शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पुरोगामी विचारांची धास्ती का वाटते?

By admin | Updated: February 25, 2015 00:02 IST

राजन गवस यांचा सवाल : वाळव्यात अरुण नायकवडी स्मृतिदिन कार्यक्रम

वाळवा : सध्या राज्यात काय चालले आहे व चालणार आहे हे समजू शकत नाही. कुणाच्या दारात केव्हा मारेकरी येतील हेसुध्दा सांगता येत नाही. येथील पुरोगामी विचारांची कुणाला आणि कशासाठी धास्ती वाटते?, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजन गवस यांनी केला.हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्यावतीने वाळवा येथील हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या पटांगणावर आज (मंगळवार) अरुण नायकवडी यांचा दहावा स्मृतिदिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वैभव नायकवडी होते. व्यासपीठावर कारखान्याचे माजी अध्यक्ष महादेव कांबळे, दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील, उपाध्यक्ष जयवंत अहिर, कारखाना उपाध्यक्षा सौ. वंदना माने, नीलावती माळी, बझारचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, महेश कराडकर, डॉ. शीतल भरमगुडे, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले उपस्थित होते.प्रा. गवस म्हणाले की, आज जीवनमूल्यांचा ऱ्हास झाला आहे. मात्र गरजांचा हैदोस वाढला आहे. केव्हा तरी उपयोगी पडणाऱ्या व उपद्रवी ठरणाऱ्यालाच सध्या सलाम केला जात आहे. त्यामुळे आदर्श धाकच संपला आहे. शेतकऱ्यांना जगविण्यासाठी माध्यम म्हणून वृत्तपत्रांनी आता यापुढे जबाबदारी घेऊन लेखन करावे.वैभव नायकवडी म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनंतर कॉ. गोविंदराव पानसरे यांची हत्या झाली. त्यांच्या मारेकऱ्यांना शासनाने शोधावे. त्यांचे विचार दाबण्याचे षड्यंत्र रचणाऱ्यांनाही उघडे करा, त्यांना कठोर शासन करा. पुरोगामी विचारवंतांना देह संपला तरी त्याचे विचार मात्र संपणार नाहीत, हे जातीयवादी प्रवृतींनी लक्षात घ्यावे. यावेळी अनुभूती अरुण नायकवडी म्हणाल्या की, क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी ही शिल्पातून निर्माण झालेली माणसे होत. अरुण हे स्वत:ला कामात झोकून देणारे व्यक्तिमत्त्व होते. आज ते असते, तर ‘हुतात्मा’च्या रथाची चाके आणखी वेगाने धावली असती.प्रारंभी अरुण नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजा माळगी, प्रा. के. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच गौरव नायकवडी, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, नजीर वलांडकर, हुतात्मा दूध संघाचे कार्यकारी संचालक एन. एम. मंडलिक, पोपट अहिर, संजय अहिर, अशोक माने, संजय खोत, नंदू पाटील, उपसरपंच सौ. अपर्णा साळुंखे हुतात्मा संकुलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)विचारांची लढाई विचारांनीच करावीयावेळी राजन गवस म्हणाले की, देशाला पुरोगामीत्वाचा विचार देणाऱ्या महाराष्ट्रात विचारवंतांच्या हत्या होत आहेत, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. प्रथम दाभोलकर, आता पानसरे यांची हत्या करणारे अजूनही मोकाटच आहेत. या विचारवंतांपासून कोणत्या प्रकारची भीती कोणाला होती हेच कळेनासे झाले आहे. एखाद्याला तुम्ही देहाने संपवाल, पण त्यांनी दिलेला विचार कधीही संपत नसतो. जगण्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या कोणाच्या तरी हाती जाणे, हे अराजकतेचे लक्षण आहे. विचारांची लढाई शस्त्रांऐवजी विचारानेच करण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.