शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

अख्ख्या गावाचा गहू आगीत खाक !

By admin | Updated: March 21, 2017 23:17 IST

आरल गावात निराशा : पंधरा लाखांचे नुकसान; ६१ शेतकऱ्यांना फटका, मळणीसाठी एकत्र केलेला गहू भस्मसात

मणदुरे : पाटण तालुक्याच्या चाफोली विभागातील पुनर्वसित आरल गावात अचानक लागलेल्या आगीत शेतात कापून ठेवलेला ६१ शेतकऱ्यांचा गहू जळून खाक झाला. तसेच शेतातील गवताच्या गंजी, शेणखत, जळावू लाकडेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोयना धरणातून पुनर्वसित झालेले आरल गाव चाफोली विभागात आहे. या गावात ६१ कुटुंबे आहेत. गावच्या शिवारातील गहू एकत्र गोळा करून आरल येथील भैरी-केदार मंदिराशेजारी मोकळ्या जागेत सर्व कुटुंबांचा गहू मळणीसाठी एकत्र करून ठेवला होता. एकत्र केलेला गहू मळणी यंत्राने मळायचा होता. दोन दिवसांत या ठिकाणी मळणी यंत्र येणार होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, मंगळवारी दुपारी अचानक आग लागून सर्व गहू जळून खाक झाला. गावकामगार तलाठी पी. पी. शिर्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सत्यजितसिंंह पाटणकर, पाटण पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, माजी पंचायत समिती सदस्या शोभा कदम, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव, राजेश पवार, नवनाथ कदम, माजी सरपंच विजय शिंंदे, हरीभाऊ सूर्यवंशी, सुभाष पवार, नथुराम झोरे, रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.या आगीत श्रीपती पवार, काशिनाथ पवार, अशोक पवार, रामचंद्र पवार, मारुती पवार, गोविंंद धुमाळ, तानाजी पवार, बाबूराव पवार, सीताराम पवार, किसन पवार, निवृत्ती पवार, बनाबाई पवार, नारायण पवार, रामचंद्र पवार, अर्जुन पवार, वैजंता पवार, कलाबाई पवार, सीताराम पवार, राजाराम पवार, पांडुरंग पवार, वसंत पवार, लक्ष्मी पवार, लक्ष्मण पवार, पाराबाई पवार, ज्ञानू पवार, तुकाराम पवार, मोहन पवार, आनंदा पवार, जगन्नाथ पवार, बाळाबाई पवार, चंद्रकांत कदम, गोविंंद कदम, विलास कदम, बबाबाई कदम, संगीता कदम, बंडू कदम, निवृत्ती पवार, शिवाजी पवार, रामचंद्र सपकाळ, तानाजी सपकाळ, पांडुरंग पवार, शंकर कदम, रामचंद्र कदम, चंद्रकांत सपकाळ, भागुजी सपकाळ, प्रकाश सपकाळ, पांडुरंग कदम, बंडू कदम, श्रीरंग पवार, विठ्ठल यादव, अशोक कदम, अंकुश कदम, विश्वास कदम, विश्वनाथ पवार, पांडुरंग पवार, धोंडिराम पवार या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)जीप चालकाचे प्रसंगावधानआरल मार्गावरून मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक जीप जात होती. त्यावेळी गव्हाला आग लागल्याचे जीप चालकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर या चालकाने प्रसंगावधान राखत ग्रामस्थांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली. ग्रामस्थांनी तातडीने फोन करून पाटण येथील अग्निशामक पथकास पाचारण केले. अग्निशामक पथक आल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत गहू, गवताच्या गंजी, जळावू लाकडे, शेणी, शेणखत असे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.