शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

जयंतरावांनी दर का दिला नाही?

By admin | Updated: March 31, 2015 00:27 IST

राजू शेट्टी : स्वत:ला ‘शेतकऱ्यांचे तारणहार’ समजणारे दर देण्यात मागे का?

इस्लामपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २५00 ते २६00 रुपये पहिली उचल दिली आहे. शिराळ्याच्या डोंगरी भागात असलेल्या निनाईदेवी कारखान्याचे चालक दालमिया यांनीही २५00 रुपये दर दिला आहे, तर शेतकऱ्यांचे तारणहार असणारे राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी मात्र २0५0 रुपये पहिली उचल दिली, तीही दोन हप्त्यात! तीन हजार रुपये देऊ, असे म्हणणारे जयंत पाटील आता का दर देऊ शकत नाहीत? असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना आज (सोमवारी) उपस्थित केला.जयंत पाटील यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आभार दौऱ्यामध्ये खा. शेट्टी यांच्यावर सडकून टीका सुरू केली आहे. त्या टीकेने अस्वस्थ झालेल्या खा. शेट्टी यांनी आज ‘लोकमत’शी संपर्क साधून जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उसामध्ये असा काय फरक आहे, म्हणून दोन्ही जिल्ह्यातील उसाच्या दरामध्ये तब्बल ५00 रुपयांची तफावत केली जात आहे? विधानसभा निवडणुकीत जो प्रचंड पैसा खर्च केला आहे, त्याची वसुली ऊस उत्पादकांकडून केली जात आहे का? की, बारामती येथे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी मेजवानी दिली, त्याच्या वर्गणीची वसुली केली जात आहे? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.शेट्टी म्हणाले की, जयंत पाटील उसाचा दर देण्यात मागे पडले आहेत. एक तर त्यांचा कारखाना प्रचंड कर्जबाजारी झाला असावा, नाही तर व्याजाचा आर्थिक बोजा पडला असावा. त्यामुळेच त्यांच्या कारखान्याने एफआरपीनुसार निर्धारित केलेला दर देण्यास असमर्थता दर्शवली आहे. शेतकऱ्यांना तीन हजार रुपये दर देण्याची भाषा करणाऱ्या जयंत पाटील यांच्या कारखान्याने कमी दर देऊन विधानसभा निवडणुकीत झालेला, तसेच पंतप्रधानांच्या बारामतीमधील मेजवानीचा खर्च काढल्यामुळे, त्यांच्या दराचा मेळ बसत नसावा. जयंत पाटील यांनी कमी दर का दिला याचा जाहीर खुलासा करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)जयंत पाटील यांची सडकून टीकामाजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांचा सध्या मतदारसंघात आभार दौरा सुरू आहे. मेळाव्यात शेट्टी यांच्या भूमिकेबाबत जयंत पाटील सडकून टीका करीत आहेत. खासदार म्हणून राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केले? आज साखर उद्योग अडचणीत असताना शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते मंत्रीपदाची वाट पाहात आहेत. सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना केंद्राकडून साखर अनुदानासाठी प्रयत्न करता आले असते, पण अद्याप मंत्रीपदाची आशा असल्याने ते केवळ आंदोलनाची भाषा करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप जयंत पाटील सातत्याने करीत आहेत.