शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

जयंतरावांनी दर का दिला नाही?

By admin | Updated: March 31, 2015 00:27 IST

राजू शेट्टी : स्वत:ला ‘शेतकऱ्यांचे तारणहार’ समजणारे दर देण्यात मागे का?

इस्लामपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २५00 ते २६00 रुपये पहिली उचल दिली आहे. शिराळ्याच्या डोंगरी भागात असलेल्या निनाईदेवी कारखान्याचे चालक दालमिया यांनीही २५00 रुपये दर दिला आहे, तर शेतकऱ्यांचे तारणहार असणारे राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी मात्र २0५0 रुपये पहिली उचल दिली, तीही दोन हप्त्यात! तीन हजार रुपये देऊ, असे म्हणणारे जयंत पाटील आता का दर देऊ शकत नाहीत? असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना आज (सोमवारी) उपस्थित केला.जयंत पाटील यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आभार दौऱ्यामध्ये खा. शेट्टी यांच्यावर सडकून टीका सुरू केली आहे. त्या टीकेने अस्वस्थ झालेल्या खा. शेट्टी यांनी आज ‘लोकमत’शी संपर्क साधून जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उसामध्ये असा काय फरक आहे, म्हणून दोन्ही जिल्ह्यातील उसाच्या दरामध्ये तब्बल ५00 रुपयांची तफावत केली जात आहे? विधानसभा निवडणुकीत जो प्रचंड पैसा खर्च केला आहे, त्याची वसुली ऊस उत्पादकांकडून केली जात आहे का? की, बारामती येथे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी मेजवानी दिली, त्याच्या वर्गणीची वसुली केली जात आहे? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.शेट्टी म्हणाले की, जयंत पाटील उसाचा दर देण्यात मागे पडले आहेत. एक तर त्यांचा कारखाना प्रचंड कर्जबाजारी झाला असावा, नाही तर व्याजाचा आर्थिक बोजा पडला असावा. त्यामुळेच त्यांच्या कारखान्याने एफआरपीनुसार निर्धारित केलेला दर देण्यास असमर्थता दर्शवली आहे. शेतकऱ्यांना तीन हजार रुपये दर देण्याची भाषा करणाऱ्या जयंत पाटील यांच्या कारखान्याने कमी दर देऊन विधानसभा निवडणुकीत झालेला, तसेच पंतप्रधानांच्या बारामतीमधील मेजवानीचा खर्च काढल्यामुळे, त्यांच्या दराचा मेळ बसत नसावा. जयंत पाटील यांनी कमी दर का दिला याचा जाहीर खुलासा करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)जयंत पाटील यांची सडकून टीकामाजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांचा सध्या मतदारसंघात आभार दौरा सुरू आहे. मेळाव्यात शेट्टी यांच्या भूमिकेबाबत जयंत पाटील सडकून टीका करीत आहेत. खासदार म्हणून राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केले? आज साखर उद्योग अडचणीत असताना शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते मंत्रीपदाची वाट पाहात आहेत. सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना केंद्राकडून साखर अनुदानासाठी प्रयत्न करता आले असते, पण अद्याप मंत्रीपदाची आशा असल्याने ते केवळ आंदोलनाची भाषा करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप जयंत पाटील सातत्याने करीत आहेत.