शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी पुलाचा मुद्दा प्रतिष्ठेचा कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST

सांगली : सांगलीत कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला पर्याय म्हणून उभारण्यात येणाऱ्या समांतर पुलाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा बनला आहे. त्याऐवजी ...

सांगली : सांगलीत कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला पर्याय म्हणून उभारण्यात येणाऱ्या समांतर पुलाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा बनला आहे. त्याऐवजी शहराची गरज, भविष्यातील बाजारपेठ आणि वाहतुकीचे नियोजन, दळणवळणाचा प्राधान्यक्रम आणि व्यवहार्य मार्गाची सांगड घातल्यास हा प्रश्न सुटू शकतो. मात्र गरज आहे, केवळ राजकीय इच्छाशक्तीची!

आयर्विन पुलाचा पर्यायी पूल आता काहींनी प्रतिष्ठेचा प्रश्न बनविला आहे. या पुलाची मंजुरी आणणारे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दररोज वाक्‌युद्ध सुरू आहे. आ. गाडगीळ यांच्या गटाच्या म्हणण्यानुसार समांतर पूल झालाच पाहिजे आणि ‘आयर्विन’पासून ४७ मीटरवरील या पुलाला कापडपेठेचा जोडरस्ता द्यायचा नसेल, तर पुलाच्या मार्गावरील पांजरपोळवरून येणारी वाहतूक उजवीकडे टिळक चौकाकडे वळवून हरभट रस्त्यावरून आणि डावीकडे गणपती मंदिराकडे वळवून गणपती पेठेतून न्यावी. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि व्यापारी याविरोधात आहेत. या पुलावरून येणारी वाहतूक नव्वद अंशामध्ये वळवणे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरणार नसल्याने ती सरळ पुढे कापडपेठेतून न्यावी लागणार असल्याची भीती ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे कापडपेठेतील रस्ता रूंद करावा लागेल, त्यात व्यापाऱ्यांची दुकाने जातील, असा त्यांचा दावा आहे. महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी रस्त्याच्या रूंदीकरणाची हमी दिल्यानेच सार्वजिनक बांधकाम विभागाने या आराखड्यास मंजुरी दिल्याचे समोर आले आहे. यातील धोका दिसू लागल्यानेच या आराखड्यास विरोध सुरू आहे.

चौकट

वाहतुकीच्या कोंडीत भर कशाला?

गणपती पेठेत सकाळी नऊपासून रात्री आठपर्यंत मालवाहू वाहनांची गर्दी असते. यावेळेत वाहतुकीची कोंडी ठरलेलीच. त्यामुळे तिकडून वाहतूक वळवणे सोयीस्कर ठरणार नाही. पुलावरून येणारी वाहने उजवीकडे टिळक चौकाकडे नव्वद अंशात वळवणेही तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. अवजड वाहतूक बायपासमार्गे गेली, तरी पांजरपोळमार्गे येणाऱ्या पर्यायी पुलावरील बसेस आणि मालवाहतुकीचे टेम्पो-रिक्षा वळवणे जिकिरीचे ठरेल.

चौकट

पर्यायी पुलावरील वाहतूक बायपासमार्गे

सांगली शहराचा विस्तार आता पूर्वेकडे आणि दक्षिणोत्तर वेगाने होत आहे. त्यामुळे बाजारपेठेचेही विकेंद्रीकरण अनिवार्य ठरते. पश्चिमेकडे वाढण्यासाठी वाव नाही. त्यामुळे शहरात येणारी आणि शहराबाहेर जाणारी वाहतूक त्याच दिशांनी विभागली जाणे क्रमप्राप्त ठरते. ती पश्चिमेकडून येऊन बाजारपेठेतील कोंडीला कारणीभूत ठरू नये, यासाठी सध्याच्या बायपासचे रूंदीकरण होऊन त्याचा वापर वाढला पाहिजे. त्यामुळे ‘आयर्विन’च्या पर्यायी पुलाकडे येणाऱ्या अवजड वाहनांसह अधिकाधिक वाहतूक तिकडे वळवता येईल.

चौकट

नव्या रिंगरोडमुळे पर्यायी पुलाची गरज कमी

विकास आराखड्यानुसार सांगलीला रिंगरोड मंजूर झाला आहे. सांगलीवाडीच्या टोलनाक्यापासून हरिपूरच्या लिंगायत स्मशानभूमीपर्यंत कृष्णेवर नवा पूल होत आहे. त्याला जोडणारा मार्ग कोल्हापूर रस्ता-शंभरफुटी रस्त्यापर्यंत येणार आहे. हा नवा रिंगरोड असेल. बसस्थानक परिसर, शहराचा दक्षिण भाग आणि कोल्हापूर-मिरजेकडून येऊन सांगलीच्या पश्चिमेकडे जाणारी-येणारी वाहने त्या मार्गाने जातील. त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहतुकीवरील ताण कमी होईल. पर्यायाने ‘आयर्विन’च्या पर्यायी पुलाची गरज कमी होईल.

चौकट

दहा मीटरवर होणारा पूलच योग्य

सांगलीवाडी आणि पश्चिम भागातून येणारी दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सध्या तरी ‘आयर्विन’पासून दहा मीटरवर होणारा पूलच योग्य ठरतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या मूळ आराखड्यानुसार तो थेट टिळक चौकात येईल. त्यामुळे व्यापारी पेठेवरील गंडांतर टळेल. भूसंपादन, रस्ता रूंदीकरण आणि सांगलीवाडीच्या मैदानाचे नुकसानही टाळता येईल. यासाठी पुलाचा प्रश्न प्रतिष्ठेचा करणाऱ्यांनी दोन पावले मागे येण्याची गरज आहे.

चौकट

आठवडाभरात बैठक

पुलाच्या प्रश्नामध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांनी लक्ष घातले आहे. विकास आराखड्यानुसार होणारा रिंगरोड त्यांनीच मंजूर करून आणला आहे. आता पर्यायी पुलाचे त्रांगडे सोडविण्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा केली आहे. आठवडाभरात आ. सुधीर गाडगीळ यांच्याशीही बोलून मार्ग काढण्यासाठी हालचाली सुरू आहेत.