शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कार्यकर्त्यांचे मुंबई दौरे थांबले

By admin | Updated: November 18, 2015 00:01 IST

काँग्रेस, राष्ट्रवादीची परिस्थिती : केंद्रात व राज्यात सत्ता नसल्याचा परिणाम

प्रशांत चव्हाण-- ताकारी --केंद्रात आणि राज्यात सत्ता नसल्याने मागील वर्षभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे मुंबई दौरे अखेर थांबले आहेत.राज्यात सुमारे १५ वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्याआधीही युती सरकारमधील पाच वर्षाचा (१९९५-९९) काळ वगळता काँग्रेसचीच सत्ता होती. केंद्रातही सुमारे १० वर्षे सलग काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मुंबई दौरे ठरलेले असायचे. यात प्रामुख्याने आमदार जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मुंबई दौऱ्यावर जोर असायचा. आमदार पतंगराव कदम, आर. आर. पाटील यांचेही कार्यकर्ते महत्त्वाच्या कामासाठी मुंबईलाच जाणे पसंत करत होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील कार्यकर्त्यांचे मुंबई दौरे व्हायचे.मात्र मागील वर्षी सत्ता गमावल्यानंतर आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीचे राज्य आल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांचे हे दौरे जवळपास बंद झाले आहेत. सहकारी संस्थांची कामे, अधिकाऱ्यांच्या तसेच नातेवाईकांच्या बदल्या, पदाधिकारी नियुक्ती, शिक्षण संस्थांची कामे, विविध विभागातील कंत्राट मिळविणे आदी कामांसाठी या दोन्ही पक्षांच्या तालुका व स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचे दौरे होत असत. गावातील गटा-तटाच्या राजकारणामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना काही कामे मतदारसंघात सांगणे अवघड वाटत असल्याने, ते मुंबई दौरा करून आपली कामे मार्गी लावत असत. काही नेत्यांभोवती तेच ते नेते असल्याने मतदारसंघात नेत्यांना न भेटता मुंबईतच भेटणे कार्यकर्त्यांना सोयीचे झाले होते.आमदार जयंत पाटील यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी दिली. यामध्ये महाराष्ट्र राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, ‘महानंदा’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांचा समावेश होतो. हे पदाधिकारीही मुंबईतच तळ ठोकून असायचे.गेल्या दहा वर्षात दर पंधरा दिवसांनी मुंबईला जाणारे काही पदाधिकारी होते. त्यामुळे त्यांना मुंबईला जायची सवय अंगवळणी पडली होती. मात्र मागील वर्षभरापासून एकदाही मुंबईला जाण्याचा योग त्यांना आलेला नाही.भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचे दौरे नसल्यासारखे..!काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजप-शिवसेना सत्तेवर आली. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था काँग्र्रेस, राष्ट्रवादीच्याच ताब्यात असल्याने शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचे दौरे नसल्यासारखेच आहेत.आता फक्त चौकशीसाठीच मुंबई वारी..!राज्यात भाजप, शिवसेना सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बऱ्याच संस्थांची चौकशी लावली आहे. या चौकशीत बऱ्याच पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई वारी फक्त चौकशीपुरतीच राहिली आहे.