शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई निधी रखडल्याने टेंभू योजना बंद

By admin | Updated: February 19, 2015 23:41 IST

राज्य सरकारकडून दुर्लक्ष : पाच कोटींच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित

प्रताप महाडिक -कडेगाव - टेंभू उपसा सिंचन प्रकल्प योजनेचा वीज पुरवठा, पाच कोटींच्या थकित वीज बिलामुळे खंडित करण्यात आला आहे. यापैकी ३ कोटी १५ लाख रुपये थकबाकी राज्य शासनाकडून टंचाई उपाययोजना निधीतून मिळणार आहे. शिवाय १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी शेतकऱ्यांच्या नियमित पाणीपट्टी वसुलीतून भरायची आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून ही पाणीपट्टी रक्कम कपात करुन तात्काळ भरण्याची व्यवस्था होत आहे. परंतु शासनाकडे अडकलेला टंचाई उपाययोजना निधी कधी मिळणार?, असा संतप्त सवाल लाभक्षेत्रातील शेतकरी करीत आहेत.टेंभू योजनेची टप्पा क्रमांक १ अ, १ ब तसेच शिवाजीनगर टप्पा क्रमांक २ मधील पाच कोटी इतकी वीजबिल थकबाकी आहे. या पट्ट्यांच्या लाभक्षेत्रात जवळपास ४ हजार २०० हेक्टर शेतजमिनीला पाणी दिले जाते. योजनेचे यावर्षी एक आवर्तन पूर्ण क्षमतेने दिले आहे. या एका आवर्तनाची १ कोटी ७५ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. ही थकबाकी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातूनच वसूल होत आहे. परंतु शासनाकडे अडकलेल्या निधीचे काय?आता टंचाई काळात दिलेल्या आवर्तनाची वीजबिल थकबाकी असल्यामुळेच योजना बंद आहे. शासनाने टेंभू योजनेत ३ कोटी १५ लाख रुपये इतकी टंचाई काळातील वीजबिल थकबाकी भरण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. याशिवाय ताकारी आणि म्हैसाळचीही तरतूद केली आहे. परंतु प्रत्यक्ष रक्कम जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे वर्ग होण्यास विलंब होत आहे. पहिल्या आवर्तनावेळी सिंचन योजनांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यावेळीच तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी, टंचाई काळातली थकबाकी लवकरच भरणार आहोत, असे हमीपत्र महावितरणला दिले होते. परंतु अद्याप ही रक्कम प्राप्त झालेली नाही.शेतकऱ्यांकडील पाणीपट्टी तात्काळ वसूल होते. मात्र शासनच त्यांच्याकडील निधी देण्यास विलंब करीत आहे. यामुळे टेंभू योजना बंद आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन टंचाई उपाययोजना निधीची रक्कम संबंधित योजनेकडे तात्काळ वर्ग करावी, अशी मागणी संतप्त शेतकरी वर्गातून होत आहे.टेंभू योजनेची शेतकऱ्यांकडे अडकलेली १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी महावितरणने भरुन घ्यावी आणि वीजपुरवठा पूर्ववत करावा. शासनाकडे अडकलेली टंचाई काळातील थकबाकी मिळणार आहे, तसे हमीपत्रही घेतले आहे. आता याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. उन्हाची तीव्रता वाढत आहे. पिके कोमेजू लागली आहेत. पाणी त्वरित मिळाले नाही, तर पिके करपतील, अशी वस्तुस्थिती टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात दिसत आहे.स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू टेंभू योजनेची पाणीपट्टी आकारणी, वसुली, तसेच आवर्तनाचे व्यवस्थापन आदी कामे सुरळीत व पारदर्शक व्हावीत म्हणून योजनेचा स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू केला आहे. याचे विभागीय कार्यालय ओगलेवाडी येथे, तर उपविभागीय कार्यालय कडेपूर येथे सुरू होत आहे. लाभक्षेत्र वाढले की पाणीपट्टी आकारणी कमी होते. शेतकऱ्यांनी आपल्या लाभक्षेत्राची माहिती प्रामाणिकपणे योजनेकडे देणे गरजेचे आहे.