शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाईन पार्कच्या ‘नशेत’ उद्योगांची पिछेहाट

By admin | Updated: December 2, 2015 00:38 IST

चर्चा सांडगेवाडी वसाहतीची : द्राक्ष बागायतदार संकटात; उद्योजकांनाही मोठा फटका

आर. एन. बुरांडे -- पलूस तालुका आणि परिसरातील तालुक्यात खाण्यासाठी लागणाऱ्या द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. द्राक्ष उत्पादन आणि बाजारपेठ यांचाही समतोल योग्य प्रमाणात साधला जायचा. शिवाय बेदाणा निर्मितीही मोठ्या प्रमाणात व्हायची, परंतु सर्व काही आलबेल असताना, १४ वर्षांपूर्वी अचानक सांडगेवाडी येथे वाईन पार्क उभारण्याचा ‘पेग’ परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिला गेला आणि येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी मात्र नशेत राहून भूईसपाट झाला. परिसरातील उद्योजकतेला मोठ्या पिछेहाटीला सामोरे जावे लागले.२००१ मध्ये राज्यातील लोकशाही आघाडी शासनाने महाराष्ट्राचे द्राक्ष प्रक्रिया धोरण जाहीर करुन द्राक्ष प्रक्रिया उद्योगास अनेक सोयी-सुविधा, सवलती जाहीर केल्या. पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथील २५० एकर जागेवर कृष्णा वाईन पार्कची उभारणी करण्यात आली. परिसरातील द्राक्ष उत्पादकांना भव्य-दिव्य स्वप्ने दाखविण्यात आली. या स्वप्नांच्या नशेत येथील शेतकऱ्यांनी वाईन निर्मिती योजना राबविण्याचा निर्णय घेतला. द्राक्ष बागायतदारांनी खाण्याच्या द्राक्षाच्या बागा काढून त्या ठिकाणी वाईन निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या बागांची लागवड केली. द्राक्षांच्या खरेदीसंदर्भात करारही केले गेले. करार आणि द्राक्षाला मिळणारा भाव यामुळे वाईनसाठी लागणाऱ्या द्राक्ष बागांच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. मुळातच महाराष्ट्रातील काही ठिकाणचा अपवाद वगळता, इतरत्र असणारे हवामान हे वाईन पिण्यासाठी योग्य असे नाही. यामुळे वाईनची मागणी मर्यादितच राहिली. तर अन्य देशातून आयात होणाऱ्या वाईनचा दर्जा राज्यात उत्पादित होणाऱ्या दर्जाच्या तुलनेत उच्च प्रतीचा असताना, राज्यातील वाईनला मोठी मागणी नव्हती. राज्यातील वाईनचे उत्पादन वाढले तरी, मागणीत वाढ झाली नाही. त्यामुळे वाईन पार्कमध्ये तयार होणारी लाखो लिटर वाईन पडून राहिली. त्यामुळे वाईन निर्मिती ठप्प झाली. त्यामुळे द्राक्षांची मागणी थांबली. यामुळे प्रसंगी कर्ज काढून खाण्याच्या द्राक्षबागा काढून वाईन द्राक्ष बागा उभारणारा शेतकरी मात्र पूर्णपणे हबकला ! अनेक शेतकऱ्यांचे तर दिवाळे निघाले. तर वाईन उद्योजक भव्य-दिव्य स्वप्नांच्या नशेतून शुद्धीवर आले, तेव्हा आपण देशोधडीला लागल्याची त्यांना जाणीव झाली.वाईन दारू नव्हे अन्न, लघु उद्योजकाचा दर्जा, उत्पादन शुल्क १०० टक्क्यांहून २५ टक्के, ५ हजार रुपयात वाईन विक्रीचा परवाना, बिअर बारच्या धर्तीवर विक्री परवाना, परवाना मिळवण्याची सोपी पद्धत, नाममात्र दराने भूखंड, वाईन इन्स्टिट्यूटची स्थापना, वाईन निर्मितीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, प्रयोगशाळा, द्राक्षप्रक्रिया उद्योगाकरिता बोर्डाची स्थापना, कर्ज सवलती, एक खिडकी योजना आदी सोयी सवलतींना भुलून येथील उद्योजक आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी या वाईन निर्मिती क्षेत्रात आले. परंतु केवळ दोन वर्षात त्यांच्या लक्षात आले की, या भूलभुलैय्यात आपण पूर्ण फसलो आहोत. पलूस तालुक्याच्या उद्योजकतेच्या वैभवाला मोठा फटका वाईन पार्कमुळे लागला.सध्या जागतिक मंदीचा थेट फटका लघुउद्योजकांना बसू लागला आहे. अशावेळी या बंद असलेल्या वाईन पार्कमधील प्लॉट लघु उद्योजकांना मिळावेत, यासाठी गेल्या १० वर्षात कोणी प्रयत्न केले नाहीत. नुकतेच या सांडगेवाडी वाईन पार्कमधील इतर उद्योगासाठी असलेले निर्बंध हटविण्यात आल्याचे माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले आहे. तर माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी असा कोणता निर्णय झाला नसल्याची माहिती दिली आहे. या दोघांच्या वक्तव्यामुळे परिसरातील उद्योजक मात्र संभ्रमात आहेत. वसाहत ओसाड : स्वप्नांचाही चक्काचूरसांडगेवाडी गावाजवळच कृष्णा वाईन पार्कची उभारणी झाल्याने येथे भव्य दिव्य रस्ते, मुबलक पाणी, वीज पुरवठा केंद्र, पथदिवे, भव्य मदर प्लांट, अद्ययावत यंत्रसामग्री, वाईन द्राक्ष वाणांची नर्सरी हे वैभव वाढले. येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि येथील परिसराचे भाग्य उजडेल, अशी आशा बाळगणाऱ्या लोकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. आज गेल्या १० वर्षांपासून पडून असलेल्या कृष्णा वाईन पार्क अक्षरश: ओसाड झाला आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. वाईन द्राक्षबागांचे क्षेत्रसुद्धा संपुष्टात आले आहे.गट-तट बाजूला ठेवून औद्योगिक निर्बंध हटविणे गरजेचेपरिसरातील अनेक उद्योग बंद पडत असताना, तसेच कामगार आर्थिक संकटात सापडले असताना गेली अनेक वर्षे बंद असलेल्या कृष्णा वाईन पार्कवर असणारे सर्व निर्बंध उठवून उद्योजकांना इतर उद्योग सुरू करण्यासाठी पक्ष, गट तट बाजूला ठेवून प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.