शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

टोल रद्दचे आश्वासन आता पाळणार का?

By admin | Updated: November 5, 2014 23:44 IST

जयंत पाटील : नव्या सरकारपुढे आव्हाने

इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने एलबीटी आणि टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. ते आव्हान त्यांना पेलावे लागेल. नवीन मुख्यमंत्री अभ्यासू अन् उत्साही आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टोकाचे आरोप केले. मात्र राज्य कारभार करताना काय अडचणी येतात, याची जाणीव त्यांना लवकरच येईल. स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा दिला आहे. विधानसभेत १0 तारखेला कोण कुठे बसेल हे स्पष्ट होईल, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी केले.शहरातील रस्ते विकास प्रकल्पाच्या कामाची सुरुवात करताना शिराळा नाका येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे अध्यक्षस्थानी होते. यल्लम्मा चौक, आष्टा नाका व शिराळा नाका येथे रस्ते विकास कामाचे उद्घाटन झाले. शहरातील रस्त्यांसाठी अडीच कोटीचा निधी मिळाला आहे. हा निधी मिळविण्यासाठी अथक् परिश्रम घेतल्याबद्दल मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.आमदार जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीत शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे व टिकाऊ पध्दतीने करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या परिपूर्तीसाठी प्रयत्न म्हणून रस्ते विकासाची कामे सुरु होत आहेत. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेशा सुविधा देण्याचाही प्रयत्न आहे. त्यामुळे शहरासह वाळवा तालुक्याला राज्यातील सर्व सुविधांनीयुक्त अग्रेसर परिसर बनवू. रस्त्यांच्या दर्जाबाबत स्थानिक सत्ताधाऱ्यांनी दक्ष रहावे.माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी, उद्यानाचे शहर म्हणून नवीन ओळख धारण करणाऱ्या इस्लामपूरमधील रस्ते उत्तम दर्जाचे असायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांनी एवढा निधी देऊन ठेवला आहे की, पाच वर्षे तो संपणार नाही. यावेळी शहाजी पाटील, खंडेराव जाधव, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, सौ. अरुणादेवी पाटील, विलास भिंगार्डे यांची भाषणे झाली.माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे यांनी प्रास्ताविक, बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेविका सौ. कविता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास पालिकेतील पदाधिकाऱ्यांसह, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)रस्त्यांसाठी अडीच कोटींचा निधीइस्लामपूर शहरातील रस्त्यांसाठी अडीच कोटींचा निधी मिळाला आहे. यातूनच रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते यल्लम्मा चौक, आष्टा नाका व शिराळा नाका येथे रस्ते विकास कामाचे उद्घाटन झाले. हा निधी मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले की, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाच्या पूर्तीचा एक भाग म्हणून रस्ते कामास प्रारंभ होत आहे.