शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांचे मुंबई दौरे थांबले

By admin | Updated: November 18, 2015 00:01 IST

काँग्रेस, राष्ट्रवादीची परिस्थिती : केंद्रात व राज्यात सत्ता नसल्याचा परिणाम

प्रशांत चव्हाण-- ताकारी --केंद्रात आणि राज्यात सत्ता नसल्याने मागील वर्षभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे मुंबई दौरे अखेर थांबले आहेत.राज्यात सुमारे १५ वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्याआधीही युती सरकारमधील पाच वर्षाचा (१९९५-९९) काळ वगळता काँग्रेसचीच सत्ता होती. केंद्रातही सुमारे १० वर्षे सलग काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मुंबई दौरे ठरलेले असायचे. यात प्रामुख्याने आमदार जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मुंबई दौऱ्यावर जोर असायचा. आमदार पतंगराव कदम, आर. आर. पाटील यांचेही कार्यकर्ते महत्त्वाच्या कामासाठी मुंबईलाच जाणे पसंत करत होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील कार्यकर्त्यांचे मुंबई दौरे व्हायचे.मात्र मागील वर्षी सत्ता गमावल्यानंतर आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीचे राज्य आल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांचे हे दौरे जवळपास बंद झाले आहेत. सहकारी संस्थांची कामे, अधिकाऱ्यांच्या तसेच नातेवाईकांच्या बदल्या, पदाधिकारी नियुक्ती, शिक्षण संस्थांची कामे, विविध विभागातील कंत्राट मिळविणे आदी कामांसाठी या दोन्ही पक्षांच्या तालुका व स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचे दौरे होत असत. गावातील गटा-तटाच्या राजकारणामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना काही कामे मतदारसंघात सांगणे अवघड वाटत असल्याने, ते मुंबई दौरा करून आपली कामे मार्गी लावत असत. काही नेत्यांभोवती तेच ते नेते असल्याने मतदारसंघात नेत्यांना न भेटता मुंबईतच भेटणे कार्यकर्त्यांना सोयीचे झाले होते.आमदार जयंत पाटील यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी दिली. यामध्ये महाराष्ट्र राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, ‘महानंदा’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांचा समावेश होतो. हे पदाधिकारीही मुंबईतच तळ ठोकून असायचे.गेल्या दहा वर्षात दर पंधरा दिवसांनी मुंबईला जाणारे काही पदाधिकारी होते. त्यामुळे त्यांना मुंबईला जायची सवय अंगवळणी पडली होती. मात्र मागील वर्षभरापासून एकदाही मुंबईला जाण्याचा योग त्यांना आलेला नाही.भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचे दौरे नसल्यासारखे..!काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजप-शिवसेना सत्तेवर आली. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था काँग्र्रेस, राष्ट्रवादीच्याच ताब्यात असल्याने शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचे दौरे नसल्यासारखेच आहेत.आता फक्त चौकशीसाठीच मुंबई वारी..!राज्यात भाजप, शिवसेना सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बऱ्याच संस्थांची चौकशी लावली आहे. या चौकशीत बऱ्याच पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई वारी फक्त चौकशीपुरतीच राहिली आहे.