शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

वाई घाटात पोत्यांचा; खंबाटकीत बॅरेलचा आधार

By admin | Updated: March 8, 2017 23:25 IST

धोकादायक वळणांचा प्रवास : स्थानिकांसह पर्यटकांचाही जीव धोक्यात, तातडीने उपाययोजना करण्याची प्रवाशांमधून मागणी

संपूर्ण घाटात अनेक ठिकाणी वाहनांच्या अपघातानेच संरक्षक कठडे ढासळले आहेत. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लाखो रुपयांचे वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पसरणी घाटात खतांच्या पोत्यांनी भरलेला ट्रक कठडा तोडून दोनशे फूट दरीत कोसळला आहे. चालक हाच मालक होता त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून भरलेला ट्रक आजही दरीतून बाहेर काढलेला नाही. गाडीत असलेली खतांची पोती चोरीला गेली. पसरणी घाटात दरवर्षी शेकडो अपघात बांधकाम विभागाच्या गलथान पणामुळे झालेले आहेत. याला जबाबदार कोण?, असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.वाई : निसर्ग सौंदर्याने भरभरून दिलेल्या महाबळेश्वर, पाचगणी परिसराला आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटनाचा दर्जा आहे. मात्र, येथे येणाऱ्या पर्यटकांचा जीव आता धोक्यात जाण्याची भीती दिसत आहे. पाचगणी मुख्य रस्त्यावर पसरणी घाटात अनेक ठिकाणी संरक्षक कठडे कोसळले आहेत. या कठड्यांच्या जागी संबंधित विभागाने चक्क वाळूची पोती लावली आहेत. रात्रीच्या वेळी या अरुंद घाटातून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. गेल्या महिन्याभरात पन्नासहून अधिक गाड्या या दरीत गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाचगणी मुख्य रस्त्यावर पसरणी घाटात अनेक ठिकाणी विविध वाहनांच्या अपघाताने व पावसामुळे संरक्षक कठडे ढासळलेले आहेत. पसरणी घाटातील ढासळलेले कठडे अपघातास निमंत्रण देत आहेत. घाटात सध्या अपघाताची मालिका सुरू असून, त्यात कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जीव मुठीत घेऊन वाईतून पाचगणीला जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. मुळातच अरुंद घाट असल्याने वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब होऊन बसली आहे. सध्या परीक्षांचा काळ असला तरी पाचगणी महाबळेश्वरचा हंगाम तोंडावर आल्याने संबंधित विभागाने पसरणी घाटातील सर्व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी असताना बांधकाम विभागाचा वेळकाढूपणा हा प्रवाशांच्या मुळावर उठला आहे. पावसाळ्यापर्यंत ही कामे पूर्ण न झाल्यास पसरणी घाटात अतिशय विचित्र परिस्थिती उद्भवू शकते. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवून घाटातील संरक्षक भिंत दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी आहे. संबंधित विभागाच्या मेहरबानीने पसरणी घाटाची ओळख सध्या ‘डेंजर घाट’ म्हणून झाली आहे. ही ओळख पुसण्यासाठी बांधकाम विभागाने लागणाऱ्या निधीचे कारण पुढे न करता त्वरित हालचाल करून संरक्षक कठड्यांची उभारणी करून प्रवाशांची होणारी परवड थांबवावी व ढासळलेल्या कठड्याच्या ठिकाणी त्वरित उपाययोजना कराव्यात. ढासळलेल्या कठड्यांना फक्त वाळूने भरलेल्या पोत्यांचा आधार आहे. संबंधित विभागाने डोळ्यावर पट्टी न बांधता त्वरित घाटातील दुरुस्तीची कामे पावसाळ्या पूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरत आहे. तसेच दररोज पाचगणी-महाबळेश्वरला जाणाऱ्या नोकरदार व शाळेसाठी जाणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही तर पाचगणीकरांना वाई शहरातील मार्केट जवळ असल्याने या घाटातून वाहतूक बऱ्यापैकी सुरू असते. दर शनिवारी, रविवारी या सलग सुट्यांदिवशी महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांची प्रचंड गर्दी असल्याने दोन किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यातच ढासळलेल्या कठड्यांची भीती मनात धरूनच या घाटातून प्रवास करावा लागतो. (प्रतिनिधी)