शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 06:42 IST

साताऱ्याच्या क्रांतिभूमीत साहित्याचा सन्मान

बाबासाहेब परीट

बिळाशी (जि. सांगली) :  सातारा ही राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, थोरले शाहू महाराज, प्रतापसिंह महाराज यांची ही भूमी आहे. अशा या क्रांतिभूमीत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा आणि सन्मानाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

प्रश्न : आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आणि बालपण?

मी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावचा. माझे आजोळ शिराळा तालुक्यातील बिळाशी. वडील शेतकरी कामगार पक्षाचे डाव्या विचारसरणीचे नेते होते. संयुक्त महाराष्ट्र आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता. वारणा खोऱ्यात, अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीने अजरामर झालेल्या भूमीत माझे बालपण गेले.

प्रश्न : लेखनाची सुरुवात कुठे आणि कशी झाली?

१९७५ मध्ये पुण्यातील वासंतिक कथा स्पर्धेत माझ्या ‘कायदा’ कथेला तिसरा क्रमांक मिळाला. त्याचे परीक्षक श्री. द. जोशी होते. त्याच वेळी ‘आंबी’ ही कादंबरी नवलेखक अनुदानातून प्रकाशित झाली. कोकरूड (ता. शिराळा) येथील यशवंत विद्यालयात अकरावीत असताना साहित्याची गोडी लागली. वारणेच्या मुशीतच माझ्या लेखनाचा पाया रचला गेला.

प्रश्न : शिक्षण आणि साहित्याची जडणघडण?

प्राथमिक शिक्षण नेर्लेत, तर नववीसाठी पाचगणीच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये गेलो. तिथे एका वर्षात २३४ पुस्तके वाचली. अकरावी-बारावी कोकरूडला, तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये झाले. बिळाशीच्या भैरवनाथ नाट्य मंडळाच्या ऐतिहासिक नाटकांनी माझ्या साहित्यिक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. तिथल्या ‘जाग मराठ्या जाग’, ‘देशद्रोही’ यांसारख्या नाटकांनी शिवाजी-संभाजींचे विचार मनात रुजवले.

प्रश्न : लोकनाट्याचा लेखनावर प्रभाव?

गावोगावच्या जत्रांमधील विठाबाई भाऊ मांग, दत्ता महाडिक यांच्या तमाशातील  वगनाट्यांना साहित्यिक मूल्य होते. ऐतिहासिक-सामाजिक विषय, पारंपरिक गाणी यांनी माझ्या लेखनाला समृद्ध केले.

प्रश्न : साहित्य अकादमी पुरस्कार आणि अध्यक्षपदाचा सन्मान?

वयाच्या ३२व्या वर्षी ‘झाडाझडती’साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, ही भारतातील क्वचित घटना. साताऱ्यातील धरणग्रस्तांच्या दुःखातून ती कादंबरी आकारली. लेखन हा माझ्या श्वासाचा भाग आहे. नुकतीच ‘ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी प्रकाशित झाली आणि शिवरायांवरील ‘आसमान भरारी’ लवकर येत आहे.

प्रश्न : साहित्य संमेलनातून मराठीसाठी काय करणार?

तरुण पिढी मोबाइलच्या आहारी गेली आहे. त्यांना पुस्तकांच्या विश्वात आणण्यासाठी गावोगावी वाचन चळवळ समृद्ध करणार. मराठी साहित्याचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे.

प्रश्न : महाविद्यालयीन शिक्षण आणि लेखनाची जडणघडण पुढे कशी झाली?

माझ्या महाविद्यालयीन शिक्षणात न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे बी. यू. पवार, प्राचार्य कणबरकर आणि शिवाजी विद्यापीठात इंग्रजी विभागप्रमुख कन्नड लेखक शांतिनाथ देसाई यांच्यासह बॅ. पी. जी. पाटील, ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर, शंकर सारडा यांचे मार्गदर्शन मिळाले. स्त्री जीवनावरची आंबी कादंबरी, त्यानंतर क्रांतिसूर्य ही नाना पाटील यांच्या जीवनावरील कादंबरी, कलाल चौक कथासंग्रह, १९८८ मध्ये पानिपत, १९८९ मध्ये पांगिरा आणि ९० मध्ये झाडाझडती आली.