शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

प्रवाशांना क्वारंटाईनचा शिक्का मारणार तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST

सांगली : कोरोना संसर्ग राेखण्यासाठी सुरू असलेले निर्बंध आणि जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात ...

सांगली : कोरोना संसर्ग राेखण्यासाठी सुरू असलेले निर्बंध आणि जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, नेमक्या कोणत्या शासकीय विभागाने हे काम करायचे, याबाबत निश्चित आदेश नसल्याने प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारणार तरी कोण, हा सवाल कायम आहे.

दोन दिवसांपूर्वी अधिक कडक अंमलबजावणी करताना शासनाने जिल्हाबंदी जाहीर केली आहे. अत्यावश्यक कारणांसाठी आणि ई-पास असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल, असे सांगितले हाेते. तसेच लक्षणे आढळून आल्यास त्या प्रवाशाला कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार होते.

जिल्हाबंदी नियमांचे शुक्रवारपासून कडक पालन सुरू करण्यात आले आहे. मात्र, खासगी बसने जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांच्या नोंदणीची आणि त्यांना तपासणीसाठी कोणतीही यंत्रणा कार्यन्वित नाही. याबाबत प्रशासनाकडून कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याने इतर यंत्रणांनी तपासणीस असमर्थता दर्शवली आहे.

इतर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आरोग्य, आरटीओ, पोलीस आणि महसूल विभागाचे पथक कार्यन्वित करण्यात आले आहे. हे पथक ठरवून दिलेल्या थांब्यावर प्रवाशांची तपासणी करून नोंद घेत आहे तर लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे.

जिल्हाबंदीची माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनीही याबाबतचे आदेश दिले होते. परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्याने ही खबरदारी घेण्यात येत असली तरी जिल्ह्यात मात्र, या नियमाला बगल देण्यात आली आहे.

चौकट

आरटीओ, पोलीस, वाहतूकदार संघटना, शासकीय प्रतिनिधीचे पथक

शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात याबाबतचे काम सुरू आहे. आरटीओ, पोलीस, वाहतूकदार संघटना आणि शासकीय प्रतिनिधी असलेल्या पथकाची नियुक्ती करण्यात आली असून पाच ठिकाणी प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातही प्रवाशांची तपासणी व त्यांना क्वारंटाईनची आवश्यकता असल्यास त्याची कार्यवाही महत्त्वाची बनली आहे.