शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

विधानसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे धाडस करणार नाही - विश्वजीत कदम

By अशोक डोंबाळे | Updated: June 15, 2024 16:11 IST

विधानसभा निवडणुकीला जिल्ह्यात काँग्रेस चार ते पाच जागा लढवणार असून, लोकांच्या जोरावर त्या निवडून आणणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सांगली : मी आणि विशाल पाटील यांनी धाडसाने लोकसभा निवडणूक लढविली; पण आमच्या या मार्गात बाहेरून खडे टाकणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. ते आता विधानसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे धाडस करणार नाहीत, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी दिला; तसेच विधानसभा निवडणुकीला जिल्ह्यात काँग्रेस चार ते पाच जागा लढवणार असून, लोकांच्या जोरावर त्या निवडून आणणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सांगली लोकसभेचे नूतन खासदार विशाल पाटील यांचा सत्कार मदनभाऊ युवा मंचतर्फे शुक्रवारी करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कदम बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते डॉ. जितेश कदम, डॉ. मोनिका कदम, माजी महापौर किशोर जामदार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, सुरेश आवटी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, संजय मेंढे यांच्यासह मदनभाऊ युवा मंचचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाने जिल्ह्याचे आणि काँग्रेसचेही मोठे नुकसान झाले. म्हणूनच गटबाजी बाजूला ठेवून काँग्रेसच्या सर्व नेत्यांना एकत्रित केले. जुना कटुपणा बाजूला ठेवून एकत्र आलो आहोत. आता एकसंधपणे, एकदिलाने समाजकारण, राजकारण करायचे आहे. जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करायची आहे. जिल्ह्यातील काँग्रेसची मूठ बांधलेले काहींना बघवले नाही; पण त्याची आम्हाला तमा नाही. ज्यांनी मार्गात बाहेरून खडे टाकले, त्यांना लोकसभेला जागा दाखवून दिली आहे. आता ते विधानसभेला धाडस करणार नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काहींनी भाषणे, वक्तव्ये केली. त्याला चोख उत्तर द्यायचे आहेत. अंतर्गत प्रश्न आम्ही सोडवू, पुढची पावले कशी टाकायची हे ठरवू. आता बांधलेली एकीची मूठ सोडायची नाही. वसंतदादा, मदनभाऊ, डॉ. पतंगराव कदम यांच्या विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांना चांगली संधी मिळवून दिली जाईल. सांगलीतून लोकसभेला एक खासदार दिल्लीला पाठवला. आता सांगलीतून विधिमंडळात दोन आमदार पाठवू. ती जबाबदारी माझी असेल; मात्र विनाकारण वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कोणाकडून होऊ नये.

राज्यातील १५८ मतदारसंघांत आघाडी

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. लोकसभेचा निवडणूक निकाल पाहता विधानसभेच्या २८८ पैकी १५८ मतदारसंघांत महाविकास आघाडी आघाडीवर आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात येणारे सरकार हे सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे असणार आहे, असा विश्वासही डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.

माझ्यावर अन्याय तरीही पक्षाशी एकनिष्ठ

खासदार विशाल पाटील म्हणाले, लोकसभेचा विजय सर्व कार्यकर्त्यांचा आहे. काँग्रेस विचाराचा खासदार सर्वांनी निवडून दिला. गेली दोन-तीन वर्षे काँग्रेस एक कुटुंब म्हणून सर्वांना एकत्र करण्याचे काम डॉ. विश्वजित कदम यांनी केले. जात, धर्म न पाहता वसंतदादा, पतंगराव कदम यांच्या विचारांचे सर्व कार्यकर्ते एकत्र आले. त्यामुळेच हा विजय सुकर झाला. माझ्यावर अन्याय झाला; पण मी काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलो.

जनतेसाठी अहोरात्र काम करणार : विशाल पाटील

विशाल पाटील म्हणाले, मला कष्ट, काम करावे लागेल. विमानतळाचा मुद्दा, पाणी प्रश्न, मराठा आणि धनगर आरक्षण प्रभावीपणे मांडणार आहे. जी व्यक्ती अपक्ष का असेना, मला खासदार करू शकते, ती राज्याचे नेतृत्व करू शकते. जनतेने मला खासदार म्हणून निवडून दिले. आता जनतेला पाहिजे तसे काम करण्यासाठी मी अहोरात्र काम करणार आहे.

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमvishal patilविशाल पाटीलSangliसांगली