शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टींची ‘व्होट बँक’ राखण्यासाठी कसरत : अमृत योजनेचे राजकारण नव्या वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:21 IST

इस्लामपूर : इचलकरंजीतील अमृत योजनेसाठी वारणा नदीतून पाणी उचलण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. मात्र

ठळक मुद्देइचलकरंजी पाणी योजनेस विरोध टाळला

अशोक पाटील ।इस्लामपूर : इचलकरंजीतील अमृत योजनेसाठी वारणा नदीतून पाणी उचलण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ‘इचलकरंजीला पाणी देताना वारणाकाठावर अन्याय होऊ देणार नाही’ असे वक्तव्य करुन शेतकºयांची ‘व्होट बँक’ शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजीला हे पाणी मिळणार असल्याने, त्यांनी योजनेला उघड विरोध करणे टाळले आहे.

वारणेचे पाणी इचलकरंजीला नेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे ही योजना होऊ देणार नसल्याची भूमिका शेकापचे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, ढवळीचे माजी सरपंच शरद पाटील, वाळवा पंचायत समितीचे विरोधी गटनेते राहुल महाडिक, वारणा काठावरील गावांनी घेतली आहे. त्यासाठी पक्षविरहित वारणा बचाव कृती समिती स्थापन केली आहे.

राजू शेट्टी यांनी नुकताच वाळवा तालुक्यात दौरा केला. कणेगाव येथे शेतकºयांनी अमृत योजनेचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी खा. शेट्टी यांनी स्वत:च्या मतपेढीचा विचार करून इचलकरंजीकरांना दुखवायचे नाही आणि वाळव्यातील शेतकºयांचा रोषही पत्करायचा नाही, या भूमिकेतून सामंजस्याने तोडगा काढू, असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची समजूत काढली व वेळ मारून नेली.

वारणा खोºयातील जिरायती जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. वसंतदादांनी चांदोली येथे धरण होण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतु सांगली जिल्ह्यातील शेवटच्या दुष्काळी भागापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी खुजगाव येथे धरण व्हावे म्हणून राजारामबापूंनी आग्रह धरला होता. या दोघांचा वाद साºया महाराष्ट्राला ज्ञात होता. शेवटी वारणा नदीवर चांदोली येथे धरण झाले. त्या वादाचे पडसाद अजून उमटत आहेत. 

खा. राजू शेट्टी जनसामान्य आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. एकीकडे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तर या योजनेमुळे शेतकºयांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळणार नाही. हे दोन्ही प्रश्न शेट्टी यांच्या जिव्हाळ्याचे बनले आहेत. त्यामुळे त्यांनी इचलकरंजी व वारणा पट्ट्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.- राहुल महाडिक, विरोधी गट नेते, वाळवा पंचायत समिती.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली