शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

टंचाई निधी रखडल्याने टेंभू योजना बंद

By admin | Updated: February 19, 2015 23:41 IST

राज्य सरकारकडून दुर्लक्ष : पाच कोटींच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित

प्रताप महाडिक -कडेगाव - टेंभू उपसा सिंचन प्रकल्प योजनेचा वीज पुरवठा, पाच कोटींच्या थकित वीज बिलामुळे खंडित करण्यात आला आहे. यापैकी ३ कोटी १५ लाख रुपये थकबाकी राज्य शासनाकडून टंचाई उपाययोजना निधीतून मिळणार आहे. शिवाय १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी शेतकऱ्यांच्या नियमित पाणीपट्टी वसुलीतून भरायची आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून ही पाणीपट्टी रक्कम कपात करुन तात्काळ भरण्याची व्यवस्था होत आहे. परंतु शासनाकडे अडकलेला टंचाई उपाययोजना निधी कधी मिळणार?, असा संतप्त सवाल लाभक्षेत्रातील शेतकरी करीत आहेत.टेंभू योजनेची टप्पा क्रमांक १ अ, १ ब तसेच शिवाजीनगर टप्पा क्रमांक २ मधील पाच कोटी इतकी वीजबिल थकबाकी आहे. या पट्ट्यांच्या लाभक्षेत्रात जवळपास ४ हजार २०० हेक्टर शेतजमिनीला पाणी दिले जाते. योजनेचे यावर्षी एक आवर्तन पूर्ण क्षमतेने दिले आहे. या एका आवर्तनाची १ कोटी ७५ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. ही थकबाकी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातूनच वसूल होत आहे. परंतु शासनाकडे अडकलेल्या निधीचे काय?आता टंचाई काळात दिलेल्या आवर्तनाची वीजबिल थकबाकी असल्यामुळेच योजना बंद आहे. शासनाने टेंभू योजनेत ३ कोटी १५ लाख रुपये इतकी टंचाई काळातील वीजबिल थकबाकी भरण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. याशिवाय ताकारी आणि म्हैसाळचीही तरतूद केली आहे. परंतु प्रत्यक्ष रक्कम जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे वर्ग होण्यास विलंब होत आहे. पहिल्या आवर्तनावेळी सिंचन योजनांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यावेळीच तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी, टंचाई काळातली थकबाकी लवकरच भरणार आहोत, असे हमीपत्र महावितरणला दिले होते. परंतु अद्याप ही रक्कम प्राप्त झालेली नाही.शेतकऱ्यांकडील पाणीपट्टी तात्काळ वसूल होते. मात्र शासनच त्यांच्याकडील निधी देण्यास विलंब करीत आहे. यामुळे टेंभू योजना बंद आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन टंचाई उपाययोजना निधीची रक्कम संबंधित योजनेकडे तात्काळ वर्ग करावी, अशी मागणी संतप्त शेतकरी वर्गातून होत आहे.टेंभू योजनेची शेतकऱ्यांकडे अडकलेली १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी महावितरणने भरुन घ्यावी आणि वीजपुरवठा पूर्ववत करावा. शासनाकडे अडकलेली टंचाई काळातील थकबाकी मिळणार आहे, तसे हमीपत्रही घेतले आहे. आता याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. उन्हाची तीव्रता वाढत आहे. पिके कोमेजू लागली आहेत. पाणी त्वरित मिळाले नाही, तर पिके करपतील, अशी वस्तुस्थिती टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात दिसत आहे.स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू टेंभू योजनेची पाणीपट्टी आकारणी, वसुली, तसेच आवर्तनाचे व्यवस्थापन आदी कामे सुरळीत व पारदर्शक व्हावीत म्हणून योजनेचा स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू केला आहे. याचे विभागीय कार्यालय ओगलेवाडी येथे, तर उपविभागीय कार्यालय कडेपूर येथे सुरू होत आहे. लाभक्षेत्र वाढले की पाणीपट्टी आकारणी कमी होते. शेतकऱ्यांनी आपल्या लाभक्षेत्राची माहिती प्रामाणिकपणे योजनेकडे देणे गरजेचे आहे.