शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

टोल रद्दचे आश्वासन आता पाळणार का?

By admin | Updated: November 5, 2014 23:44 IST

जयंत पाटील : नव्या सरकारपुढे आव्हाने

इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने एलबीटी आणि टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. ते आव्हान त्यांना पेलावे लागेल. नवीन मुख्यमंत्री अभ्यासू अन् उत्साही आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टोकाचे आरोप केले. मात्र राज्य कारभार करताना काय अडचणी येतात, याची जाणीव त्यांना लवकरच येईल. स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा दिला आहे. विधानसभेत १0 तारखेला कोण कुठे बसेल हे स्पष्ट होईल, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी केले.शहरातील रस्ते विकास प्रकल्पाच्या कामाची सुरुवात करताना शिराळा नाका येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे अध्यक्षस्थानी होते. यल्लम्मा चौक, आष्टा नाका व शिराळा नाका येथे रस्ते विकास कामाचे उद्घाटन झाले. शहरातील रस्त्यांसाठी अडीच कोटीचा निधी मिळाला आहे. हा निधी मिळविण्यासाठी अथक् परिश्रम घेतल्याबद्दल मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.आमदार जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीत शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे व टिकाऊ पध्दतीने करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या परिपूर्तीसाठी प्रयत्न म्हणून रस्ते विकासाची कामे सुरु होत आहेत. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेशा सुविधा देण्याचाही प्रयत्न आहे. त्यामुळे शहरासह वाळवा तालुक्याला राज्यातील सर्व सुविधांनीयुक्त अग्रेसर परिसर बनवू. रस्त्यांच्या दर्जाबाबत स्थानिक सत्ताधाऱ्यांनी दक्ष रहावे.माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी, उद्यानाचे शहर म्हणून नवीन ओळख धारण करणाऱ्या इस्लामपूरमधील रस्ते उत्तम दर्जाचे असायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांनी एवढा निधी देऊन ठेवला आहे की, पाच वर्षे तो संपणार नाही. यावेळी शहाजी पाटील, खंडेराव जाधव, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, सौ. अरुणादेवी पाटील, विलास भिंगार्डे यांची भाषणे झाली.माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे यांनी प्रास्ताविक, बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेविका सौ. कविता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास पालिकेतील पदाधिकाऱ्यांसह, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)रस्त्यांसाठी अडीच कोटींचा निधीइस्लामपूर शहरातील रस्त्यांसाठी अडीच कोटींचा निधी मिळाला आहे. यातूनच रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते यल्लम्मा चौक, आष्टा नाका व शिराळा नाका येथे रस्ते विकास कामाचे उद्घाटन झाले. हा निधी मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले की, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाच्या पूर्तीचा एक भाग म्हणून रस्ते कामास प्रारंभ होत आहे.