शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाठाळ नद्यांना भिंतीने वेसण बसेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST

फोटो २८०८२०२१ संतोष ०२ : डॉ. महेश गोगटे इंट्रो ... अमेरिकेत होंडुरासमध्ये १९९६ मध्ये ४८४ मीटर लांबीचा पूल होलुटेक ...

फोटो २८०८२०२१ संतोष ०२ : डॉ. महेश गोगटे

इंट्रो ...

अमेरिकेत होंडुरासमध्ये १९९६ मध्ये ४८४ मीटर लांबीचा पूल होलुटेक नदीवर बांधला गेला. १९९८च्या ऑक्टोबरमध्ये तुफानी पावसाने दे माय धरणी ठाय अवस्था केली. चार दिवसांत तब्बल ७५ इंच पाऊस झाला. प्रचंड महापुरानंतरही पूल मात्र सुरक्षित राहिला. धक्कादायक बाब ही होती की, नदीने संपूर्ण प्रवाहाचा मार्गच बदलला. पुलाच्या बाजूने ती वाहू लागली. पश्चिम महाराष्ट्र्रातील महापुरानंतर नद्यांना भिंती बांधण्याची चर्चा जोरात सुरू आहे. नद्यांच्या नाठाळपणाला अशी वेसण बसेल? होलुटेक नदीवरील पुलाचे उदाहरण केस स्टडी म्हणून अशा वेळी डोळ्यांसमोर ठेवायला हवे. शहरी पर्यावरण आणि वाराणशीमधील जलसंसाधने या विषयावर पीएच.डी. केलेले जपानच्या क्योतो विद्यापीठातील संशोधक डॉ. महेश गोगटे यांनी केलेले हे विवेचन.

गेल्या दोन-अडीचशे वर्षांत पुराकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला आहे. ब्रिटिशांपूर्वी नद्या, उपनद्या, तलाव, नाले, ओहोळ, ओढे पुष्करणी, कुंड हे शहरांचे अविभाज्य भाग होते. गावे आर्द्र असायची. नद्या सातत्याने पात्र बदलतात याची जाणिव जनमानसात होती. शेतीची सुपीकता टिकविण्यासाठी पूर आवश्यकच आहे, ही नदी साक्षरताही होती. ब्रिटिशांनी जमीन आणि पाण्याला विभागणाऱ्या रेषांची आखणी केली. अधिक महसुलासाठी अधिक प्रदेश सत्तेखाली हवा होता, त्यासाठी शुष्क भूभाग आवश्यक होता. महापुरात सैन्याची गती मंदावते, रोगराई फैलावते. त्यामुळे नदीशेजारचा परिसर कोरडा ठेवण्यासाठी प्रयोग सुरू झाले. इंग्लंडमधील नद्यांवरील प्रयोग भारतातही झाले. नदी, नाले, तलावातील पाण्यापेक्षा नळाचे पाणी अधिक शुद्ध ही संकल्पना लोकांच्या गळी उतरविण्यात आली. मोजकेच नैसर्गिक स्रोत शिल्लक ठेवून इतर बुजविले जाऊ लागले. रस्ते, उद्यानांसाठी जागा उपलब्ध केली गेली. पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकाच नलिकेतून नेण्यासारखे प्रयोग स्थानिकांचा विरोध डावलून राबविण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळातही हे प्रयोग थांबलेले नाहीत. त्याचा परिणाम पूरहानी वाढण्यात होत आहे.

जपानमध्ये वर्षभर कमी-अधिक पाऊस असतो. जपानी माणसाची वाटचाल पूर आणि पावसासोबतच सुरू असते. पण, त्यांनी ब्रिटिशांसारखे तंत्रज्ञान चालविले नाही. तलाव, कुंड, बुजविले, पण त्यावर बांधकामे उभी केली नाहीत. टोकीयो, ओसाका भागात जमिनीखाली नव्याने तलाव निर्माण केले. महापुराचे पाणी त्यात जाण्यासाठी मोठ्या बोगदेवजा गटारी बांधल्या. पुराचे पाणी शक्य तितक्या उशिरा पात्राबाहेर पडण्यासाठी व्यवस्था केल्या. काही ठिकाणी नद्यांना मुद्दाम उतार निर्माण केले. आता पूर येतात, पण जीवितहानी होत नाही. वित्तहानीही मर्यादित प्रमाणात होते. रेड, ब्ल्, व्हाईट रेषांच्या नियमांचे कठोर पालन केले जाते. १९६४ च्या ऑलम्पिकने जपानला धडा दिला. नद्यांच्या स्वच्छतेचे महत्त्व शिकविले. या ऑगस्टमध्ये जपानमध्येही प्रचंड पाऊस झाला. पश्चिमेकडील हिरोशिमा, नागासकी भागात मोठे पूर आले. क्युशू प्रांतातही प्रचंड पाऊस झाला. पण, नुकसान तुलनेने अत्यंत कमी झाले. जपानसाठी महापूर, चक्रीवादळे नवी नाहीत; पण त्यासोबत जगण्याचा पॅटर्न जपान्यांनी विकसित केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पूरनियंत्रणासाठी नदीकाठी भिंती बांधण्याचे नियोजन सुरू असले तरी हा प्रयोग कितपत व्यवहार्य ठरेल याचा अभ्यास आवश्यक आहे. परदेशात पॅरिससारख्या काही ठिकाणी भिंती बांधल्या आहेत, पण तेथील नद्यांची तुलना कृष्णा, कोयना, पंचगंगेसोबत होऊ शकत नाही. थोडे मोठे कालवे असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. काही देशांत पूरकाळात नदीकडेला तात्पुरते स्ट्रक्चर उभे केले जातात. पूर संपल्यानंतर काढून घेतले जातात. नदीकाठी भिंत बांधली तर शहरातील सांडपाणी कसे जाणार यावरही विचार आवश्यक आहे. नद्यांना भिंती बांधण्याची संकल्पना जुनीच आहे. अमेरिका, चीनमध्ये तसे प्रयोगही झालेत; पण नंतर त्याचे दुष्परिणामही समोर आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात असा प्रयोग करण्यापूर्वी छोट्या मॉडेलद्वारे अभ्यास आवश्यक आहे.

नदीच्या नाठाळपणाला वेसण घालण्याचे मानवी प्रयत्न नदीच कुचकामी ठरवते. यासाठी मध्य अमेरिकेतील होंडुरासमधील नदीचे उदाहरण सातत्याने दिले जाते. तेथे जपानी कंपनीच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होलुटेक नदीवर ४८४ मीटर लांबीचा भक्कम पूल १९९६ मध्ये बांधला. १९९८ च्या ऑक्टोबरमध्ये सलग चार दिवस तब्बल ७५ इंच पाऊस झाला. सहा महिन्यांचा पाऊस चार दिवसांत पडला. होंडुरासमधील सर्रास पुलांची वाताहात झाली. हा एकमेव पूल पाय रोवून उभा राहिला. त्याला जोडणारे रस्ते वाहून गेले, पुलाला कोणताही धक्का बसला नाही. तो सुरक्षितच राहिला; पण धक्कादायक बाब अशी की, नदीने आपला मार्ग पूर्णत: बदलला. प्रचंड खर्चाचा पूल निरुपयोगी ठरला. नदी आपला मार्ग बदलू शकते याचा विचार डिझाईन आणि प्लॅनिंग विभागाने केलाच नव्हता! आपल्याकडे नदीवर भिंत बांधताना ही ‘केस स्टडी’ डोळ्यांसमोर ठेवायला हवी.

-----------

- डॉ. महेश गोगटे

( लेखक जपानस्थित क्योतो विद्यापीठात संशोधक आहेत. शहरी पर्यावरण आणि वाराणशीतील कुंड, तलाव, पुष्कणी या विषयावर पीएच.डी. केली आहे. वाराणशीतील त्यांचा अभ्यास अजूनही सुरूच आहे.)

(शब्दांकन : संतोष भिसे)