शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात विधानसभेला चौरंगी लढतीचा डाव- निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:11 IST

इस्लामपूर : शिराळा मतदारसंघात तीन गटांभोवतीच राजकारण फिरत आले आहे. आमदार शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक या दोघांच्या सत्तासंघर्षात काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना

ठळक मुद्देसम्राट महाडिक, अभिजित पाटील रिंगणात थांबण्यासाठी प्रयत्न, नवी समीकरणे

अशोक पाटील ।इस्लामपूर : शिराळा मतदारसंघात तीन गटांभोवतीच राजकारण फिरत आले आहे. आमदार शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक या दोघांच्या सत्तासंघर्षात काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना अद्याप उभारी आलेली नाही. आता वाळवा तालुक्यातील सम्राट महाडिक, अभिजित पाटील यांनाही शिराळा मतदारसंघ महत्त्वाचा वाटू लागला आहे. हे दोघेही उभे रहावेत म्हणून एका नेत्याने देव पाण्यात घातले आहेत.

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक, मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख विकासाचा डांगोरा पिटत आहेत. या मतदार संघातील डोंगरी भागाचा विकास झाला पाहिजे, मुंबईकडे वळणारा तरुण भागातच राहिला पाहिजे, यासाठी शिराळ्यात औद्योगिक क्षेत्र तयार केले, याचेही श्रेय लाटण्यासाठी नेते सरसावले. उद्योगांच्या नावाखाली नेत्यांच्या बगलबच्चांनीच तेथील भूखंड लाटले. त्यानंतर ते भूखंड चढ्या भावाने विकले, तर काहींनी अनुदान हाणले. त्यामुळे या परिसरातील युवकांच्या हाताला काम मिळालेच नाही. हाच मुद्दा घेऊन सम्राट महाडिक यांनी रणशिंग फुंकले आहे.

मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ४९ गावांतील तरुण सम्राट महाडिक यांच्या मागे असल्याचा दावा महाडिक युवा शक्तीकडून केला जात आहे. मात्र याचा आनंद राष्ट्रवादीतील नेत्यांना होत आहे. महाडिक गटाचा फटका आमदार नाईक गटाला बसेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील शिराळा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची भाषा करत आहेत. त्यामागेही राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे.कुणाची ताकद, कोण कमजोर?शिराळा मतदार संघात समाविष्ट, परंतु वाळवा तालुक्यातील ४९ गावांमध्ये आमदार जयंत पाटील यांची सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठी ताकद आहे. येलूर, पेठ जिल्हा परिषद मतदार संघात महाडिक गट वरचढ आहे, तर आमदार शिवाजीराव नाईक यांचाही ४९ गावात उल्लेखनीय लोकसंपर्क आहे. विविध फंडातून राष्टÑवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी विकासकामे केली आहेत. निष्ठावान काँग्रेसचे मतदार बोटावर मोजण्याएवढेच राहिले आहेत. त्यामुळे सत्यजित देशमुख यांची ताकद कमकुवत आहे. 

२००९ च्या निवडणुकीत आम्ही मानसिंगराव नाईक यांना मदत केली. सम्राट महाडिक आणि अभिजित पाटील यांच्या भूमिकेने काहींचा फायदा होईल, असे वाटणे चुकीचे ठरेल. ते दोघे आमचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्यापासून काँग्रेसच्या माध्यमातून एकत्र होते. आता त्यांनी त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. आघाडी झाल्यास शिराळा मतदारसंघ काँग्रेसला देण्याची विनंती केली आहे.- सत्यजित देशमुख, प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस.