शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

प्रवाशांना क्वारंटाईनचा शिक्का मारणार तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST

सांगली : कोरोना संसर्ग राेखण्यासाठी सुरू असलेले निर्बंध आणि जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात ...

सांगली : कोरोना संसर्ग राेखण्यासाठी सुरू असलेले निर्बंध आणि जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, नेमक्या कोणत्या शासकीय विभागाने हे काम करायचे, याबाबत निश्चित आदेश नसल्याने प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारणार तरी कोण, हा सवाल कायम आहे.

दोन दिवसांपूर्वी अधिक कडक अंमलबजावणी करताना शासनाने जिल्हाबंदी जाहीर केली आहे. अत्यावश्यक कारणांसाठी आणि ई-पास असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल, असे सांगितले हाेते. तसेच लक्षणे आढळून आल्यास त्या प्रवाशाला कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार होते.

जिल्हाबंदी नियमांचे शुक्रवारपासून कडक पालन सुरू करण्यात आले आहे. मात्र, खासगी बसने जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांच्या नोंदणीची आणि त्यांना तपासणीसाठी कोणतीही यंत्रणा कार्यन्वित नाही. याबाबत प्रशासनाकडून कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याने इतर यंत्रणांनी तपासणीस असमर्थता दर्शवली आहे.

इतर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आरोग्य, आरटीओ, पोलीस आणि महसूल विभागाचे पथक कार्यन्वित करण्यात आले आहे. हे पथक ठरवून दिलेल्या थांब्यावर प्रवाशांची तपासणी करून नोंद घेत आहे तर लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे.

जिल्हाबंदीची माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनीही याबाबतचे आदेश दिले होते. परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्याने ही खबरदारी घेण्यात येत असली तरी जिल्ह्यात मात्र, या नियमाला बगल देण्यात आली आहे.

चौकट

आरटीओ, पोलीस, वाहतूकदार संघटना, शासकीय प्रतिनिधीचे पथक

शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात याबाबतचे काम सुरू आहे. आरटीओ, पोलीस, वाहतूकदार संघटना आणि शासकीय प्रतिनिधी असलेल्या पथकाची नियुक्ती करण्यात आली असून पाच ठिकाणी प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातही प्रवाशांची तपासणी व त्यांना क्वारंटाईनची आवश्यकता असल्यास त्याची कार्यवाही महत्त्वाची बनली आहे.