शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

खंडपीठासाठी लोकप्रतिनिधींमार्फत पुन्हा पाठपुरावा करणार, सांगलीत वकील संघटनेची बैठक

By घनशाम नवाथे | Updated: July 10, 2024 21:15 IST

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सांगली वकील संघटनेने दिला आहे.

सांगली : कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी कृती समितीने आंदोलन सुरू असून सांगली वकील संघटनाही यामध्ये अग्रेसर राहील. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सांगली वकील संघटनेने दिला आहे.

वकील संघटनेचे अध्यक्ष किरण रजपूत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस उपाध्यक्ष ॲड. अमोल पाटील, ॲड. विशाल कुंभार, ॲड. प्रमोद सुतार, ॲड. दीपक हजारे, ॲड. रत्नेश जोशी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून खंडपीठ सुरू करावे, अशी विनंती केली जाईल. खंडपीठाच्या मागणीसाठी ज्येष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलनांची जिल्हाभर व्याप्ती वाढविण्याचे बैठकीत ठरले.

कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू करण्याच्या मागणीसाठी गेली ३८ वर्षे पाठपुरावा केला जात आहे. या आंदोलनाची शासनाने थोडी दखल घेतली आहे. खंडपीठाची स्थापना अंतिम टप्प्यात आली आहे. दि. ७ सप्टेंबर २०१५ रोजी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूर येथे खंडपीठ मंजूर करत असल्याचा अहवाल दिला होता. शासनानेदेखील कोल्हापूर येथे खंडपीठासाठी निर्णय घेतलेला आहे. तसेच या खंडपीठसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. कायदेशीर प्रक्रियेनुसार मुख्यमंत्री व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची संयुक्त बैठक आवश्यक आहे. त्यानंतर इतिवृत्त राज्यपालांकडे पाठविले जाते. राज्यपाल याबाबतचा आदेश काढतात. कृती समितीने मुख्यमंत्री यांची आठ वेळा भेट घेतली. परंतु मुख्यमंत्री यांच्याकडून पाठपुरावा होताना दिसत नाही.

खंडपीठासाठीच कोलदांडाइस्लामपूर व विटा येथे सत्र न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरु केले. संख येथे ग्रामन्यायालय सुरू झाले. सांगलीतील सुमारे ६० टक्के दावे व खटले वर्ग झाले आहेत. एकीकडे विकेंद्रीकरण होताना दुसरीकडे मुंबईला सर्वोच्च न्यायालयाचे व कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ करण्यात कोलदांडा घातला जात असल्याचा आरोप ॲड. अजित पाटील, ॲड. राजू लाले, ॲड. शैलेश पाटील, ॲड. माधव कुलकर्णी आदी सदस्यांनी केला

 

टॅग्स :SangliसांगलीCourtन्यायालय