शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
5
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
6
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
8
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
9
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
10
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
11
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
12
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..
14
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
15
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
16
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
17
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
18
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
19
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
20
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

यशवंतरावांचे स्मारक प्रेरणास्थान बनेल

By admin | Updated: June 27, 2014 01:02 IST

शरद पवार : देवराष्ट्रेत स्मारकाचे उद्घाटन

सांगली/देवराष्ट्रे : सामान्य कुटुंबातही कर्तृत्ववान माणसं जन्माला येऊ शकतात, ही गोष्ट यशवंतरावांच्या जन्मघराकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. त्यामुळे हे स्मारक महाराष्ट्रातील आणि बाहेरील तरुणांसाठी प्रेरणास्थान बनेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी गुरुवारी देवराष्ट्रे येथील कार्यक्रमात व्यक्त केला. देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाचे उद्घाटन गुरुवारी पवार यांच्याहस्ते करण्यात आले. स्मारक लोकार्पण सोहळ््यास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, पालकमंत्री पतंगराव कदम, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे महामंडळ) शशिकांत शिंदे, खा. सुप्रिया सुळे उपस्थित होते. पवार म्हणाले की, यशवंतरावांच्या नावे विविध संस्था उभारण्यात आल्या. या लोकोपयोगी संस्थांनी त्यांच्या स्मृती जपल्या आहेत. मुंबईतील यशवंतरावांचे स्मारक व प्रतिष्ठानच्या उभारणीत वसंतदादांनी पुढाकार घेतला होता. यशवंतरावांनी राज्यासाठी व देशासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहण्यासारखे आहे. प्रशासकीय सेवेचा अनुभव त्यांना होता. त्यामुळे प्रशासक आणि प्रशासन यांना मानवी चेहरा असायला हवा, म्हणून त्यांनी प्रयत्न केले. संसदेत काम करताना संसदीय कामकाजाची पथ्ये पाळण्याची खबरदारी घेणारे ते नेते होते. नेते अनेक होऊन जातात, पण कायमस्वरुपी आपला ठसा उमटविणारे कर्तृत्ववान लोक फार कमी असतात. कृष्णाकाठच्या मातीने अनेक कर्तृत्ववान माणसं जन्माला घातली. यात यशवंतरावांचे कार्य देशाला दिशादर्शक आहे. औद्योगिक, शेती, सहकार, शिक्षण, सामाजिक परिवर्तन अशा सर्वच क्षेत्रांना त्यांनी नवी दिशा दिली. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीही यशवंतरावांच्या अनेक आठवणी सांगितल्या. गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले, लोकोत्तर पुरुष म्हणून यशवंतरावांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. या मातीने मोठी माणसं जन्माला घातली ही गोष्ट खरी असली तरी, हयातीत त्यांना तो मोठेपणा मिळाला नाही. त्यांना अपमान सहन करतानाच संघर्षही करावा लागला. यशवंतराव पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकले नाहीत, याची खंत नेहमी सतावते. पालकमंत्री कदम म्हणाले की, यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोनहिऱ्याचा हा परिसर विकसित करण्याचा निर्धार शासनाने केला होता. यातील बरीच कामे पूर्ण झाली आहेत. जयंत पाटील म्हणाले की, यशवंतरावांच्या पाऊलखुणांनी सोनहिऱ्याची भूमी सजली आहे. या परिसराच्या विकासाची कल्पना आता सत्यात उतरत आहे. कार्यक्रमास आ. विक्रमसिंह पाटणकर, आ. मानसिंगराव नाईक, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज देशमुख, प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता सराफ उपस्थित होते. (प्रतिनिधी)