शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

जयंतरावांनी दर का दिला नाही?

By admin | Updated: March 31, 2015 00:27 IST

राजू शेट्टी : स्वत:ला ‘शेतकऱ्यांचे तारणहार’ समजणारे दर देण्यात मागे का?

इस्लामपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २५00 ते २६00 रुपये पहिली उचल दिली आहे. शिराळ्याच्या डोंगरी भागात असलेल्या निनाईदेवी कारखान्याचे चालक दालमिया यांनीही २५00 रुपये दर दिला आहे, तर शेतकऱ्यांचे तारणहार असणारे राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी मात्र २0५0 रुपये पहिली उचल दिली, तीही दोन हप्त्यात! तीन हजार रुपये देऊ, असे म्हणणारे जयंत पाटील आता का दर देऊ शकत नाहीत? असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना आज (सोमवारी) उपस्थित केला.जयंत पाटील यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आभार दौऱ्यामध्ये खा. शेट्टी यांच्यावर सडकून टीका सुरू केली आहे. त्या टीकेने अस्वस्थ झालेल्या खा. शेट्टी यांनी आज ‘लोकमत’शी संपर्क साधून जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उसामध्ये असा काय फरक आहे, म्हणून दोन्ही जिल्ह्यातील उसाच्या दरामध्ये तब्बल ५00 रुपयांची तफावत केली जात आहे? विधानसभा निवडणुकीत जो प्रचंड पैसा खर्च केला आहे, त्याची वसुली ऊस उत्पादकांकडून केली जात आहे का? की, बारामती येथे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी मेजवानी दिली, त्याच्या वर्गणीची वसुली केली जात आहे? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.शेट्टी म्हणाले की, जयंत पाटील उसाचा दर देण्यात मागे पडले आहेत. एक तर त्यांचा कारखाना प्रचंड कर्जबाजारी झाला असावा, नाही तर व्याजाचा आर्थिक बोजा पडला असावा. त्यामुळेच त्यांच्या कारखान्याने एफआरपीनुसार निर्धारित केलेला दर देण्यास असमर्थता दर्शवली आहे. शेतकऱ्यांना तीन हजार रुपये दर देण्याची भाषा करणाऱ्या जयंत पाटील यांच्या कारखान्याने कमी दर देऊन विधानसभा निवडणुकीत झालेला, तसेच पंतप्रधानांच्या बारामतीमधील मेजवानीचा खर्च काढल्यामुळे, त्यांच्या दराचा मेळ बसत नसावा. जयंत पाटील यांनी कमी दर का दिला याचा जाहीर खुलासा करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)जयंत पाटील यांची सडकून टीकामाजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांचा सध्या मतदारसंघात आभार दौरा सुरू आहे. मेळाव्यात शेट्टी यांच्या भूमिकेबाबत जयंत पाटील सडकून टीका करीत आहेत. खासदार म्हणून राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केले? आज साखर उद्योग अडचणीत असताना शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते मंत्रीपदाची वाट पाहात आहेत. सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना केंद्राकडून साखर अनुदानासाठी प्रयत्न करता आले असते, पण अद्याप मंत्रीपदाची आशा असल्याने ते केवळ आंदोलनाची भाषा करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप जयंत पाटील सातत्याने करीत आहेत.