभापती झाले. वर्षभरापूर्वी काकांशी पुन्हा वाजलं आणि शेठनी भाजपला रामराम ठोकला.लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्टÑवादीशी त्यांचं जुळलं नाही, कारण सांगलीची जागा ‘स्वाभिमानी’ला गेली. जयंतराव पाटील आणि विश्वजित कदम यांनी त्यांना सोबत घेण्यासाठी केलेले प्रयत्न वाया गेले. ‘स्वाभिमानी’ची उमेदवारी विशाल पाटील यांना जाहीर झाली, त्याच दिवशी गोपीशेठ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बनले! ‘एकच छंद गोपीचंद’ ही स्लोगन घेऊन त्यांनी तीन लाखावर मतं खेचली. भाजपच्या संजयकाकांसह विशाल पाटीलना घाम फोडला.लोकसभेवेळी एकदम चर्चेला आलेला ‘वंचित फॅक्टर’ विधानसभेला सांगलीत चालेल की नाही, अशा शंकेचं मोहोळ फुटलं. कारण पक्षाचे महासचिव करूनही गोपीशेठ ‘वंचित’पासून दुरावत चालले होते. मुख्यमंत्र्यांशी त्यांचा खास दोस्ताना होताच. लोकसभा निवडणुकीत विरोधात जाऊनही तो कायम राहिला. त्यातच लोकसभेची तीन लाखावर मतं म्हणजे ‘वंचित’चा नव्हे तर गोपीशेठचा वैयक्तिक करिश्मा असल्याची कुजबूज सुरू झाली. शेठना सत्तेत जायची स्वप्नं पडू लागली. हालचाली वाढल्या. त्यामुळंच प्रकाश आंबेडकरांची सत्तासंपादन रॅली शेजारच्या सोलापूर-कोल्हापुरात आली, पण सांगलीत नाही आली. शेठ ‘वंचित’ सोडणार असल्याच्या बातमीचा इन्कार वारंवार त्यांच्या नेत्यांना करावा लागत होता. अगदी काल-परवापर्यंत ‘वंचित’वाले आणि खुद्द शेठही पक्ष सोडणार नसल्याचं सांगत होते... पण किल्ल्या फिरल्या. गोपीशेठना खानापूर, सांगोला किंवा जतमधून आमदार व्हायचंय. खानापूर हा घरचा मतदारसंघ, तर सांगोला-जतमध्ये धनगर समाजाची मोठी ‘व्होट बँक’. त्यातही खानापुरात जमेलच याची खात्री नाही. शिवाय तिथं सदाभाऊ पाटील यांचा पैरा फेडावा लागणार. सांगोल्यात गणपतआबा देशमुख रिंगणात उतरले, तर पंचाईत. त्यापेक्षा जत बरा. तिथले आमदार विलासराव जगताप भाजपचेच, पण त्यांना पक्षातून विरोध. शेठना लोकसभेला तिथून दुसºया नंबरची मतं मिळालेली. त्यामुळं आशा दुणावली. नुरा कुस्ती खेळलेल्या मुख्यमंत्र्यांकडून शब्द मिळाला की झालंच. भाजपला दिलेल्या शिव्या विसरल्या जातील आणि संजयकाकांशीही जमेल! जतमध्ये आधी चाचपणी झालीय, आता थेट तयारीच.जाता-जाता : राज्यभरातल्या धनगर समाजानं लोकसभेला गोपीशेठना तगडी रसद पुरवली. ती त्यांनी एकट्यानंच वापरल्याचं ‘वंचित’वाले म्हणताहेत. धनगर समाजानं आपल्यातलं पोरगं उभं राहिलंय म्हणून भरभरून मतं दिली. बहुजन समाजाचा चेहरा म्हणून इतरांनीही मताचं दान टाकलं. ‘फॉर्च्युनर’मधून फिरणारा ‘वंचित’ कसा, असं म्हणून काहींनी हिणवलं. लक्ष्मण मानेंनी तर शेठना महासचिव करताच शेठ आणि संभाजी भिडेंच्या संबंधावर बोट ठेवून ‘वंचित’ सोडली. शेठनी काही महिन्यांपूर्वी साऊथ इंडियन स्टाईलची मराठी फिल्म केली. चक्क हिरो बनून हिरॉईनभोवती चकरा मारल्या. सोळा-सतरा कोटीचा चुराडा झाला. आरक्षण जागृती करत राज्यभर फिरण्यासाठी शेठ हेलिकॉप्टर वापरत म्हणे! (ती रसद कुठून आली कुणास ठावूक.) हे सगळं-सगळं मागं पडलं. आता त्यांनी वंचित आघाडीचीही साथ सोडली. वर्षभरातच शपथ मोडून भाजपशी पुन्हा घरोबा करण्याचं ठरवलंय... केवळ आमदारकीसाठी.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीElectionनिवडणूक