शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

ऐन उन्हाळ्यात ‘जयंत नक्षत्र’ बरसणार? राष्ट्रवादीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:26 IST

इस्लामपूर : राज्यातील राजकीय तापमान कमालीचे वाढले असताना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आ. जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

ठळक मुद्देभाजपची गरम हवा थंड करण्याच्या हालचाली गतिमान

अशोक पाटील ।इस्लामपूर : राज्यातील राजकीय तापमान कमालीचे वाढले असताना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आ. जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील भाजपची हवा थंड करण्यासाठी हे ‘जयंत नक्षत्र’ बरसेल का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील यांनी मंत्री असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा ओढा राष्ट्रवादीकडे वाढला होता. मोदी लाटेत मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या अनेकांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपला जवळ केले. त्यानंतर जिल्ह्यातील सत्ताकेंद्रे आ. पाटील यांच्या हातून निसटू लागली. मात्र त्यावेळी आ. पाटील यांनीच आपली फौज भाजपमध्ये धाडली, असे आरोप होऊ लागले.

भाजपने आ. पाटील यांना लॉटरी घोटाळ्यात अडकवून राष्ट्रवादी नेस्तनाबूत करण्याचा डाव आखला. परंतु राष्ट्रवादीवरील संकट टळले. मात्र सांगली जिल्हा परिषद आणि इस्लामपूर नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांवरील जयंत पाटील यांची पकड ढिली करण्यात भाजप यशस्वी झाली. आ. पाटील यांच्या होमपीचवरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना घेऊन फटकेबाजी करण्यास सुरुवात केली.यातून पुन्हा उभारी येण्यासाठी हल्लाबोलची कल्पना राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. यामध्ये गटनेते असलेल्या आ. जयंत पाटील यांची कामगिरी राज्याच्या कानाकोपºयात पोहोचली. आता तर पक्षसंघटनेची जबाबदारी आ. पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.

राज्यातील राष्ट्रवादीची सूत्रे इस्लामपूरकडे आली असली तरी, निर्णय मात्र बारामतीतूनच होणार आहेत, तर इस्लामपुरात भाजपचे निर्णय सदाभाऊ खोत यांच्याकरवी होत आहेत. जिल्ह्यात आणि इस्लामपुरात जयंत पाटील यांच्या माघारी निर्णय घेणारा सक्षम नेता राष्टवादीत आजही तयार झालेला नाही. त्यामुळे भाजपची हवा भरीव होत चालली आहे. त्यातून आगामी महापालिका निवडणुकीबाबत आ. पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता त्यांच्यावर राष्ट्रवादीची राज्याची धुरा आल्याने त्यांना प्रत्येक निर्णय घेताना ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील भाजपची हवा थंड करण्यासाठी हे ‘जयंत नक्षत्र’ कसे बरसेल, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.स्वागताच्या कमानीजयंत पाटील यांच्या समर्थकांनी इस्लामपूर शहरातील प्रत्येक रस्त्यावर आ. पाटील यांच्या स्वागताच्या कमानी उभ्या केल्या आहेत. आघाडी सरकारमध्ये असताना त्यांना अनेक मंत्रीपदे मिळाली, त्यावेळी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचे स्वागत झाले नाही. परंतु प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतरचे स्वागत म्हणजे भाजपला शह देण्याची तयारी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण